शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

‘नाशिक पॅटर्न’ची कल्हई उडाली!

By admin | Updated: November 7, 2015 03:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची घसरगुंडीच झाली. त्यामुळे कथित विकासाची भ्रामकताही उघड होऊन गेली.

- किरण अग्रवाल

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची घसरगुंडीच झाली.त्यामुळे कथित विकासाची भ्रामकताही उघड होऊन गेली.खोटे असले तरी हरकत नाही, पण रेटून बोलण्याला राजकारणात वेगळे महत्त्व असते. त्याने कधी कधी निभावून जाते हे खरे, मात्र प्रत्येक वेळीच ते जमते असे नाही. ‘नाशिक पॅटर्न’च्या शिट्ट्या फुंकत व धुरांच्या रेषा हवेत काढीत कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीला सामोरे गेलेल्या राज ठाकरे यांचे ‘इंजीन’ पुढे जाण्याऐवजी मागे आले ते त्यामुळेच. मतदारांना आता संकल्पचित्रांवर भरवसा राहिलेला नाही, त्यांना प्रत्यक्ष काम हवे असाच संकेत यातून मिळून गेल्याने तो नाशकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही धडधड वाढवून गेला आहे.नाशकातील माहोल सध्या पाणीप्रश्नाने तापला आहे. आपल्यालाच पाण्याची चणचण असताना मराठवाड्यासाठी ते कसे सोडायचे, असा यातील सवाल आहे. त्यासाठी भाजपाखेरीजचे सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहेत, पण एकीकडे हा शिमगा चालू असताना ‘मनसे’ नेत्या व कार्यकर्त्यांच्या जिवाला वेगळाच घोर लागून गेला आहे तो म्हणजे, उद्याचे कसे व्हायचे? लगतच्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची वाताहत झाली. पक्षाच्या २७ नगरसेवकांच्या गाडीला तेथे यंदा नऊच डबे उरले. कारण, नाशकात अमुक-तमुक करून दाखविल्याचा जो प्रचार केला गेला, त्यावर तेथील मतदारांनी विश्वास ठेवला नाही. तेथे केल्या गेलेल्या ‘प्रेझेन्टेशन’, म्हणजे सादरीकरणाबाबतची वास्तविकता नाशिककरांना तर पुरती ठाऊक आहे. सिंहस्थानिमित्त शासनाच्या निधीतून उभ्या राहिलेल्या रस्ते, पूल व नदीवरील घाटांबरोबरच नाशकात अद्याप साकारल्या न गेलेल्या प्रकल्पांचेही मार्केटिंग कल्याण-डोंबिवलीत केले गेले. पण यातील ‘मनसे’ने केलेले नवनिर्माण कोणते हा प्रश्न कायम आहे. कारण, राज ठाकरे यांनी जे मनावर घेतले आहे आणि त्याकरिता टाटा, अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींची नावे घेतली आहेत ती कामे अद्याप कागदावरच आहेत. त्यामुळे आणखी सुमारे दीडेक वर्षाने होऊ घातलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीस सामोरे जाताना पुन्हा ‘मनसे’च्या इंजिनाची शिट्टी वाजेल का, असा प्रश्न आतापासूनच ‘मनसे’करांना पडला असेल तर आश्चर्य वाटू नये.मुळात, नाशिक महापालिकेतील ‘मनसे’ची कारकीर्द निष्प्रभ ठरली आहे, हे नाकारता न येणारे सत्य आहे. कुणी कितीही नाही म्हणो, परंतु त्याच्याच परिणामी गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’ उमेदवारावर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली, तर विधानसभा निवडणुकीत नाशकातील तीनही जागा हातच्या गमवाव्या लागल्या. या आठवड्यातच झालेल्या जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीतही एकूण १०२ जागांपैकी अवघ्या बाराच जागा या पक्षाला लढवता आल्या आणि त्यापैकी एकही जागा ‘मनसे’च्या हाती लागली नाही. याची कारणे संघटनात्मक विकलांगतेत दडली आहेत हे खुद्द राज ठाकरे यांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. निवडणुकीच्या राजकारणात प्रचाराचे फड जिंकता आले म्हणजे यशही लाभते असे नाही. जाहीर सभांमध्ये पडणाऱ्या टाळ्या मतपेटीतही उतरतीलच याची शाश्वती नसते. त्यासाठी जनतेशी सदान्कदा संपर्क ठेवून असणारी संघटनात्मक फळी असावी लागते. नाशिक शहरात व जिल्ह्यातही ‘मनसे’ला हीच उणीव प्रामुख्याने सतावणारी आहे. पक्षाचे पदाधिकारी आहेत पण त्यांच्या आदेशासरशी काम करणारे कार्यकर्तेच नाहीत. सध्या पाण्याचे जे राजकारण सुरू आहे त्यात शिवसेनेसोबत काँग्रेस आघाडीवर आहे, परंतु ‘मनसे’ केवळ सहभागापुरतीच दिसते आहे, ते या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच. ‘कडोंमपा’ निवडणुकीत ‘मनसे’च्या ‘नाशिक पॅटर्न’ची जी कल्हई उडाली ती नाशिकच्या पक्ष नेत्यांसाठी चिंतादायी ठरली आहे, तीदेखील त्याचमुळे.