शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानात जगू या

By admin | Updated: August 7, 2016 01:51 IST

जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे.

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे. वर्तमानात जगायचे म्हणजे काय? तर ज्या क्षणी आपल्या आयुष्यात जे काही घडत असते, त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा. त्या क्षणीच त्या क्षणाचे मोल अनुभवयचे. कारण आपले लक्ष जेव्हा वर्तमान स्थितीतील घटनांपासून वा अनुभवापासून दूर जाते व भूतकाळातच घोटाळायला लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परावलंबी आयुष्य जगतो. काही नवनूतन काही वेगळे जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा भूतकाळातले तेच जीवन आजही आपण वर्तमानकाळात जगतो. त्याच- त्याच चुका आपण आजही पुन्हा-पुन्हा करतो. तेच-तेच रडगाणे आपण आजही पुन्हा गात राहतो. आता जे घडतेय, त्या अनुभवापासून दूर राहत भूतकाळातच गुरफटत राहतो. मग जीवन कसे रटाळ झाले आहे, म्हणून चिडत राहतो. जीवनात आपल्याला सुख कधीच कसे मिळाले नाही, म्हणून त्रासून जातो. खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रात जगणे म्हणजे आपण ज्या-ज्या गोष्टी त्या-त्या क्षणी करत असतो, त्यात मनापासून गुंतायचे. आपण करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टीत समरस व्हायचे. त्या क्षणी त्या क्षणात आपण असतो, तेव्हा आपली एकाग्रता वाढते. लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करणे सोपे होते. यामुळे हाती घेतलेले कार्य आपण चलाखीने व सक्षमतेने करतो. वर्तमानात जगताना येणारा अनुभव हा आपल्या मनाशी ट्युन झालेला असतो. कारण तो जसा आहे, तसाच आपण अनुभवत असतो. त्यात भ्रामकता नसते, कल्पित भाग नसतो, भविष्याची स्वप्न नसतात, फक्त त्या क्षणाचे सत्य असते. जे घडते, ते समोर असते आणि तसेच जीवनानुभवात मुरत जाते. काही वेळा आपण एखादे पुस्तक वाचताना इतके गुंततो की, आजूबाजूचे सारे विसरतो. एखादा सुंदर चित्रपट पाहता-पाहता आपण किती रमतो, आपल्या सुंदर छंदाचा आनंद घेताना वेळेच भानही आपल्याला राहात नाही, हे सारे आनंदाचे क्षण जाणिवेच्या रंध्रारंध्रात शब्दातीत असतो. तो अनुभव फक्त त्याच्या अस्तित्वाबरोबर जगत असतो. स्वत:ला त्या क्षणात झोकून देत, जगण्याचा अनुभव म्हणजे वर्तमानात जगणे. वर्तमानाचा क्षण क्षणिक असतो. तो गतकाळात घेऊनही जातो आणि पुढे काय होणार, हे कुणाला माहीत, पण त्या क्षणाला जाणीवपूर्वक आपल्या संवेदनांनी धरून ठेवायचे ही एक अनुभूती आहे. ती चेतनेबरोबर आपण जगत आहोत, अशाच अनेक प्रकारच्या संधी आपल्या हातातून क्षणाक्षणाला निसटत असतात. कारण आपण सुखाचे ते क्षण त्या क्षणी जगायला विसरतो. अनेक घटनांचा, प्रक्रियेचा अर्थ लावायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा हे क्षण आपल्या हातातून निसटतात. जेव्हा त्या क्षणात आपण जगतो, तेव्हा आपल्याजवळ अवतीभोवती आनंद येतो. त्या क्षणी तो अनुभव आपल्याला प्रिय असेल तर तो एक सुंदर अनुभूती देतो आणि अप्रिय असेल, तर आपल्याला शिकण्याची संधी देतो. कारण आपण स्वत:चे एक विश्व त्या क्षणातून निर्माण करतो. ते विश्व फक्त त्या क्षणासाठीच आणि क्षणापुरते असते. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, आपण भविष्याचे नियोजन करायचे नाही किंवा भूतकाळात काही शिकायचे नाही. हे सगळे करायचेच, पण वर्तमानातले क्षण मात्र पूर्ण जगायचे.काही अनुभव अतिशय वेगळे ठरतात. सूर्यास्त झालेला असतो. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसत असते. अशा वेळी सूर्याच्या रूपाकडे पाहात त्या किरणांची लालीतील आनंद अनुभवतो. त्या क्षणी जर आपले लक्ष कुठल्या तरी किचकट गोष्टीत गुंतले असेल, तर सूर्यास्ताचा तो निर्मळ आनंद आपल्याला घेता येईल का? म्हणजेच त्या क्षणी घडणारे ते क्षण सूर्यास्तासारखे जिवंत असतात. आपल्या साऱ्या संवेदना मग त्या वातावरणाशी जुळतात. अनेक गतविचारांच्या किंवा भविष्यकाळाच्या विचारात न भटकता केवळ साऱ्या संवेदनांतून आयुष्य जसे आहे, तसे अनुभवणे ही खरे तर एक अत्यंत सुंदर आणि ताजीतवानी अशी अनुभूती आहे. अशी अनुभूती दीर्घ काळ घेता येईल असे नाही, पण विचारांच्या पलीकडे जाऊन साऱ्या संवेदना एकवटून वर्तमानातले क्षण जगणे ही एक जीवन कला आहे.