शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

खासदार हेमंत गोडसेंना दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोरच आंदोलन करावे लागणं दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:34 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी.

- किरण अग्रवालसरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी. राज्यांतर्गत विमानसेवेच्या प्रश्नावरून सत्ताधारी खासदार हेमंत गोडसे यांना नवी दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोर आंदोलन करावे लागल्याच्या प्रकाराकडेही त्याचदृष्टीने पाहता यावे.विमानतळाची सुविधा असलेल्या लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्याकरिता केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६मध्ये ‘उडान’नामक योजना घोषित केली होती. यात महाराष्ट्रातील नाशिकसह दहा विमानतळांवरून प्रवासी सेवेसाठी एअर डेक्कन कंपनीला मान्यता देण्यात आली होती. चालू वर्षातील सप्टेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्याचेही आदेशित करण्यात आले होते. परंतु त्यासाठी आवश्यक ठरणारा मुंबईतील ‘टाईम स्लॉट’, ती व्यवस्था पाहणा-या खासगी कंपनीकडून नाकारला गेल्याने राज्यातील या प्रस्तावित नव्या विमानसेवा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी केंद्राच्या ‘उडान’ योजनेला जमिनीवरच घरघर लागल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात संबंधितांशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यानेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट हवाई वाहतूक मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. केंद्रातील सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या सहयोगी खासदाराला केंद्रानेच घोषित केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी असे पाऊल उचलावे लागावे, यापेक्षा अधिक शोचनीयता काय ठरावी, असा यातील खरा प्रश्न आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील दहा शहरांतील सेवांसाठी मुंबईतील ‘टाईम स्लॉट’ नाकारणा-या खासगी कंपनीने त्याचवेळी गुजरातमधील सुरत, कांडला व पोरबंदर एअरपोर्टला मात्र त्याची मान्यता दिली आहे. यातून सदर कंपनीचे गुजरातधार्जिणेपण उघड होणारे असून, ते महाराष्ट्रावर अन्याय करणारेच म्हणावयास हवे. परंतु त्याबद्दल राज्यातील सत्ताधा-यांनाही फारसे काही वाटू नये, हे अधिक गंभीर आहे. केंद्राने घोषित केलेल्या योजनेला खो घालणारा निर्णय एखादी खासगी कंपनी कसा घेऊ शकते, असाही प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे.नाशिकचे विमानतळ राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ मध्येच बांधून तयार आहे. त्यानंतर येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह निमा, आयमा व अन्य उद्योजकीय संघटनांनीही विविध पातळीवर पाठपुरावा चालविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व नाशिकनंतरचे शिर्डी विमानतळ सुरूही झाले; परंतु विमानतळ व सारी सिद्धता-सज्जता असूनही नाशिक, जळगावची सेवा रखडली आहे. केंद्राच्या ‘उडान’ योजनेंतर्गत ही सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती तर त्यात ‘टाईम स्लॉट’ची अडचण आली. आता अखेर १५ डिसेंबरचा मुहूर्त त्यासाठी मुक्रर करण्यात आला असला तरी, शिवसेनेला सत्ताधारी राहूनही दिल्लीतील रस्त्यावर उतरण्याची भूमिका त्याकरिता घ्यावी लागली. सरकारच्या घोषणांपलीकडील वास्तविकतेवर पुरेसा प्रकाश टाकणारी ही बाब असून, शिवसेनेने राजकीयदृष्ट्या अचूक ‘टायमिंग’ साधण्याची आयती संधी यातून घेतली, हे मात्र खरे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना