शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भीषण दरी

By admin | Updated: November 7, 2015 03:28 IST

भारतीय स्त्री अन्यायग्रस्त असल्याच्या मुद्यावर दुमत होऊच शकत नाही; मात्र जगातील अनेक प्रभावशाली उद्योग आणि संस्थांची सल्लागार म्हणून विख्यात असलेल्या ‘मॅकिन्सी अ‍ॅण्ड

भारतीय स्त्री अन्यायग्रस्त असल्याच्या मुद्यावर दुमत होऊच शकत नाही; मात्र जगातील अनेक प्रभावशाली उद्योग आणि संस्थांची सल्लागार म्हणून विख्यात असलेल्या ‘मॅकिन्सी अ‍ॅण्ड कंपनी’ने नुकतीच समोर आणलेली आकडेवारी तर फारच धक्कादायक आहे. या आकडेवारीनुसार, ज्या कामाचा आर्थिक मोबदला मिळत नाही, अशी कामे भारतीय महिलांना पुरुषांच्या तुलनेत दहा पट अधिक करावी लागतात. जागतिक मापदंडाच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीपेक्षाही जास्त आहे. भारताच्या एकूण मनुष्यबळामधील स्त्रियांचा वाटा केवळ २४ टक्के, तर जागतिक पातळीवर हे प्रमाण ४० टक्के एवढे आहे. अनुत्पादक कामांमुळे महिलांचा समावेश उत्पादक मनुष्यबळात होऊ शकत नाही आणि परिणामी अर्थव्यवस्थेमधील त्यांचे योगदानही नगण्यच राहते. भारतीय अर्थव्यवस्थेमधील महिलांचा वाटा केवळ १६ टक्के एवढाच दिसतो. अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्ये हे प्रमाण ४१ टक्के आहे, तर आफ्रिका खंडातील मागासलेल्या देशांमध्येही ते ४० टक्क्यांच्या घरात आहे. भारतीय महिलांचा बहुतांश वेळ स्वयंपाक, धुणीभांडी, मुलांचे संगोपन इत्यादी कामांमध्येच खर्ची पडतो, हे या दारुण वस्तुस्थितीमागचे प्रमुख कारण आहे. भारतीय स्त्रिया करीत असलेल्या अनुत्पादक कामाचे योग्यरीत्या मूल्यमापन केल्यास, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षी ३०० अब्ज डॉलर्सची भर पडेल, असे मॅकिन्सीच्या या अहवालात म्हटले आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक असमानता दिसते. त्यातही लंैगिक समानता या निकषावर वेगवेगळ्या राज्यांमधील स्थितीमध्ये खूप फरक आहे. स्त्री-पुरुषांमधील आणि लंैगिक समानतेच्या निकषावरील विविध राज्यांमधील दरी मिटविण्यात यश आल्यास, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. मुलींच्या शिक्षणास अधिक चालना दिल्यास, कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार केल्यास आणि अधिकाधिक स्त्रियांना वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्यास, हे चित्र प्रत्यक्षात उतरू शकते; मात्र त्यासाठी केवळ शासकीय पातळीवर होणारे प्रयत्नच पुरेसे ठरणार नाहीत, तर पुरुषांनाही संकुचित मनोवृत्तीचा त्याग करून, स्त्रीला बरोबरीचे स्थान द्यावे लागेल. हे ज्या दिवशी होईल, तो भारतासाठी खरा सुदिन असेल!