शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भीषण दरी

By admin | Updated: November 7, 2015 03:28 IST

भारतीय स्त्री अन्यायग्रस्त असल्याच्या मुद्यावर दुमत होऊच शकत नाही; मात्र जगातील अनेक प्रभावशाली उद्योग आणि संस्थांची सल्लागार म्हणून विख्यात असलेल्या ‘मॅकिन्सी अ‍ॅण्ड

भारतीय स्त्री अन्यायग्रस्त असल्याच्या मुद्यावर दुमत होऊच शकत नाही; मात्र जगातील अनेक प्रभावशाली उद्योग आणि संस्थांची सल्लागार म्हणून विख्यात असलेल्या ‘मॅकिन्सी अ‍ॅण्ड कंपनी’ने नुकतीच समोर आणलेली आकडेवारी तर फारच धक्कादायक आहे. या आकडेवारीनुसार, ज्या कामाचा आर्थिक मोबदला मिळत नाही, अशी कामे भारतीय महिलांना पुरुषांच्या तुलनेत दहा पट अधिक करावी लागतात. जागतिक मापदंडाच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीपेक्षाही जास्त आहे. भारताच्या एकूण मनुष्यबळामधील स्त्रियांचा वाटा केवळ २४ टक्के, तर जागतिक पातळीवर हे प्रमाण ४० टक्के एवढे आहे. अनुत्पादक कामांमुळे महिलांचा समावेश उत्पादक मनुष्यबळात होऊ शकत नाही आणि परिणामी अर्थव्यवस्थेमधील त्यांचे योगदानही नगण्यच राहते. भारतीय अर्थव्यवस्थेमधील महिलांचा वाटा केवळ १६ टक्के एवढाच दिसतो. अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्ये हे प्रमाण ४१ टक्के आहे, तर आफ्रिका खंडातील मागासलेल्या देशांमध्येही ते ४० टक्क्यांच्या घरात आहे. भारतीय महिलांचा बहुतांश वेळ स्वयंपाक, धुणीभांडी, मुलांचे संगोपन इत्यादी कामांमध्येच खर्ची पडतो, हे या दारुण वस्तुस्थितीमागचे प्रमुख कारण आहे. भारतीय स्त्रिया करीत असलेल्या अनुत्पादक कामाचे योग्यरीत्या मूल्यमापन केल्यास, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षी ३०० अब्ज डॉलर्सची भर पडेल, असे मॅकिन्सीच्या या अहवालात म्हटले आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक असमानता दिसते. त्यातही लंैगिक समानता या निकषावर वेगवेगळ्या राज्यांमधील स्थितीमध्ये खूप फरक आहे. स्त्री-पुरुषांमधील आणि लंैगिक समानतेच्या निकषावरील विविध राज्यांमधील दरी मिटविण्यात यश आल्यास, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. मुलींच्या शिक्षणास अधिक चालना दिल्यास, कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार केल्यास आणि अधिकाधिक स्त्रियांना वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्यास, हे चित्र प्रत्यक्षात उतरू शकते; मात्र त्यासाठी केवळ शासकीय पातळीवर होणारे प्रयत्नच पुरेसे ठरणार नाहीत, तर पुरुषांनाही संकुचित मनोवृत्तीचा त्याग करून, स्त्रीला बरोबरीचे स्थान द्यावे लागेल. हे ज्या दिवशी होईल, तो भारतासाठी खरा सुदिन असेल!