शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गुरु तेथ ज्ञान

By admin | Updated: October 7, 2015 05:15 IST

अज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़

- अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेअज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़ ज्या ज्ञानामध्ये बदल होतो ते वृत्ती ज्ञान होय व जे ज्ञान अखंड असते ते स्वरूप ज्ञान होय़ मनुष्य जीवनाची कृतार्थता ही आत्मस्वरुपाविषयीच्या ज्ञानात आहे परंतु ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता श्री गुरुकृपा पाहिजे म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात़गुरू तेथ ज्ञान ! ज्ञानी आत्मदर्शनदर्शनी समाधान ! आयी जैसे!!ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत म्हणून सांगितली आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे वैशिष्ट्यच असे, की त्यांनी दिलेला दृष्टांतसुद्धा सिद्धांत असतो़ वरील ओवी म्हणजे देखील एक महत्त्वाचा सिद्धांतच आहे़. साकार वस्तूच्या ज्ञानात बदल होऊ शकतो़ एखादी आकारमान वस्तू कोणाला लहान वाटते तर तीच वस्तू कोणाला मोठी वाटते, परंतु निराकार परमात्म्याचे ज्ञान हे सर्वांना सारखेच होते म्हणून ज्यामध्ये क मी अधिक असा द्वंद्वात्मक बदल नाही ते स्वरूप ज्ञान होय़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात स्पष्ट सांगतात की, सर्वाघरी राम देहादेही एक! देह अनेक असतील परंतु त्यातील आत्मतत्त्व हे एकच आहे़ संत ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये देव दिसला ही कथा प्रसिद्ध आहे़ संत तुकाराम महाराजांनी पक्ष्यांमध्ये देव पाहिला, संत एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, संत माणकोजी महाराज बोधले यांनी सापामध्ये देव पाहिला. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे ही जाणीव होण्याकरिता स्वरुप ज्ञानाची आवश्यकता आहे़मायकल एंजेलो जगप्रसिद्ध चित्रकार. त्यांच्याकडे एक मनुष्य गेला आणि ‘माझे’ चित्र काढा असे म्हणाला़ मायकल एंजेलोने थोडा विचार केला की हा मनुष्य ‘माझे’ चित्र काढा असे म्हणतोय़ मायकल एंजेलो आत गेला आणि थोड्या वेळाने एक गुंडाळी केलेला कागद आणला व त्याच्या हातात देऊन सांगितले हे घ्या तुमचे चित्र. त्या गृहस्थाने तो कागद उघडला आणि पाहिले तर तो कागद पूर्णपणे कोरा होता़ त्यांनी विचारलं हे काय हा कागद तर पूर्णपणे कोरा आहे़ मायकलने सांगितले, होय. हेच तुझे खरे चित्र आहे इतर चित्रकार तुझ्या शरीराची चित्रे काढतील परंतु तुला तुझे चित्र पाहिजे तर हेच ते होय़ आपले खरे चित्र म्हणजेच आपले स्वरूप होय व ते कोणताही आकार, रंग, अवयव नसलेले आहे़ तेच स्वरूप ज्ञान होय़ याकरिता श्रीगुरुंनाच शरण गेले पाहिजे़