शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जाटांनंतर मराठा?

By admin | Updated: July 22, 2015 22:33 IST

सरकार मग ते केन्द्रातले असो की विविध राज्यातले, न्यायालयांच्या सक्रियतेवर अधूनमधून त्यांचे कुरकुरणे सुरुच असते. त्यामागे बऱ्याचदा राजकीय हेतुने प्रेरित होऊन

सरकार मग ते केन्द्रातले असो की विविध राज्यातले, न्यायालयांच्या सक्रियतेवर अधूनमधून त्यांचे कुरकुरणे सुरुच असते. त्यामागे बऱ्याचदा राजकीय हेतुने प्रेरित होऊन सरकारला काही तरी नियमबाह्य करायचे असते आणि न्यायालये ते करु देत नाहीत. पण काही बाबी अशाही असतात की, सरकारांची त्याबाबत मनापासूनची अनुकूलता नसते, पण राजकीय कारणांसाठी वा सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तसे जाहीर करण्याची त्यांची हिंमत होत नाही. अशा वेळी मग न्यायालयेच त्यांच्या मदतीला धाऊन जातात. देशाच्या नऊ राज्यांमध्ये आपले अस्तित्व राखून असलेल्या जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत हेच आता झाले आहे. आपल्याला अन्य मागासवर्गीय म्हणून घोषित करा अशी या समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. हा समाज संबंधित नऊ राज्यांमध्ये विशेषत: निवडणुकांच्या मतदानाच्या संदर्भात चांगलाच प्रभावी. त्यामुळे त्याची मागणी अमान्य करण्याचा जुगार कोणताच राजकीय पक्ष करु शकत नाही. परिणामी संपुआने आपल्या सत्तेच्या अखेरच्या चरणात ही मागणी मान्य करुन टाकली. त्याची स्वाभाविकच अगोदरपासून अन्य मागासवर्गात समाविष्ट जाती जमातींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले व गेल्या मार्चमध्ये त्या न्यायालयाने जाटांचे आरक्षण घटनाबाह्य ठरविले. मुद्दा खऱ्या मागासांना न्याय देण्याचा नव्हे तर राजकीय सोय पाहण्याचा असल्याने मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली आणि आता तीदेखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसे करताना न्यायालयाने केन्द्र सरकारला चांगलेच फैलावरदेखील घेतले. अर्थात केन्द्राने मनापासून जाटांच्या आरक्षणाचे समर्थन केलेच असेल, असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. दहा वर्षांपूर्वी काही राज्यांनी जाटांना सवलत दिल्याचा जो दाखला केन्द्राने न्यायालयासमोर ठेवला, त्याने न्यायालय मुळीच प्रभावित होणार नाही, याची कल्पना केन्द्राला असणारच. आता या निवाड्यानंतर, पाहा आम्ही तर द्यायला तयारच होतो पण न्यायालय आडवे आले असा बचाव करायला केन्द्र सरकार मोकळे झाले. जे जाटांच्या बाबतीत झाले तेच महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाबाबतही झाले तर आश्चर्य नको.