शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मनवा बेपरवाह

By admin | Updated: August 1, 2016 05:17 IST

माणसाचा मोह मेला नाही. माया मेली नाही आणि मनही

माया मरी ना मन मरा, मर मर गये शरीरआशा त्रिरणा ना मरी, कह गये दास कबीरमाणसाचा मोह मेला नाही. माया मेली नाही आणि मनही. शरीर मरून जातं, पण जाईपर्यंत आशा, तृष्णा संपत नाही. मन मारून एखादी गोष्ट करणं म्हणजे काय तर मनातले विकार, भावना, लोभ, मोह, मद, मत्सर जाऊन तिथे असीम अथांगता निर्मळता प्रकट करणं हे महत्त्वाचं. आपलं पूर्ण आयुष्य हे मनोविकार सांभाळण्यात आणि जोपासण्यात, जोजविण्यात जाते. मन क्षुद्र जड वस्तूत अडकून पडतं. त्यातून मुक्ती नाही.माझा कोकणमधला एक मित्र म्हणाला, आमच्याकडे श्रीमंती दोन गोष्टींनी मोजतात. एक आंबे म्हणजे हापूस आंब्याची झाडं किती, आणि दुसरं म्हणजे कोर्ट केसेस किती? मी अचंबित झालो. तुझ्या आंब्याची एक फांदी माझ्या बांधाच्या आत आली, माझा आंबा तुझ्या अंगणात पडला इथपासून तुझ्यामुळे माझा वारा पाऊस अडतो म्हणणारे आहेत. मग आपण गुंततो कशात? माणसात, शरीरात की मनात? हे मन ऐहिक गोष्टीत फार पटकन गुंततं, गुंतून पडतं पण त्यातून पटकन बाहेर पडत नाही. म्हणून कबीर म्हणतो,चाह गयी चिंता मिटी, मनवा बेपरवाहजिनको कछु ना चाहिए, वो ही शहेनशाह!हे चाह जाणं आणि चिंता मिटणं महत्त्वाचं. त्याकरिता मनवा बेपरवाह हवं. म्हणजे बेछूट नाही तर अशा लौकिक गोष्टींची चिंता त्याने करू नये. कारण हे शाश्वत नाही म्हणून त्याबाबत बेपर्वा हवं आणि असं मन बेफिकीर झालं की माणूस शहेनशाह होतो. पण शहेनशाह होणं म्हणजे इच्छाहीन होणं, त्यांच्या पार जाणं. मला काहीही नको म्हणायला धैर्य लागतंं. नाही तर आपल्याकडे बहुतेक सगळे ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून येईल घरा’ अशा प्रवृत्तीचेच असतात. पूर्वी काशीला जाणारा माणूस आपलं तर्पण करूनच जायचा. परत येण्याची शाश्वती नाही. आला तर पुण्यकर्म. इतकी विरक्ती अंगी येण्याला साधूच बनण्याची गरज नाही.साधुत्व ही वृत्ती आहे. साधू होणं म्हणजे सर्वसंगपरित्याग करणं. पण हे करायचं कसं? तर केवळ भगवी वस्त्र परिधान करून नाही, तर मन भगवं करणं. म्हणजे वासनाहीन होणं. पदाचा, पैशाचा, सत्तेचा कुठलाच लोभ न ठेवणं, त्यापासून पूर्ण निरासक्त होणं म्हणजे साधू होणं. अशा साधूला मठ, संस्था, अखाडा नसतो. कुंभमेळ्यात कुणी प्रथम स्नान करायचे यावरून दंगा करणारे साधू हे संधिसाधू होत. त्यांनी कशापासूनच विरक्ती घेतलेली नाही. म्हणायला संसार नाही, बायकोपोरं नाहीत पण वांच्छा तर इतकी आहे की संसारी माणूस परवडला. अशा व्यक्ती कशा होतील शहेनशाह? त्याला सडा फटिंग कबीर हवा. कबीरा खडा बाजारमें लिये लुकाठी हाथजो घर फूंके अपना चले हमारे साथ!कबीर बोलवतोय खरा, पण घर फुंकण्याचं धाडस आहे आपल्यात? कबीर बाजारात उभा आहे, आपली वाट पाहात !-किशोर पाठक