शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

खासदार हेमंत गोडसेंना दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोरच आंदोलन करावे लागणं दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:34 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी.

- किरण अग्रवालसरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी. राज्यांतर्गत विमानसेवेच्या प्रश्नावरून सत्ताधारी खासदार हेमंत गोडसे यांना नवी दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोर आंदोलन करावे लागल्याच्या प्रकाराकडेही त्याचदृष्टीने पाहता यावे.विमानतळाची सुविधा असलेल्या लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्याकरिता केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६मध्ये ‘उडान’नामक योजना घोषित केली होती. यात महाराष्ट्रातील नाशिकसह दहा विमानतळांवरून प्रवासी सेवेसाठी एअर डेक्कन कंपनीला मान्यता देण्यात आली होती. चालू वर्षातील सप्टेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्याचेही आदेशित करण्यात आले होते. परंतु त्यासाठी आवश्यक ठरणारा मुंबईतील ‘टाईम स्लॉट’, ती व्यवस्था पाहणा-या खासगी कंपनीकडून नाकारला गेल्याने राज्यातील या प्रस्तावित नव्या विमानसेवा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी केंद्राच्या ‘उडान’ योजनेला जमिनीवरच घरघर लागल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात संबंधितांशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यानेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट हवाई वाहतूक मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. केंद्रातील सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या सहयोगी खासदाराला केंद्रानेच घोषित केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी असे पाऊल उचलावे लागावे, यापेक्षा अधिक शोचनीयता काय ठरावी, असा यातील खरा प्रश्न आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील दहा शहरांतील सेवांसाठी मुंबईतील ‘टाईम स्लॉट’ नाकारणा-या खासगी कंपनीने त्याचवेळी गुजरातमधील सुरत, कांडला व पोरबंदर एअरपोर्टला मात्र त्याची मान्यता दिली आहे. यातून सदर कंपनीचे गुजरातधार्जिणेपण उघड होणारे असून, ते महाराष्ट्रावर अन्याय करणारेच म्हणावयास हवे. परंतु त्याबद्दल राज्यातील सत्ताधा-यांनाही फारसे काही वाटू नये, हे अधिक गंभीर आहे. केंद्राने घोषित केलेल्या योजनेला खो घालणारा निर्णय एखादी खासगी कंपनी कसा घेऊ शकते, असाही प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे.नाशिकचे विमानतळ राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ मध्येच बांधून तयार आहे. त्यानंतर येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह निमा, आयमा व अन्य उद्योजकीय संघटनांनीही विविध पातळीवर पाठपुरावा चालविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व नाशिकनंतरचे शिर्डी विमानतळ सुरूही झाले; परंतु विमानतळ व सारी सिद्धता-सज्जता असूनही नाशिक, जळगावची सेवा रखडली आहे. केंद्राच्या ‘उडान’ योजनेंतर्गत ही सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती तर त्यात ‘टाईम स्लॉट’ची अडचण आली. आता अखेर १५ डिसेंबरचा मुहूर्त त्यासाठी मुक्रर करण्यात आला असला तरी, शिवसेनेला सत्ताधारी राहूनही दिल्लीतील रस्त्यावर उतरण्याची भूमिका त्याकरिता घ्यावी लागली. सरकारच्या घोषणांपलीकडील वास्तविकतेवर पुरेसा प्रकाश टाकणारी ही बाब असून, शिवसेनेने राजकीयदृष्ट्या अचूक ‘टायमिंग’ साधण्याची आयती संधी यातून घेतली, हे मात्र खरे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना