शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

दारुबंदीसाठी पुन्हा लढाई

By admin | Updated: February 6, 2016 03:05 IST

गावात ग्रामपंचायतचा पॅनेल निवडून आणणे सोपे, पण दारुबंदी कायद्यातील विचित्र धोरणांमुळे बाटली आडवी करणे अवघड आहे याचा अनुभव सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा

गावात ग्रामपंचायतचा पॅनेल निवडून आणणे सोपे, पण दारुबंदी कायद्यातील विचित्र धोरणांमुळे बाटली आडवी करणे अवघड आहे याचा अनुभव सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा अहमदनगर जिल्हाही घेतो आहे. आपल्याकडे कुठल्याही निवडणुकीत निवडून येण्यासाठी मतदानाच्या टक्केवारीची सक्ती नाही. झालेल्या मतदानात जो सर्वाधिक मते घेईल तो विजयी होतो; परंतु दारुबंदीसाठीच्या निवडणुकीत एवढेच पुरेसे नाही. गावातील एकूण महिला मतदारांपैकी पन्नास टक्के महिलांची मते विरोधात पडली, तरच दारुबंदी होईल अशी विचित्र सक्ती या कायद्यात आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी राजकीय निवडणुकांतील साम, दाम, दंड, भेद आता दारुबंदीच्या निवडणुकांतही बघायला मिळू लागला आहे. हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावापासून जवळ असलेल्या निघोज येथे प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी दारुबंदीसाठी महिलांचे मतदान झाले. गावात एकूण ३ हजार ९३२ महिला मतदार आहेत. त्यापैकी २ हजार १२० महिलांनी मतदान केले. यातील १ हजार ७९५ मते दारुबंदीच्या बाजूने पडली; परंतु एवढी भरभक्कम मते मिळूनही दारुबंदी तांत्रिक अडचणीत सापडली. नियमानुसार पन्नास टक्के म्हणजे १ हजार ९६६ मते पडणे बंधनकारक आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. वास्तविकत: कायद्यानुसार दारुबंदीची निवडणूक ही जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत घ्यायला हवी; परंतु या गावात राज्य उत्पादन शुल्क विभागानेच निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. म्हणजे चोराकडेच तिजोरीच्या चाव्या सोपविण्याचा प्रकार घडला. या विभागाने ना महिलांना वेळेवर सूचना दिल्या, ना मतदान केंद्रांचे नाव अगोदर कळविले. केवळ सोपस्कार म्हणून मतदान उरकले. मताची टक्केवारी कमी कशी राहील याचीच त्यांनी अधिक काळजी घेतली. अण्णा हजारे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया रद्द करुन नव्याने निवडणूक घेण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. या निमित्ताने दारुबंदी कायद्यातील विसंगती पुन्हा समोर आली आहे. हजारे यांनी दारुबंदीसाठी मोठी लढाई लढली. त्यातून २००९ मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ मध्ये सुधारणा केली. हा सुधारित कायदाही अण्णांना आता अर्धवट वाटू लागला आहे. त्यावेळी सरकारसोबत केलेल्या चर्चेचा सर्व तपशील अण्णांकडे आजही आहे. इतर निवडणुकांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असते. दारुबंदीसाठीचे मतदान मात्र, सकाळी ८ ते दुपारी २ एवढाच वेळ चालते. दारुबंदीसाठी मतदारांची अगोदर पडताळणी केली जाते. म्हणजे महिला खरोखरच गावातील रहिवासी आहेत का? त्या मतदार आहेत का ? याची खातरजमा होते. आमदार, खासदार निवडून देताना अशी पडताळणी होत नाही. पण येथे होते. त्यामुळे ग्रामसभा, संसदेपेक्षाही राज्यातील ‘परमीटराज’ बळकट व निर्धोक आहे. दारू पिणे आरोग्यास अपायकारक असल्याचे सरकार सांगते. दुसरीकडे सरकारने ज्यांच्याकडे दारु पिण्याचा परवाना आहे अशा व्यक्तींना बारा बाटल्या जवळ बाळगण्याची मुभा दिली आहे. इतर राज्यात आठवड्याला दोन बाटल्यांची मुभा, तीही डॉक्टरी सल्ल्याने. मग, महाराष्ट्रात दारुचा एवढा ‘ओव्हरडोस’ का? असाही प्रश्न आहे. या सर्व विसंगतीबाबत अण्णा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. प्रसंगी संघर्षाची त्यांची भूमिका आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या राजूर गावात दारुबंदी झाली आहे. मात्र, तेथे जेवढी परवानाधारक दुकाने होती त्यापेक्षा अधिक आता अवैध दुकाने आहेत. म्हणजे दारुबंदीनंतर समस्या संपण्यापेक्षा अधिक तीव्र बनतेय. दारुविक्रेत्यांच्या संघटित शक्तीपुढे महिला शक्ती हतबल बनली आहे. शनी चौथरा व दारुबंदी या दोन्ही गोष्टी महिलांसाठी सध्या अवघड बनल्यात. - सुधीर लंके