शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

लोकपाल अडकलेच

By admin | Updated: April 6, 2017 00:14 IST

अत्यंत धाडसी निर्णय घेऊन देशाप्रति कर्तव्य बजावताना आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, काळा पैसा उघडकीस आणणे यासारखे अत्यंत धाडसी निर्णय घेऊन देशाप्रति कर्तव्य बजावताना आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवून दिले. विशेषत: नोटाबंदी जाहीर करताना विरोधी पक्षच काय, पण जनतेवर याचा काय परिणाम होईल याचाही विचार केला नाही. कारण भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी असे करणे आवश्यक होते. सामान्य लोकांनीही सर्व त्रास सहन करीत शासनाचा हा निर्णय स्वीकारला. आता मात्र हेच सरकार लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीत टाळाटाळ का करते आहे; तेच कळत नाही. लोकपाल विधेयक संसदेत संमत होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याचे कारण म्हणजे शासनाने लोकपालाची नियुक्तीच केली नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा यासंदर्भात शासनाकडे विचारणा केली. परंतु प्रत्येक वेळेला तांत्रिक अडचण पुढे करून वेळ निभवून नेण्यात आली. आता पुन्हा एकदा सरकारने सर्वोच्च न्यायालयासमक्ष अडचण मांडली आहे. लोकपालाच्या नियुक्तीसाठी नेमावयाच्या समितीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा समावेश असावा, अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु पुरेसे संख्याबळ नसल्याने लोकसभेत विरोधी पक्ष नेताच नाही. परिणामी लोकपाल कायद्यात त्यानुसार बदल केल्याशिवाय लोकपाल नियुक्ती शक्य नाही, असे शासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात लोकपाल नियुक्त होणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. २०१२ साली हजारे यांच्या नेतृत्वात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही मोठी चळवळ उभी झाली होती. भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या जनतेने या आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला आणि लोकांच्या दबावापुढे झुकते घेत तत्कालीन सरकारने लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करवून घेतले. त्यामुळे आता लवकरच लोकपाल कायदा लागू होऊन भ्रष्टाचाराला लगाम बसेल, असा विश्वास लोकांना वाटू लागला होता. परंतु त्यांच्या या विश्वासाला तडा जाणार की काय असे वाटू लागले आहे.