शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

महाजन ते पर्रीकर

By admin | Updated: January 13, 2016 03:29 IST

भाजपाच्या मागील सत्तेत प्रमोद महाजन (भले काही काळापुरते का होईना) तर सध्याच्या सत्तेत मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षण खाते सांभाळीत असल्याने दोहोंच्या काम करण्याच्या पद्धतीची

भाजपाच्या मागील सत्तेत प्रमोद महाजन (भले काही काळापुरते का होईना) तर सध्याच्या सत्तेत मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षण खाते सांभाळीत असल्याने दोहोंच्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना अपरिहार्य ठरते. भारत-पाक संघर्ष तेव्हांही होता आणि आजही आहे. या संघर्षाबाबत एकदा महाजनांना एका विदेशी चित्रवाणीच्या चर्चा कार्यक्रमात ‘पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर भारताची भूमिका काय असेल’ असा प्रश्न वारंवार विचारला गेला तेव्हां महाजन त्यांच्या स्वभावास अनुसरुन ठणकावून म्हणाले की, ‘दोन सार्वभौम राष्ट्रांमधील अशा विषयांची चर्चा चित्रवाणीच्या स्टुडिओत व जाहीरपणे होत नसते’. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यानंतर जवानांशी बोलताना जाहीरपणे सांगितले की, ‘जी व्यक्ती किंवा संघटना तुमच्या किंवा देशाच्या अंगावर धाऊन येईल तिचा तुम्ही थेट मुकाबला करुन त्यांना तितकेच दु:ख द्या. यात सरकारच्या भूमिकेचा काही प्रश्न नाही’. कोणत्याही लोकशाही राष्ट्रातील सैन्य नेहमीच लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या आदेश आणि आज्ञेच्या आधीन असते. (पाकिस्तान हा सन्माननीय अपवाद) लष्कर वा संरक्षण दलातील अन्य दले कधीही व कोणताही निर्णय परस्पर व स्वयंप्रेरणेने निर्णय घेत नसतात. भारतावर आजतागायत चीन आणि पाकिस्तानने जी युद्धे लादली त्या युद्धांमध्ये सहभागी झालेल्या सेनानींची आत्मचरित्रे वाचली तर हेच लक्षात येते की अनेकदा संरक्षण दले जी भूमिका घेऊ इच्छित होती, ती त्यांना घेता आली नाही, कारण देशातील लोकप्रिय सरकारची भूमिका त्यापेक्षा वेगळी होती. भूमिकांमधील या अंतरापायी काही आरोप प्रत्यारोपदेखील नंतरच्या काळात झाले. पण आजही संरक्षण दले त्यांच्या मर्जीबरहुकुम निर्णय घेऊन त्यावर कृती करीत नाहीत व तेच देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने योग्य आहे. अशा स्थितीत पर्रीकरांसारखा संरक्षण मंत्री संरक्षण दलांना ‘खुली छूट’ देण्याची भाषा करतो तेव्हां आपल्या या आज्ञेच्या संभाव्य परिणामांचा त्यांनी कितपत विचार केला असतो याचीच शंका वाटते. सुमारे चार वर्षांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरुनचा वाद याच सप्ताहात नव्याने उफाळून आला आहे. ती बातमी भारतीय लष्कराने बंडाचे निशाण हाती धरुन राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केल्यासंबंधीची होती. तो वाद अजून सुरुच आहे. अशा स्थितीत लष्कराला किंवा संरक्षण दलांना स्वयंनिर्णयाचा अधिकार कसा दिला जाऊ शकतो, हे पर्रीकरच जाणोत. पण राजकीय फडात करावयाची भाषणे सैन्यदलासमोर केल्यानंतर यापेक्षा वेगळे तरी काय होऊ शकते?