शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आजही सेनेचाच दबदबा

By admin | Updated: June 18, 2016 06:26 IST

३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली.

- सुधीर महाजन (मराठवाडा)३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली. या घटनेची काँग्रेसच्या गोटात फारशी दखल घेतली गेली नसली, तरी औरंगाबादचे वातावरण सेनेच्या वाढीस पोषक ठरले. त्यावेळी औरंगाबादच्या राजकारणावर मुस्लिमांचा प्रभाव होता. आ. अमानउल्ला मोतीवालांचे वर्चस्व आणि औरंगाबाद शहरात होणाऱ्या जातीय दंगली आणि त्यामुळे सतत असणारा तणाव. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात असणारा असंतोष. याला शिवसेना हा योग्य पर्याय सापडला. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांची आक्रमक भाषा, कडवे हिंदुत्व आणि शिवसेनेची आक्रमकता यामुळे औरंगाबाद शहरात शिवसेना फोफावली. तरुण तिकडे वळला. १९८५, १९८६ आणि १९८७ साली झालेल्या जातीय दंगलींमध्ये शिवसेनेने हिंदूंची बाजू घेतली आणि सेना भक्कम झाली. महापालिका जिंकल्यानंतर शिवसेना ग्रामीण भागात पसरली. हाच काळ विद्यापीठ नामांतराचा होता. नामांतरवादी आणि विरोधी, असे दोन तट पडले होते. सेनेने येथे विरोधाची भूमिका घेतली. जातीच्या राजकारणाच्या रेषा त्याचवेळी स्पष्ट होत्या. आज ११ आमदार आणि तीन खासदार अशी सेनेची राजकीय ताकद आहे. बलस्थाने : शिवसेनेच्या बलस्थानांचा विचार करताना तिची दुहेरी रचना महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधी आणि संघटनाप्रमुख अशी वेगवेगळी रचना आहे. या संघटनेत आमदार-खासदारापेक्षा जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख प्रभावी दिसतो. संघटनात्मक पदाचे महत्त्व कायम आहे. आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची क्षमता असलेला हाच एकमेव पक्ष दिसतो. वरून आलेल्या कोणात्याही आदेशाचे पालन बिनबोभाट होते आणि बाळासाहेबांनंतरसुद्धा संघटनात्मक चौकट कायम आहे.कमकुवत बाजू : आक्रमकपणा हा शिवसेनेचा स्थायीभाव होता. सेना आता पूर्वीसारखी आक्रमक राहिली नाही. आता तर सत्तेत असूनही नसल्यासारखे सेनेचे वागणे आहे. धड सत्ताधारी नाही आणि विरोधी पक्षही नाही, अशी अवस्था आहे. संघटना बांधणी नाही. राजकारणात खुशमस्कऱ्यांना महत्त्व आले आहे. हे सेनेतील गुणदोष असतील तरी मराठवाड्यात भगव्याचे आकर्षण आहे. फक्त कोणता भगवा हा प्रश्न आहे.