शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जीवन श्रद्धा

By admin | Updated: June 28, 2016 05:51 IST

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते.

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. त्याच बरोबर लहान-मोठे भूकंप, महापूर त्सुनामी लाटा इत्यादी देवाचा कोप आणि वाढत चातलेले पाप व घटत असलेले पुण्य याचा परिणाम असल्याचेही ते समजतात. पण त्यांना विविध कारणांनी होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत आहोत असे वाटण्याऐवजी त्यांना तो देवाचा कोप वाटतो. परंतु घडणाऱ्या घटनांची शास्त्रशुद्ध, विवेकशील चिकित्सा न करणे अंतिमत: हानिकारक असल्याने अध्यात्मातील शाश्वत मूल्यांना (दया, क्षमा, शांती, करुणा) नख न लावता वैज्ञानिक मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. अध्यात्मिक मन आणि वैज्ञानिक कृतीच्या समन्वयातून निर्माण होणाऱ्या जीवन श्रद्धेचे, कालसुसंगत अध्ययन आणि अध्यापन अपेक्षित आहे. अन्नात विशिष्ट प्रमाणात मीठ असले तरच ते अन्न खावेसे वाटते. ते मीठरहित असेल वा त्यात प्रमाणापेक्षा अधिक मीठ असेल तर ते खावेसे वाटणार नाही. ‘जीवन श्रद्धे’बाबत जे कृष्णमूर्ती मिठाचे अन्नाशी असलेल्या प्रमाणाचे उदाहरण देऊन जीवन श्रद्धेबाबत म्हणतात, ‘बुद्धी मनातील भाव-भावना-संवेदना, डोळस श्रद्धा आणि बुद्धी-प्रामाण्यच जीवन श्रद्धेला बळकटी प्राप्त करून देते.’ ‘जीवन-श्रद्धा’ वाढीस लावणारे शिक्षण असावे असाही ते आग्रह धरतात. आजच्या स्थितीत अनुभवसंपन्न, सशक्त, सद्-सद् विवेकी जीवन-श्रद्धाच सुख-समाधान-शांती स्थापित करू शकेल.देव-देवतांवरील डोळस श्रद्धा, मानसिक ताकद, मनोबल वाढवते हे खरे आहे. पण भाबडा देव-भोळेपणा, त्यातले अनुकरण ‘मन’ कमकुवत करते हे वास्तव आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम त्यांच्या विविध भाषणात आणि संवादात अध्यात्मिक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टी आणि ह्या दोहोंच्या विवेकी समन्वयाच्या कृतीचा आग्रह धरीत. तशी प्रेरणा देत. जीवन श्रद्धा तरी काय? अध्यात्म आणि विज्ञानाचा विवेकी मेळ.-प्रा. यशवंत पाटील