शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बेकायदा संरक्षण!

By admin | Updated: April 3, 2017 00:13 IST

राज्य सरकारने आता नव्या विधेयकाच्या स्वरूपात अशा बांधकामांना अभय देणारी योजना आणली आहे.

उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण रद्दबातल ठरविल्यानंतर राज्य सरकारने आता नव्या विधेयकाच्या स्वरूपात अशा बांधकामांना अभय देणारी योजना आणली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक (एमआरटीपी) नावाने शनिवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित करण्याची सवलत देण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे सरकारचे अगोदरचे धोरण एमआरटीपी कायद्यातील तरतुदींच्या आणि विकास नियंत्रण नियमांच्या विरोधात असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते. त्यामुळे एमआरटीपी कायद्यात साधकबाधक सुधारणा करून अत्यंत घाईघाईत हे विधेयक आणण्यात आले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. पण प्रश्न असा आहे की, बेकायदा बांधकामांनी सर्वच शहरांना विळखा घातलेला असताना त्यांना संरक्षण देण्याची सरकारला एवढी घाई का? वाढती अतिक्रमणं आणि बेकायदा बांधकामं ही शहरीकरणावरची मोठी संकटं बनत चालली असताना अशा प्रकारच्या सरकारी संरक्षणामुळे कायदा धाब्यावर बसविणाऱ्या प्रवृतींना बळ मिळत जाते. झोपडपट्ट्यांकडे मतमेटीच्या दृष्टिकोनातून बघितले जात असल्यामुळे शहरं दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. खरं तर या विधेयकातील काही तरतुदींबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवत दुरुस्त्या सुचविणे आवश्यक होते; पण अशा गोष्टींच्या समर्थनार्थ त्यांचेही हात वर होतात, यावरून अशी बांधकामं करणारे तथाकथित विकासक आणि राजकारणी यांचे लागेबांधे किती घट्ट आहेत आणि ते कसे एकमेकांचे ‘इंटरेस्ट’ जपतात त्याचे हे बोलके उदाहरण ठरावे. या नव्या विधेयकामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. भविष्यात या प्रस्तावित कायद्याचा आधार घेऊन विकासकांकडून बेकायदा बांधकामे केली जातील, त्याला पायबंद कसा घालणार? विकासकाने केलेले बांधकाम अधिकृत आहे की बेकायदा, याची माहिती घर खरेदीदारांना नसते. वास्तविक तशी ती असायला हवी. पण अनेकदा खोटी कागदपत्रे दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जाते. अनेकदा विकासक, महापालिकेतील अधिकारी आणि स्थानिक राजकारणी अशा त्रिकुटाच्या हितसंबंधातून बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहतात. याबाबत दिघ्यातील उदाहरण ताजे आहे. जेव्हा अशा बांधकामांवर कारवाई होते, तेव्हा निष्पाप रहिवाशांना त्याचा फटका बसतो. नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमधील अशा बेकायदा बांधकामांमुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची पाळी आली. स्वत:च्या मालकीचं घर, हेच तर मध्यमवर्गीय माणसांचं स्वप्न असतं. पै पै जमविलेली सगळी पुंजी अशा घरांमध्ये गुंतवलेली असते. पण जेव्हा त्यावरच हातोडा पडतो, तेव्हा माणसं अक्षरश: उद्ध्वस्त होतात. बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसाठी सरकार काय करणार, याचा साधा उल्लेखही विधेयकात नाही. त्याबाबत सरकार स्वतंत्र विधेयक आणणार आहे म्हणे!