शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते.

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते. विसरण्याची शक्यता असते तिथे आठवण करून देण्याची गरज असते. हा आठवण करुन देण्याचा कालावधी तीनशे पासष्ट दिवसांचा आहे. म्हणजे गोड बोलण्याचा संदेश वर्षभर आपल्या लक्षात राहू शकतो असा त्यामागे पूर्वसुरींचा अंदाज असणार. त्यात काही बदल करण्याची गरज आहे का, हे पाहिले पाहिजे. व्यवहाराला प्राथम्य देणारी नवी मूल्य व्यवस्था उदयाला आली असल्याने गोड या शब्दाला काही नव्या अर्थछटांचा स्पर्श झाला आहे का, हे पाहिले पाहिजे.सामान्यपणे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. गोड या शब्दाची दुसरी बाजू म्हणजे कडू ! गोड आणि कडू हे दोन्ही शब्द परस्परांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येत नाही. म्हणजे गोडात थोडे कडू मिसळणे आलेच. कडू गोष्टी बऱ्याचदा औषधी असतात. औषध तर उघड उघड कडू असते, म्हणून त्याच्या गोळ्या साखरेत घोळून दिल्या जातात. औषध कडू असले तरी माणसाची प्रकृती सुधारावी म्हणून आवश्यक असते. हेच तत्व बोलण्यातही आपल्याला लागू करता आले पाहिजे. अती गोड म्हणजे विष आणि अती कडू म्हणजेसुद्धा विषच. त्यामुळे बोलताना या दोन्हीचे प्रमाण किती ठेवायचे याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.आपण जरी गोड बोलत असलो तरी कधी ते तोंडदेखले, कधी वरवरचे, कधी तिरकस, कधी अतिशयोक्तीपूर्ण, तर कधी कुचेष्टापूर्ण देखील असू शकते. समोरच्या माणसाची आकलनक्षमता लक्षात घेऊनच यातील कोणता शब्दालंकार वापरायचा हे ठरवता आले पाहिजे, नाही तर गैरसमजुतीचा घोटाळा होणार हे नक्की ! एखाद्याच्या स्तुतीचा पतंग आकाशात उडवताना त्याचे जमिनीवरचे पाय तर सुटत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे हीसुद्धा आपली जबाबदारी ठरते.आपल्याविषयी इतरांनी गोड बोललेले आपल्याला आवडते मात्र आपण इतरांच्या बाबतीत तसेच वागतो का, याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. त्याही पलीकडे जाऊन तीळगुळ समारंभ हा केवळ एक उपचाराचा भाग तर झालेला नाही ना, हेही तपासून बघण्याची वेळ आली आहे. तोंडातली तीळगुळाची चव लुप्त व्हायच्या आतच माणसे पुन्हा कडू बोलायला सुरुवात करणार असतील तर रोजच्या रोज तीळगुळ समारंभ करूनही त्याला काही अर्थ राहणार नाही.- प्रल्हाद जाधव