शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

साहित्यिकांचे रुदन

By admin | Updated: October 8, 2015 04:34 IST

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी

देशात रा.स्व.संघ आणि त्या परिवाराशी संबंधित लोक एकप्रकारचा कथित उन्माद निर्माण करीत असताना आणि जातीय व धार्मिक तेढ वाढीस लागत असताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी त्यांचे मौन तोडण्यास तयार नसल्याचा निषेध म्हणून देशातील काही साहित्यिकांनी त्यांना भूतकाळात मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. या सात जणांमध्ये पंडित नेहरु यांची पुतणी नयनतारा सेहगल आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी यांचाही समावेश आहे. लोकशाहीने त्यांना जसा पुरस्कार प्राप्त करण्याचा हक्क दिला आहे तसाच मिळालेला पुरस्कार परत करण्याचाही अधिकार दिला आहे. त्यात कोणाला काही आक्षेप असण्याचे कारण नाही. याआधी देशातील ‘पद्म’ पुरस्कार प्राप्त केलेल्या काही व्यक्तींनी तसेच लष्करी सेवेतील काही जवानांना शौर्य गाजविल्याबद्दल मिळालेली शौर्य पदकेही परत केली आहेत. विद्यमान सरकारच्या एखाद्या कृती वा उक्तीचा निषेध म्हणून असे निर्णय घेतले जातात. याचा अर्थ व्यक्तिगत निषेध व्यक्त करण्याचा तो एक सभ्य मार्ग असतो वा मानला जातो. परंतु यात साऱ्यांचीच एक गफलत होत असते. साहित्यिकाचा त्याच्यातील साहित्यिक गुणांबद्दल आणि जवानाला त्याने गाजविलेल्या शौर्याबद्दल पुरस्काराने वा शौर्यपदकाने गौरव केला जातो. तर समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्द्ल पद्म पुरस्कार प्रदान केला जातो. केवळ शौर्य पदकेच नव्हेत कर पद्म पुरस्कार किंवा साहित्य अकादमी वा संगीत नाटक अकादमी आदिंच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार देशातील जनतेच्या वतीने दिले जातात असे मानले जाते. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत तर हा गौरव संपूर्ण देशाच्या वतीने देशातील प्रथम नागरिकाच्या हस्ते केला जातो. स्वाभाविकच जेव्हां केव्हां असा गौरव वा असे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हां त्यात प्रस्थापितांचा निषेध होतो वा नाही आणि या निषेधाचा काही परिणामही होतो वा नाही हे सांगणे अवघड असले तरी जनतेचा मात्र त्यातून नक्कीच अवमान होत असतो. यामागील तत्वदेखील अगदी साधे आहे. एरवी साहित्यिकाच्या किंवा कलेच्या प्रांतातील लोक सरकारने एखादा कृपालोभ केला की म्हणतात, उपकार केले नाहीत. सरकार आमचे व आम्ही निवडून दिलेले आहे. मग अशावेळी अचानक सरकार भाजपा वा काँग्रेसचे कसे होऊन जाते?