शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

परिश्रमाच्या क्षमतांचे सीमोल्लंघन घडवूया...

By किरण अग्रवाल | Updated: October 14, 2021 19:19 IST

Editors view : अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो.

- किरण अग्रवाल

 

रोजीरोटीच्या झगड्यात जगणे जगताना मनुष्याला अनेक संकटे, समस्या वा विवंचनांचा सामना करावा लागतो, हे खरे; परंतु त्यावर मात करून जो पुढे जातो तोच सिकंदर ठरत असतो. मर्यादांच्या सीमा वाट अडवू पाहतात; परंतु त्या उल्लंघून जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. ते कसोटीचे वा धाडसाचे जरी असले तरी त्यातूनच आपल्या क्षमता सिद्ध होतात. अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो. सद्य:स्थितीही संकटांनी आणि अडचणींनी भरलेली व घेरलेली आहे. मात्र, त्यावर मात करून पुढे जायचे तर संधी व क्षमतांच्या कक्षा रुंदावण्याचे सीमोल्लंघन करणे गरजेचे ठरावे. यंदाची विजयादशमी साजरी करताना हेच लक्षात घ्यायला हवे.

 

विजयादशमीच्या सीमोल्लंघनाला ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आहेत. शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करून विजयाची गुढी उंचावण्याचा, उभारण्याचा हा दिवस अगर सण आहे. शस्त्रांची, शमीची तसेच सरस्वतीची पूजा करून तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना या दिनी करण्याचा प्रघात आहे. महिषासुरमर्दिनी दुर्गेपासून ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी संबंधित अनेक दाखले व आख्यायिका या सणाशी संबंधित आहेत. थोडक्यात संकटांचे निर्दालन व समस्यांचे सीमोल्लंघन करून विजयाचा जय जयकार करण्याचा हा दिवस, त्यामुळे आजच्या संदर्भानेही मना मनांवर आलेली निराशेची धूळ झटकून यश, कीर्ती, उत्साह, ऊर्जेची गुढी उभारूया.

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने सार्वत्रिक पातळीवर हबकलेपण ओढवले आहे. व्यक्तिगत आरोग्य असो, की आर्थिक व्यवस्था; प्रत्येकालाच कोरोनाचा फटका बसला आहे. काही उद्योग व्यवसायांना या संकटातही भरभराटीचा योग लाभला हा भाग वेगळा; परंतु आरोग्याच्या संदर्भाने विचार करता कोणीही यापासून बचावू शकलेला नाही. कमी अधिक प्रमाणात, स्वतःच्या अगर आप्तांच्या निमित्ताने प्रत्येकालाच या संकटाची झळ सोसावी लागली आहे. परिणामी, समाजमन दुःखी आहे. कोरोनाच्या लाटांमधून काहीसे बाहेर पडत नाही तोच निसर्गाच्या थपडा खाव्या लागल्या. शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीच्या पूरपाण्याने हिरावून नेला. कोरोनाने काळीज चर्र झाले होते, आता अतिवृष्टीने डोळ्यात पाणी साठले आहे; पण याही स्थितीत संकटांच्या छाताडावर पाय रोवून सारेजण नव्या आयुष्याच्या लढाईला सिद्ध झाले आहेत. समस्यांना न डगमगता, ‘हम होंगे कामयाब’ची जिद्द ठेवून पुढच्या प्रवासाला लागले आहेत, ही समाधानाचीच बाब म्हणता यावी.

संकटांनी ओढवलेली निराशा, निरुत्साह आता ओसरत असून आशेच्या पणत्या त्यासंबंधीचा अंधकार दूर करण्याचा व त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. शेअर मार्केटने विक्रमी पल्ला गाठला आहे. गेलेल्या नोकऱ्या परतू लागल्या असून उद्योगांच्या बंद पडलेल्या चिमण्याही आता धुरळू लागल्या आहेत. विकासाची रांगोळी रेखाटण्यासाठी सरकार, मग ते केंद्रातील असो की राज्यातील; आपापल्या पातळीने प्रयत्न करीत असून ढासळलेली अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. सारे चलन वलनच गतिमान व ऊर्जावान होत आहे. हे एकप्रकारे निराशेच्या सीमा ओलांडून आशेच्या प्रांतात मार्गस्थ होत असलेले समाजमनाचे सीमोल्लंघनच आहे. यंदाच्या विजयादशमीला याच मानसिकतेला बळ देत संकटांवर विजयाची गुढी उभारूया. ‘दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा’, असे आपण म्हणतोच; तर चला संकटालाही संधी मानून आपले धाडस, कल्पना व परिश्रमाच्या क्षमतांचेही सीमोल्लंघन घडवूया. आशादायी मनाने हिरव्याकंच पानांनी व उल्हासदायी रंगाच्या झेंडू फुलांनी आनंदाचे तोरण बांधूया...