शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

मराठवाड्यात आजही सेनेचाच दबदबा

By admin | Updated: June 18, 2016 06:26 IST

३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली.

- सुधीर महाजन (मराठवाडा)३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली. या घटनेची काँग्रेसच्या गोटात फारशी दखल घेतली गेली नसली, तरी औरंगाबादचे वातावरण सेनेच्या वाढीस पोषक ठरले. त्यावेळी औरंगाबादच्या राजकारणावर मुस्लिमांचा प्रभाव होता. आ. अमानउल्ला मोतीवालांचे वर्चस्व आणि औरंगाबाद शहरात होणाऱ्या जातीय दंगली आणि त्यामुळे सतत असणारा तणाव. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात असणारा असंतोष. याला शिवसेना हा योग्य पर्याय सापडला. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांची आक्रमक भाषा, कडवे हिंदुत्व आणि शिवसेनेची आक्रमकता यामुळे औरंगाबाद शहरात शिवसेना फोफावली. तरुण तिकडे वळला. १९८५, १९८६ आणि १९८७ साली झालेल्या जातीय दंगलींमध्ये शिवसेनेने हिंदूंची बाजू घेतली आणि सेना भक्कम झाली. महापालिका जिंकल्यानंतर शिवसेना ग्रामीण भागात पसरली. हाच काळ विद्यापीठ नामांतराचा होता. नामांतरवादी आणि विरोधी, असे दोन तट पडले होते. सेनेने येथे विरोधाची भूमिका घेतली. जातीच्या राजकारणाच्या रेषा त्याचवेळी स्पष्ट होत्या. आज ११ आमदार आणि तीन खासदार अशी सेनेची राजकीय ताकद आहे. बलस्थाने : शिवसेनेच्या बलस्थानांचा विचार करताना तिची दुहेरी रचना महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधी आणि संघटनाप्रमुख अशी वेगवेगळी रचना आहे. या संघटनेत आमदार-खासदारापेक्षा जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख प्रभावी दिसतो. संघटनात्मक पदाचे महत्त्व कायम आहे. आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची क्षमता असलेला हाच एकमेव पक्ष दिसतो. वरून आलेल्या कोणात्याही आदेशाचे पालन बिनबोभाट होते आणि बाळासाहेबांनंतरसुद्धा संघटनात्मक चौकट कायम आहे.कमकुवत बाजू : आक्रमकपणा हा शिवसेनेचा स्थायीभाव होता. सेना आता पूर्वीसारखी आक्रमक राहिली नाही. आता तर सत्तेत असूनही नसल्यासारखे सेनेचे वागणे आहे. धड सत्ताधारी नाही आणि विरोधी पक्षही नाही, अशी अवस्था आहे. संघटना बांधणी नाही. राजकारणात खुशमस्कऱ्यांना महत्त्व आले आहे. हे सेनेतील गुणदोष असतील तरी मराठवाड्यात भगव्याचे आकर्षण आहे. फक्त कोणता भगवा हा प्रश्न आहे.