शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

साहित्यिकांचे रुदन

By admin | Updated: October 8, 2015 04:34 IST

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी त्यांचे मौन तोडण्यास तयार नसल्याचा निषेध म्हणून देशातील काही साहित्यिकांनी त्यांना भूतकाळात मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. या सात जणांमध्ये पंडित नेहरु यांची पुतणी नयनतारा सेहगल आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी यांचाही समावेश आहे. लोकशाहीने त्यांना जसा पुरस्कार प्राप्त करण्याचा हक्क दिला आहे तसाच मिळालेला पुरस्कार परत करण्याचाही अधिकार दिला आहे. त्यात कोणाला काही आक्षेप असण्याचे कारण नाही. याआधी देशातील ‘पद्म’ पुरस्कार प्राप्त केलेल्या काही व्यक्तींनी तसेच लष्करी सेवेतील काही जवानांना शौर्य गाजविल्याबद्दल मिळालेली शौर्य पदकेही परत केली आहेत. विद्यमान सरकारच्या एखाद्या कृती वा उक्तीचा निषेध म्हणून असे निर्णय घेतले जातात. याचा अर्थ व्यक्तिगत निषेध व्यक्त करण्याचा तो एक सभ्य मार्ग असतो वा मानला जातो. परंतु यात साऱ्यांचीच एक गफलत होत असते. साहित्यिकाचा त्याच्यातील साहित्यिक गुणांबद्दल आणि जवानाला त्याने गाजविलेल्या शौर्याबद्दल पुरस्काराने वा शौर्यपदकाने गौरव केला जातो. तर समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्द्ल पद्म पुरस्कार प्रदान केला जातो. केवळ शौर्य पदकेच नव्हेत कर पद्म पुरस्कार किंवा साहित्य अकादमी वा संगीत नाटक अकादमी आदिंच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार देशातील जनतेच्या वतीने दिले जातात असे मानले जाते. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत तर हा गौरव संपूर्ण देशाच्या वतीने देशातील प्रथम नागरिकाच्या हस्ते केला जातो. स्वाभाविकच जेव्हां केव्हां असा गौरव वा असे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हां त्यात प्रस्थापितांचा निषेध होतो वा नाही आणि या निषेधाचा काही परिणामही होतो वा नाही हे सांगणे अवघड असले तरी जनतेचा मात्र त्यातून नक्कीच अवमान होत असतो. यामागील तत्वदेखील अगदी साधे आहे. एरवी साहित्यिकाच्या किंवा कलेच्या प्रांतातील लोक सरकारने एखादा कृपालोभ केला की म्हणतात, उपकार केले नाहीत. सरकार आमचे व आम्ही निवडून दिलेले आहे. मग अशावेळी अचानक सरकार भाजपा वा काँग्रेसचे कसे होऊन जाते?