शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हळवे दलाई लामा

By admin | Updated: April 4, 2017 00:00 IST

तिबेटचे ८१ वर्षांचे धर्मगुरु दलाई लामा रविवारी ‘नमामि ब्रह्मपुत्रा’ महोत्सवासाठी गुवाहाटीला गेले आणि त्यांचे हळवे मन उचंबळून आले

तिबेट या आपल्या मातृभूमीतून परागंदा होऊन गेली ५८ वर्षे भारतात राजाश्रय घेऊन राहिलेले तिबेटचे ८१ वर्षांचे धर्मगुरु दलाई लामा रविवारी ‘नमामि ब्रह्मपुत्रा’ महोत्सवासाठी गुवाहाटीला गेले आणि त्यांचे हळवे मन उचंबळून आले. तिबेटमधील मानसरोवरात (तिबेटी भाषेत त्सांगपो) उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीशी असलेले दलाई लामांचे अतूट असे भावनिक नाते त्यांच्या भाषणातून प्रकट झाले. तिबेटला कायमचा रामराम ठोकून दलाई लामा १७ मे १९५९ रोजी ल्हासामधील उन्हाळी राजप्रासादातून बाहेर पडले होते व भारताच्या सीमेवर येण्यापूर्वी त्यांनी हीच ब्रह्मपुत्रा नदी ओलांडली होती. तेव्हापासून या नदीशी जुळलेले माझे नाते आजही कायम आहे व जेव्हा जेव्हा मी ब्रह्मपुत्रेच्या सान्निध्यात येतो तेव्हा मला तिच्या पावित्र्याची अनुभूती येते, असे दलाई लामा म्हणाले. मी भारत सरकारचा सर्वाधिक काळ वास्तव्यास राहिलेला पाहुणा आहे व भारतीय संस्कृतीचा दूत बनून मी आता या उपकाराची परतफेड करीत आहे, असेही शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या या तत्त्ववेत्याने आवर्जून सांगितले. विनयशीलता आणि शालिनता याचे मूर्तिमंत प्रतीक असलेले दलाई लामा यांनी हेही कबूल केले की, मी तिबेटमध्ये होतो तोपर्यंत मला बौद्ध धर्म हाच सर्वोत्तम धर्म असल्याचे वाटायचे. पण भारतात आलो, भिन्न धर्मीयांच्या संपर्कात आलो आणि प्रेम व करुणा हीच सर्व धर्मांची शिकवण असल्याचे मला पटले. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाने माझे जीवन समृद्ध झाले, असेही त्यांनी नमूद केले. धर्म ही पूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतरांच्या धर्माचाही बौद्धिक भूक भागविण्यासाठी अभ्यास करावा, असे सांगून त्यांनी सक्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरास विरोध केला. या कार्यक्रमानंतर त्यांनी भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्समधून निवृत्त झालेले हवालदार नरेन चंद्र दास यांची आवर्जून घेतलेली भेटदेखील त्यांच्या सहृदयतेची प्रचिती देणारी होती. ५८ वर्षांपूर्वी दलाई लामा आणि त्यांचे २० अंगरक्षक तिबेटची सरहद्द (मॅक्मोहन लाइन) ओलांडून भारतात आले तेव्हा तेथे स्वागत करून त्यांना सुखरूपपणे पुढे आणण्यासाठी त्यावेळी आसाम रायफल्सचे सात जवान खास तैनात केले गेले होत. त्यांच्यापैकी नरेन चंद्र दास हे एकटेच आज हयात आहेत. आज ८० वर्षांच्या असलेल्या या जवानाची दलाई लामा यांनी आवर्जून भेट घेतली व त्यास प्रेमभराने आलिंगन देऊन त्याच्या ऋणाची पोचपावती दिली. दलाई लामा व नरेन चंद्र दास यांची सीमेवर ती पहिली भेट झाली तेव्हा दलाई लामा २३ वर्षांचे, तर दास २२ वर्षांचे होते. दलाई लामा आणि त्यांचे अंगरक्षक घोड्यांवर होते व दास आणि इतर सैनिक त्यांच्यामागे धावत होते. त्या हृद्य आठवणी दोघांनीही मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या होत्या.