शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

या बिचा-यांना काही द्या रे...

By admin | Updated: May 11, 2015 05:23 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम परिषद आणि महादेवराव जानकरांचा पक्ष (काय बरे त्याचे नाव?) या तीन पक्षांना त्या रामदास आठवल्यांसारखे अजून सत्तेबाहेर उन्हात उभे रहावे लागत आहे.

राज्याची सत्ता हातात येऊन सहा महिने झाले तरी आपण मंत्रिमंडळाबाहेर, समन्वय समितीबाहेर आणि सरकारच्या सगळ्या पदांपासून दूरच राहिलो असल्याची खंत महायुतीतील अन्य पक्षांत, म्हणजे त्यांच्या नेत्यांत आहे. फडणवीसांच्या सरकारात त्यांच्या भाजपाखेरीज एकट्या शिवसेनेचाच समावेश आहे आणि तोही अगदी वळचणीखाली येणाऱ्या जागा त्यांना देऊन करून घेतला आहे. सेनेला केंद्रात केवळ एकच फुटकळ मंत्रिपद आणि राज्यात शिल्लक उरलेली काही पदे एवढ्यावर शिवसेनेने सगळा सन्मान गिळून आघाडी धर्माचा टिळा लावून घेतला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम परिषद आणि महादेवराव जानकरांचा पक्ष (काय बरे त्याचे नाव?) या तीन पक्षांना त्या रामदास आठवल्यांसारखे अजून सत्तेबाहेर उन्हात उभे रहावे लागत आहे. आम्ही तुम्हाला एवढी मदत केली तरी आमची अशी उपेक्षा का, असा प्रश्न घेऊन हे पक्ष आता एकत्र आले आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या त्यांच्या संतप्त सभेत सरकार पक्षाला ते त्यांच्या आतापर्यंतच्या उपेक्षेबाबतचा प्रश्न विचारणार आहेत. येत्या काही दिवसांत फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यात भाजपाच्या सहा, सेनेच्या चार आणि इतर दोन अशा बारा मंत्र्यांचा समावेश व्हायचा आहे. याचवेळी सरकारच्या इतर समित्यांच्या अध्यक्षांची नावेही पक्की व्हायची आहेत. त्यामुळे पूर्वी नाही तर आता तरी आमचा विचार व्हावा ही या टांगलेल्या पक्षांची मागणी आहे. सत्ताधारी आघाडीत समन्वय राखण्यासाठी जी समिती नेमली गेली ती सरकारी नाही. पण त्याही समितीत या घटकांना कोणी घेतले नाही. एकेकाळी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा आवाज मोठा होता आणि शिवसंग्रामच्या विनायक मेट्यांची डरकाळीही मोठी होती. शेट्टींनी पवारांना जेरीला आणले होते आणि मेट्यांची राष्ट्रवादीतली वटही मोठी होती. पण नव्या सरकारने त्यांना गृहीत धरून मागे फिरविण्यापलीकडे काही केले नाही. त्यांना पदे नाहीत, मान नाही, निर्णयात स्थान नाही आणि ते सत्तेत असल्याचे आता कुणाला वाटतही नाही. ही अवस्था त्याही बिचाऱ्यांना सहन न होणारी व त्यांच्या जुन्या स्वाभिमानाला डिवचणारी आहे. या पक्षांची ताकद मोठी नसल्याने त्यांच्या बंडाची सरकारला भीती नाही. भाजपा व सेना यांचे संख्याबळ सरकारला तारू शकण्याएवढे मोठे आहे. त्यामुळे कुरकुर करणे, रुसवे-फुगवे दाखविणे याखेरीज त्यांना फारसे काही करताही येत नाही. त्यांच्या तशा दुबळेपणाची चांगली जाणीव असलेले सरकार त्यांची फारशी दखलही त्याचमुळे घेत नाही. आताचा त्यांचा ‘बैठकी’ पवित्रा त्यातून पुढे आला आहे. काहीच न केले तर आज सरकार विचारत नाही, उद्या लोकही विचारणार नाहीत हे त्यांचे भय आहे. लहान संघटनांची एक व्यथा आणखीही असते. त्यांच्यात असलेला अनुयायांचा वर्ग आपल्या पुढाऱ्याला एखादे वजनदार पद मिळेल या आशेवर त्याच्या मागे राहत असतो. मात्र तो पुढारीच असा महिनोन्महिने कुजताना दिसला की त्यांच्याही आशा मावळू लागतात व ते नवे पुढारी शोधू लागतात. आघाडीतील उपेक्षित पुढाऱ्यांना भेडसावणारी एक चिंता हीदेखील आहे. ज्या विरोधकांची त्यांनी साथ सोडली त्यांचा आनंद तर यामुळे वाढताच राहणार. ज्यांना सोडले ते आपले राहिले नाहीत आणि ज्यांना जवळ केले ते आपले म्हणत नाहीत ही खरोखरीच कमालीची केविलवाणी अवस्था आहे. ऊस उत्पादकांचे नेते शेट्टी यांचा अपवाद वगळला तर बाकीचे सारे कोणत्या ना कोणत्या भावनात्मक मुद्यावर आपले राजकारण चालविणारे आहेत. या माणसांचे आधार दुबळे असतात आणि त्यांची सोबतही विश्वासाची नसते. विचारांचे वा तत्त्वांचे राजकारण मागे पडून आता खूप काळ लोटला आहे. तत्त्वनिष्ठेच्या राजकारणाची जागा कार्यक्रमाच्या राजकारणाने घेऊनही खूप दिवस झाले आहेत. भावनांचे, एकेका महापुरुषाच्या नुसत्याच स्मरणाचे राजकारणही आता लोकांना हास्यास्पद वाटू लागले आहे. या स्थितीत कोणताही व्यापक कार्यक्रम हाती नसणारे, पक्ष प्रबळ नसणारे व प्रादेशिक नेतृत्वापासून दूर झालेले एकाकी लोक कशाचे आणि कुणाचे पुढारीपण करणार? त्यांचे राजकारण उद्या संपले तरी त्यामुळे कोणाला दु:ख व्हायचे आहे? खरेतर हा त्यांनी टिकून राहण्यासाठी चालविलेल्या गमजांचा भाग आहे. त्यामुळे त्याला कुरबुरीखेरीज दुसरा दर्जा नाही आणि राज्यानेही त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये अशी एक म्हण आपल्यात आहे. महायुतीत सामील झालेल्या या धाकट्यांची कथा नुसती दयनीयच नाही तर हास्यास्पदही आहे. या मंडळीचे एक दु:ख आणखीही आहे आणि ते त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. सध्याच्या सत्ताधारी युतीला त्यांनी ज्यांच्याविरुद्ध जीवाच्या आकांताने जाऊन साथ दिली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची म्हणजे शरद पवारांची मदत व सल्ला त्यांची सत्ताधारी महायुतीच घेत असल्याचे त्यांना अनेकवार पहावे लागले आहे. परिणामी, अरेरे, ज्यांच्याविरुद्ध आमची मदत घेतली आणि त्यांच्याशीच तुम्ही सल्लामसलत करता आहात याचे आम्हाला होणारे दु:ख मोठे आणि जास्तीचे अपमानित करणारे आहे हे तरी सरकारातल्या तुम्हाला जाणवते काय, हा त्या बिचाऱ्यांचा प्रश्न आहे.