शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

जीवन श्रद्धा

By admin | Updated: June 28, 2016 05:51 IST

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते.

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. त्याच बरोबर लहान-मोठे भूकंप, महापूर त्सुनामी लाटा इत्यादी देवाचा कोप आणि वाढत चातलेले पाप व घटत असलेले पुण्य याचा परिणाम असल्याचेही ते समजतात. पण त्यांना विविध कारणांनी होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत आहोत असे वाटण्याऐवजी त्यांना तो देवाचा कोप वाटतो. परंतु घडणाऱ्या घटनांची शास्त्रशुद्ध, विवेकशील चिकित्सा न करणे अंतिमत: हानिकारक असल्याने अध्यात्मातील शाश्वत मूल्यांना (दया, क्षमा, शांती, करुणा) नख न लावता वैज्ञानिक मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. अध्यात्मिक मन आणि वैज्ञानिक कृतीच्या समन्वयातून निर्माण होणाऱ्या जीवन श्रद्धेचे, कालसुसंगत अध्ययन आणि अध्यापन अपेक्षित आहे. अन्नात विशिष्ट प्रमाणात मीठ असले तरच ते अन्न खावेसे वाटते. ते मीठरहित असेल वा त्यात प्रमाणापेक्षा अधिक मीठ असेल तर ते खावेसे वाटणार नाही. ‘जीवन श्रद्धे’बाबत जे कृष्णमूर्ती मिठाचे अन्नाशी असलेल्या प्रमाणाचे उदाहरण देऊन जीवन श्रद्धेबाबत म्हणतात, ‘बुद्धी मनातील भाव-भावना-संवेदना, डोळस श्रद्धा आणि बुद्धी-प्रामाण्यच जीवन श्रद्धेला बळकटी प्राप्त करून देते.’ ‘जीवन-श्रद्धा’ वाढीस लावणारे शिक्षण असावे असाही ते आग्रह धरतात. आजच्या स्थितीत अनुभवसंपन्न, सशक्त, सद्-सद् विवेकी जीवन-श्रद्धाच सुख-समाधान-शांती स्थापित करू शकेल.देव-देवतांवरील डोळस श्रद्धा, मानसिक ताकद, मनोबल वाढवते हे खरे आहे. पण भाबडा देव-भोळेपणा, त्यातले अनुकरण ‘मन’ कमकुवत करते हे वास्तव आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम त्यांच्या विविध भाषणात आणि संवादात अध्यात्मिक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टी आणि ह्या दोहोंच्या विवेकी समन्वयाच्या कृतीचा आग्रह धरीत. तशी प्रेरणा देत. जीवन श्रद्धा तरी काय? अध्यात्म आणि विज्ञानाचा विवेकी मेळ.-प्रा. यशवंत पाटील