शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा संरक्षण!

By admin | Updated: April 3, 2017 00:13 IST

राज्य सरकारने आता नव्या विधेयकाच्या स्वरूपात अशा बांधकामांना अभय देणारी योजना आणली आहे.

उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण रद्दबातल ठरविल्यानंतर राज्य सरकारने आता नव्या विधेयकाच्या स्वरूपात अशा बांधकामांना अभय देणारी योजना आणली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक (एमआरटीपी) नावाने शनिवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित करण्याची सवलत देण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे सरकारचे अगोदरचे धोरण एमआरटीपी कायद्यातील तरतुदींच्या आणि विकास नियंत्रण नियमांच्या विरोधात असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते. त्यामुळे एमआरटीपी कायद्यात साधकबाधक सुधारणा करून अत्यंत घाईघाईत हे विधेयक आणण्यात आले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. पण प्रश्न असा आहे की, बेकायदा बांधकामांनी सर्वच शहरांना विळखा घातलेला असताना त्यांना संरक्षण देण्याची सरकारला एवढी घाई का? वाढती अतिक्रमणं आणि बेकायदा बांधकामं ही शहरीकरणावरची मोठी संकटं बनत चालली असताना अशा प्रकारच्या सरकारी संरक्षणामुळे कायदा धाब्यावर बसविणाऱ्या प्रवृतींना बळ मिळत जाते. झोपडपट्ट्यांकडे मतमेटीच्या दृष्टिकोनातून बघितले जात असल्यामुळे शहरं दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. खरं तर या विधेयकातील काही तरतुदींबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवत दुरुस्त्या सुचविणे आवश्यक होते; पण अशा गोष्टींच्या समर्थनार्थ त्यांचेही हात वर होतात, यावरून अशी बांधकामं करणारे तथाकथित विकासक आणि राजकारणी यांचे लागेबांधे किती घट्ट आहेत आणि ते कसे एकमेकांचे ‘इंटरेस्ट’ जपतात त्याचे हे बोलके उदाहरण ठरावे. या नव्या विधेयकामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. भविष्यात या प्रस्तावित कायद्याचा आधार घेऊन विकासकांकडून बेकायदा बांधकामे केली जातील, त्याला पायबंद कसा घालणार? विकासकाने केलेले बांधकाम अधिकृत आहे की बेकायदा, याची माहिती घर खरेदीदारांना नसते. वास्तविक तशी ती असायला हवी. पण अनेकदा खोटी कागदपत्रे दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जाते. अनेकदा विकासक, महापालिकेतील अधिकारी आणि स्थानिक राजकारणी अशा त्रिकुटाच्या हितसंबंधातून बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहतात. याबाबत दिघ्यातील उदाहरण ताजे आहे. जेव्हा अशा बांधकामांवर कारवाई होते, तेव्हा निष्पाप रहिवाशांना त्याचा फटका बसतो. नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमधील अशा बेकायदा बांधकामांमुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची पाळी आली. स्वत:च्या मालकीचं घर, हेच तर मध्यमवर्गीय माणसांचं स्वप्न असतं. पै पै जमविलेली सगळी पुंजी अशा घरांमध्ये गुंतवलेली असते. पण जेव्हा त्यावरच हातोडा पडतो, तेव्हा माणसं अक्षरश: उद्ध्वस्त होतात. बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसाठी सरकार काय करणार, याचा साधा उल्लेखही विधेयकात नाही. त्याबाबत सरकार स्वतंत्र विधेयक आणणार आहे म्हणे!