शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

मराठवाड्यात आजही सेनेचाच दबदबा

By admin | Updated: June 18, 2016 06:26 IST

३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली.

- सुधीर महाजन (मराठवाडा)३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली. या घटनेची काँग्रेसच्या गोटात फारशी दखल घेतली गेली नसली, तरी औरंगाबादचे वातावरण सेनेच्या वाढीस पोषक ठरले. त्यावेळी औरंगाबादच्या राजकारणावर मुस्लिमांचा प्रभाव होता. आ. अमानउल्ला मोतीवालांचे वर्चस्व आणि औरंगाबाद शहरात होणाऱ्या जातीय दंगली आणि त्यामुळे सतत असणारा तणाव. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात असणारा असंतोष. याला शिवसेना हा योग्य पर्याय सापडला. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांची आक्रमक भाषा, कडवे हिंदुत्व आणि शिवसेनेची आक्रमकता यामुळे औरंगाबाद शहरात शिवसेना फोफावली. तरुण तिकडे वळला. १९८५, १९८६ आणि १९८७ साली झालेल्या जातीय दंगलींमध्ये शिवसेनेने हिंदूंची बाजू घेतली आणि सेना भक्कम झाली. महापालिका जिंकल्यानंतर शिवसेना ग्रामीण भागात पसरली. हाच काळ विद्यापीठ नामांतराचा होता. नामांतरवादी आणि विरोधी, असे दोन तट पडले होते. सेनेने येथे विरोधाची भूमिका घेतली. जातीच्या राजकारणाच्या रेषा त्याचवेळी स्पष्ट होत्या. आज ११ आमदार आणि तीन खासदार अशी सेनेची राजकीय ताकद आहे. बलस्थाने : शिवसेनेच्या बलस्थानांचा विचार करताना तिची दुहेरी रचना महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधी आणि संघटनाप्रमुख अशी वेगवेगळी रचना आहे. या संघटनेत आमदार-खासदारापेक्षा जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख प्रभावी दिसतो. संघटनात्मक पदाचे महत्त्व कायम आहे. आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची क्षमता असलेला हाच एकमेव पक्ष दिसतो. वरून आलेल्या कोणात्याही आदेशाचे पालन बिनबोभाट होते आणि बाळासाहेबांनंतरसुद्धा संघटनात्मक चौकट कायम आहे.कमकुवत बाजू : आक्रमकपणा हा शिवसेनेचा स्थायीभाव होता. सेना आता पूर्वीसारखी आक्रमक राहिली नाही. आता तर सत्तेत असूनही नसल्यासारखे सेनेचे वागणे आहे. धड सत्ताधारी नाही आणि विरोधी पक्षही नाही, अशी अवस्था आहे. संघटना बांधणी नाही. राजकारणात खुशमस्कऱ्यांना महत्त्व आले आहे. हे सेनेतील गुणदोष असतील तरी मराठवाड्यात भगव्याचे आकर्षण आहे. फक्त कोणता भगवा हा प्रश्न आहे.