शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित निवाडा

By admin | Updated: June 14, 2016 04:14 IST

‘तुमचं काम चित्रपटांना प्रमाणित करण्याचं आहे, सेन्सॉर करण्याचं नाही’, अशा अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात केन्द्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला

‘तुमचं काम चित्रपटांना प्रमाणित करण्याचं आहे, सेन्सॉर करण्याचं नाही’, अशा अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात केन्द्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला खडसावले तेव्हांच ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार हे दिसून आले होेते. तसा तो आता झाला आहे. न्यायालयाने चित्रपटातील केवळ एका प्रसंगाला कातरी लावली असून दोन दिवसात हा चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणित करा असा आदेशही मंडळाला दिला आहे. संपूर्ण पंजाब राज्य आज अंमली पदार्थाच्या घातक विळख्यात अडकले असून या भयाण वास्तवाचेच यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापि अनुराग कश्यप या संवेदनशील निर्माता-दिग्दर्शकाचा हा चित्रपट पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाच्या कचाट्यात सापडला आणि प्रदर्शनापूर्वीच ‘उडता पंजाब’ला मन:पूत प्रसिद्धी मिळून गेली. निहलानी यांनी चित्रपटाच्या शीर्षकापासून आक्षेप घेतले व चित्रपटातील असंख्य दृष्यांना कातरी लावण्याचे तर काही शब्दप्रयोग गाळून टाकण्याचे फर्मान काढले. ते इतके अतार्किक होते की निर्मात्यानी निहलानी यांच्या आज्ञेचे पालन केले असते तर प्रेक्षकांना दाखवायला हाती काहीच शिल्लक राहिले नसते. परिणामी निर्मात्याला न्यायालयाचा दरवाजा खटखटविण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सोमवारी आपला निवाडा जाहीक करताना न्यायालयाने हे स्पष्ट केले की त्याने चित्रपटाच्या पटकथेचा संपूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतरच या चित्रपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचते हा निहलानी आणि त्यांच्या गणगोताचा आक्षेप धुडकावून लावणारा निवाडा जाहीर केला. चित्रपटांच्या निर्मितीसंबंधीच्या सिनेमाटोग्राफ अ‍ॅक्टमध्ये ‘सेन्सॉर’ असा शब्दच आलेला नाही असे सांगून न्यायालयाने पुढे म्हटले की, तरीही कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन मंडळाला एखाद्या चित्रपटातील त्यांच्या मते आक्षेपार्ह भाग काढावासा वाटला तर तसा निर्णय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या आधीन राहूनच घेतला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे आणि एकप्रकारे मंडळाच्या दृष्टीने दिशादर्शक आहे. न्यायालयाच्या सदर निवाड्यामुळे व्यक्तिश: निहलानी यांचा मुखभंग झाला असला तरी न्यायालयाने ओढलेल्या कोरड्याचे वळ निहलानी यांची निवड करणाऱ्यांच्या व पाठराखण करणाऱ्यांच्याही अंगावर उठणारे आहेत. केवळ ‘आपला माणूस’ या एकाच निकषावर भलत्या जागी भलत्या लोकांची योजना केली की सरकारलाही कसे खाली पाहावे लागते हेही यातून दिसून आले. मात्र त्याचा परिणाम दिसेलच याची खात्री देता येत नाही.