शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

‘नाशिक पॅटर्न’ची कल्हई उडाली!

By admin | Updated: November 7, 2015 03:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची घसरगुंडीच झाली. त्यामुळे कथित विकासाची भ्रामकताही उघड होऊन गेली.

- किरण अग्रवाल

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची घसरगुंडीच झाली.त्यामुळे कथित विकासाची भ्रामकताही उघड होऊन गेली.खोटे असले तरी हरकत नाही, पण रेटून बोलण्याला राजकारणात वेगळे महत्त्व असते. त्याने कधी कधी निभावून जाते हे खरे, मात्र प्रत्येक वेळीच ते जमते असे नाही. ‘नाशिक पॅटर्न’च्या शिट्ट्या फुंकत व धुरांच्या रेषा हवेत काढीत कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीला सामोरे गेलेल्या राज ठाकरे यांचे ‘इंजीन’ पुढे जाण्याऐवजी मागे आले ते त्यामुळेच. मतदारांना आता संकल्पचित्रांवर भरवसा राहिलेला नाही, त्यांना प्रत्यक्ष काम हवे असाच संकेत यातून मिळून गेल्याने तो नाशकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही धडधड वाढवून गेला आहे.नाशकातील माहोल सध्या पाणीप्रश्नाने तापला आहे. आपल्यालाच पाण्याची चणचण असताना मराठवाड्यासाठी ते कसे सोडायचे, असा यातील सवाल आहे. त्यासाठी भाजपाखेरीजचे सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहेत, पण एकीकडे हा शिमगा चालू असताना ‘मनसे’ नेत्या व कार्यकर्त्यांच्या जिवाला वेगळाच घोर लागून गेला आहे तो म्हणजे, उद्याचे कसे व्हायचे? लगतच्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नाशिकचे ढोल बडवूनही ‘मनसे’ची वाताहत झाली. पक्षाच्या २७ नगरसेवकांच्या गाडीला तेथे यंदा नऊच डबे उरले. कारण, नाशकात अमुक-तमुक करून दाखविल्याचा जो प्रचार केला गेला, त्यावर तेथील मतदारांनी विश्वास ठेवला नाही. तेथे केल्या गेलेल्या ‘प्रेझेन्टेशन’, म्हणजे सादरीकरणाबाबतची वास्तविकता नाशिककरांना तर पुरती ठाऊक आहे. सिंहस्थानिमित्त शासनाच्या निधीतून उभ्या राहिलेल्या रस्ते, पूल व नदीवरील घाटांबरोबरच नाशकात अद्याप साकारल्या न गेलेल्या प्रकल्पांचेही मार्केटिंग कल्याण-डोंबिवलीत केले गेले. पण यातील ‘मनसे’ने केलेले नवनिर्माण कोणते हा प्रश्न कायम आहे. कारण, राज ठाकरे यांनी जे मनावर घेतले आहे आणि त्याकरिता टाटा, अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींची नावे घेतली आहेत ती कामे अद्याप कागदावरच आहेत. त्यामुळे आणखी सुमारे दीडेक वर्षाने होऊ घातलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीस सामोरे जाताना पुन्हा ‘मनसे’च्या इंजिनाची शिट्टी वाजेल का, असा प्रश्न आतापासूनच ‘मनसे’करांना पडला असेल तर आश्चर्य वाटू नये.मुळात, नाशिक महापालिकेतील ‘मनसे’ची कारकीर्द निष्प्रभ ठरली आहे, हे नाकारता न येणारे सत्य आहे. कुणी कितीही नाही म्हणो, परंतु त्याच्याच परिणामी गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’ उमेदवारावर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली, तर विधानसभा निवडणुकीत नाशकातील तीनही जागा हातच्या गमवाव्या लागल्या. या आठवड्यातच झालेल्या जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीतही एकूण १०२ जागांपैकी अवघ्या बाराच जागा या पक्षाला लढवता आल्या आणि त्यापैकी एकही जागा ‘मनसे’च्या हाती लागली नाही. याची कारणे संघटनात्मक विकलांगतेत दडली आहेत हे खुद्द राज ठाकरे यांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. निवडणुकीच्या राजकारणात प्रचाराचे फड जिंकता आले म्हणजे यशही लाभते असे नाही. जाहीर सभांमध्ये पडणाऱ्या टाळ्या मतपेटीतही उतरतीलच याची शाश्वती नसते. त्यासाठी जनतेशी सदान्कदा संपर्क ठेवून असणारी संघटनात्मक फळी असावी लागते. नाशिक शहरात व जिल्ह्यातही ‘मनसे’ला हीच उणीव प्रामुख्याने सतावणारी आहे. पक्षाचे पदाधिकारी आहेत पण त्यांच्या आदेशासरशी काम करणारे कार्यकर्तेच नाहीत. सध्या पाण्याचे जे राजकारण सुरू आहे त्यात शिवसेनेसोबत काँग्रेस आघाडीवर आहे, परंतु ‘मनसे’ केवळ सहभागापुरतीच दिसते आहे, ते या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच. ‘कडोंमपा’ निवडणुकीत ‘मनसे’च्या ‘नाशिक पॅटर्न’ची जी कल्हई उडाली ती नाशिकच्या पक्ष नेत्यांसाठी चिंतादायी ठरली आहे, तीदेखील त्याचमुळे.