शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

वर्तमानात जगू या

By admin | Updated: August 7, 2016 01:51 IST

जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे.

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे. वर्तमानात जगायचे म्हणजे काय? तर ज्या क्षणी आपल्या आयुष्यात जे काही घडत असते, त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा. त्या क्षणीच त्या क्षणाचे मोल अनुभवयचे. कारण आपले लक्ष जेव्हा वर्तमान स्थितीतील घटनांपासून वा अनुभवापासून दूर जाते व भूतकाळातच घोटाळायला लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परावलंबी आयुष्य जगतो. काही नवनूतन काही वेगळे जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा भूतकाळातले तेच जीवन आजही आपण वर्तमानकाळात जगतो. त्याच- त्याच चुका आपण आजही पुन्हा-पुन्हा करतो. तेच-तेच रडगाणे आपण आजही पुन्हा गात राहतो. आता जे घडतेय, त्या अनुभवापासून दूर राहत भूतकाळातच गुरफटत राहतो. मग जीवन कसे रटाळ झाले आहे, म्हणून चिडत राहतो. जीवनात आपल्याला सुख कधीच कसे मिळाले नाही, म्हणून त्रासून जातो. खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रात जगणे म्हणजे आपण ज्या-ज्या गोष्टी त्या-त्या क्षणी करत असतो, त्यात मनापासून गुंतायचे. आपण करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टीत समरस व्हायचे. त्या क्षणी त्या क्षणात आपण असतो, तेव्हा आपली एकाग्रता वाढते. लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करणे सोपे होते. यामुळे हाती घेतलेले कार्य आपण चलाखीने व सक्षमतेने करतो. वर्तमानात जगताना येणारा अनुभव हा आपल्या मनाशी ट्युन झालेला असतो. कारण तो जसा आहे, तसाच आपण अनुभवत असतो. त्यात भ्रामकता नसते, कल्पित भाग नसतो, भविष्याची स्वप्न नसतात, फक्त त्या क्षणाचे सत्य असते. जे घडते, ते समोर असते आणि तसेच जीवनानुभवात मुरत जाते. काही वेळा आपण एखादे पुस्तक वाचताना इतके गुंततो की, आजूबाजूचे सारे विसरतो. एखादा सुंदर चित्रपट पाहता-पाहता आपण किती रमतो, आपल्या सुंदर छंदाचा आनंद घेताना वेळेच भानही आपल्याला राहात नाही, हे सारे आनंदाचे क्षण जाणिवेच्या रंध्रारंध्रात शब्दातीत असतो. तो अनुभव फक्त त्याच्या अस्तित्वाबरोबर जगत असतो. स्वत:ला त्या क्षणात झोकून देत, जगण्याचा अनुभव म्हणजे वर्तमानात जगणे. वर्तमानाचा क्षण क्षणिक असतो. तो गतकाळात घेऊनही जातो आणि पुढे काय होणार, हे कुणाला माहीत, पण त्या क्षणाला जाणीवपूर्वक आपल्या संवेदनांनी धरून ठेवायचे ही एक अनुभूती आहे. ती चेतनेबरोबर आपण जगत आहोत, अशाच अनेक प्रकारच्या संधी आपल्या हातातून क्षणाक्षणाला निसटत असतात. कारण आपण सुखाचे ते क्षण त्या क्षणी जगायला विसरतो. अनेक घटनांचा, प्रक्रियेचा अर्थ लावायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा हे क्षण आपल्या हातातून निसटतात. जेव्हा त्या क्षणात आपण जगतो, तेव्हा आपल्याजवळ अवतीभोवती आनंद येतो. त्या क्षणी तो अनुभव आपल्याला प्रिय असेल तर तो एक सुंदर अनुभूती देतो आणि अप्रिय असेल, तर आपल्याला शिकण्याची संधी देतो. कारण आपण स्वत:चे एक विश्व त्या क्षणातून निर्माण करतो. ते विश्व फक्त त्या क्षणासाठीच आणि क्षणापुरते असते. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, आपण भविष्याचे नियोजन करायचे नाही किंवा भूतकाळात काही शिकायचे नाही. हे सगळे करायचेच, पण वर्तमानातले क्षण मात्र पूर्ण जगायचे.काही अनुभव अतिशय वेगळे ठरतात. सूर्यास्त झालेला असतो. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसत असते. अशा वेळी सूर्याच्या रूपाकडे पाहात त्या किरणांची लालीतील आनंद अनुभवतो. त्या क्षणी जर आपले लक्ष कुठल्या तरी किचकट गोष्टीत गुंतले असेल, तर सूर्यास्ताचा तो निर्मळ आनंद आपल्याला घेता येईल का? म्हणजेच त्या क्षणी घडणारे ते क्षण सूर्यास्तासारखे जिवंत असतात. आपल्या साऱ्या संवेदना मग त्या वातावरणाशी जुळतात. अनेक गतविचारांच्या किंवा भविष्यकाळाच्या विचारात न भटकता केवळ साऱ्या संवेदनांतून आयुष्य जसे आहे, तसे अनुभवणे ही खरे तर एक अत्यंत सुंदर आणि ताजीतवानी अशी अनुभूती आहे. अशी अनुभूती दीर्घ काळ घेता येईल असे नाही, पण विचारांच्या पलीकडे जाऊन साऱ्या संवेदना एकवटून वर्तमानातले क्षण जगणे ही एक जीवन कला आहे.