शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जीवन श्रद्धा

By admin | Updated: June 28, 2016 05:51 IST

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते.

तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. त्याच बरोबर लहान-मोठे भूकंप, महापूर त्सुनामी लाटा इत्यादी देवाचा कोप आणि वाढत चातलेले पाप व घटत असलेले पुण्य याचा परिणाम असल्याचेही ते समजतात. पण त्यांना विविध कारणांनी होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत आहोत असे वाटण्याऐवजी त्यांना तो देवाचा कोप वाटतो. परंतु घडणाऱ्या घटनांची शास्त्रशुद्ध, विवेकशील चिकित्सा न करणे अंतिमत: हानिकारक असल्याने अध्यात्मातील शाश्वत मूल्यांना (दया, क्षमा, शांती, करुणा) नख न लावता वैज्ञानिक मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. अध्यात्मिक मन आणि वैज्ञानिक कृतीच्या समन्वयातून निर्माण होणाऱ्या जीवन श्रद्धेचे, कालसुसंगत अध्ययन आणि अध्यापन अपेक्षित आहे. अन्नात विशिष्ट प्रमाणात मीठ असले तरच ते अन्न खावेसे वाटते. ते मीठरहित असेल वा त्यात प्रमाणापेक्षा अधिक मीठ असेल तर ते खावेसे वाटणार नाही. ‘जीवन श्रद्धे’बाबत जे कृष्णमूर्ती मिठाचे अन्नाशी असलेल्या प्रमाणाचे उदाहरण देऊन जीवन श्रद्धेबाबत म्हणतात, ‘बुद्धी मनातील भाव-भावना-संवेदना, डोळस श्रद्धा आणि बुद्धी-प्रामाण्यच जीवन श्रद्धेला बळकटी प्राप्त करून देते.’ ‘जीवन-श्रद्धा’ वाढीस लावणारे शिक्षण असावे असाही ते आग्रह धरतात. आजच्या स्थितीत अनुभवसंपन्न, सशक्त, सद्-सद् विवेकी जीवन-श्रद्धाच सुख-समाधान-शांती स्थापित करू शकेल.देव-देवतांवरील डोळस श्रद्धा, मानसिक ताकद, मनोबल वाढवते हे खरे आहे. पण भाबडा देव-भोळेपणा, त्यातले अनुकरण ‘मन’ कमकुवत करते हे वास्तव आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम त्यांच्या विविध भाषणात आणि संवादात अध्यात्मिक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टी आणि ह्या दोहोंच्या विवेकी समन्वयाच्या कृतीचा आग्रह धरीत. तशी प्रेरणा देत. जीवन श्रद्धा तरी काय? अध्यात्म आणि विज्ञानाचा विवेकी मेळ.-प्रा. यशवंत पाटील