शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

जीवन श्रद्धा

By admin | Updated: June 28, 2016 05:51 IST

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते.

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. त्याच बरोबर लहान-मोठे भूकंप, महापूर त्सुनामी लाटा इत्यादी देवाचा कोप आणि वाढत चातलेले पाप व घटत असलेले पुण्य याचा परिणाम असल्याचेही ते समजतात. पण त्यांना विविध कारणांनी होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत आहोत असे वाटण्याऐवजी त्यांना तो देवाचा कोप वाटतो. परंतु घडणाऱ्या घटनांची शास्त्रशुद्ध, विवेकशील चिकित्सा न करणे अंतिमत: हानिकारक असल्याने अध्यात्मातील शाश्वत मूल्यांना (दया, क्षमा, शांती, करुणा) नख न लावता वैज्ञानिक मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. अध्यात्मिक मन आणि वैज्ञानिक कृतीच्या समन्वयातून निर्माण होणाऱ्या जीवन श्रद्धेचे, कालसुसंगत अध्ययन आणि अध्यापन अपेक्षित आहे. अन्नात विशिष्ट प्रमाणात मीठ असले तरच ते अन्न खावेसे वाटते. ते मीठरहित असेल वा त्यात प्रमाणापेक्षा अधिक मीठ असेल तर ते खावेसे वाटणार नाही. ‘जीवन श्रद्धे’बाबत जे कृष्णमूर्ती मिठाचे अन्नाशी असलेल्या प्रमाणाचे उदाहरण देऊन जीवन श्रद्धेबाबत म्हणतात, ‘बुद्धी मनातील भाव-भावना-संवेदना, डोळस श्रद्धा आणि बुद्धी-प्रामाण्यच जीवन श्रद्धेला बळकटी प्राप्त करून देते.’ ‘जीवन-श्रद्धा’ वाढीस लावणारे शिक्षण असावे असाही ते आग्रह धरतात. आजच्या स्थितीत अनुभवसंपन्न, सशक्त, सद्-सद् विवेकी जीवन-श्रद्धाच सुख-समाधान-शांती स्थापित करू शकेल.देव-देवतांवरील डोळस श्रद्धा, मानसिक ताकद, मनोबल वाढवते हे खरे आहे. पण भाबडा देव-भोळेपणा, त्यातले अनुकरण ‘मन’ कमकुवत करते हे वास्तव आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम त्यांच्या विविध भाषणात आणि संवादात अध्यात्मिक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टी आणि ह्या दोहोंच्या विवेकी समन्वयाच्या कृतीचा आग्रह धरीत. तशी प्रेरणा देत. जीवन श्रद्धा तरी काय? अध्यात्म आणि विज्ञानाचा विवेकी मेळ.-प्रा. यशवंत पाटील