शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बेगडी प्राणिप्रेम!

By admin | Updated: June 14, 2016 04:13 IST

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, राज्यातला शिवसेना-भाजपचा हा खेळ काही अंशी केंद्रातही सुरू आहे. मुंबईत सुरू असलेले पोस्टरवॉर आणि दिल्लीत सुरू असलेले प्राणिप्रेमाचे ‘वॉर’ असेच

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, राज्यातला शिवसेना-भाजपचा हा खेळ काही अंशी केंद्रातही सुरू आहे. मुंबईत सुरू असलेले पोस्टरवॉर आणि दिल्लीत सुरू असलेले प्राणिप्रेमाचे ‘वॉर’ असेच काहीसे आहे. बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालून मारण्यात आले. आतापर्यंत उद्योजकांच्या भल्यासाठी जंगले साफ होत असताना शांत असलेल्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी अचानक पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर संतापल्या. हे सर्वात मोठे हत्त्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला. पिकांचे रक्षण करण्यासाठी राज्यांच्या विनंतीवरून प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती देण्यात आली असून, ती विशिष्ट परिसरापुरती आणि कालावधीपुरती मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्रात डुकरांचा, तळ कोकणात हत्तींचा, सोलापुरात काळविटांचा, चंद्रपुरात डुकरांचा आणि अमरावतीत काळवीट-नीलगायींचा किती त्रास होतो, हे तेथील शेतकरीच जाणोत. या प्राण्यांचे कळप एकदा का शेतात घुसले की, रातोरात शिवार साफ. आधीच दुष्काळ, त्यात प्राण्यांचा हा त्रास. २०१४ साली राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान चारपट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकरांनी पिकांचे नुकसान करणाऱ्या त्या त्या राज्यांतील प्राण्यांना गोळ्या घालण्याची परवानगी वन विभागाला दिली आहे. त्याची अंमलबजावणी करताना गेल्याच महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात १०० डुकरांचा खातमा करण्यात आला. अलीकडेच बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालण्यात आल्या. प्रश्न प्राणी हवे की माणूस असा नाहीच कारण प्राथमिकता माणसालाच द्यावी लागेल. पण मग अख्खे आयुष्य प्राणिप्रेमावर राजकारण करणाऱ्यांचे काय? त्यांनी खरे तर या प्रश्नावरून मंत्रिपदाचा राजीनामाच द्यायला हवा. मेनका गांधी यांनी ते धैर्य दाखविले नाही. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारपेक्षा हे सरकार पर्यावरणासाठी अधिक घातक असूनही मेनका गांधी शांत का, हे न उलगडणारे कोडे आहे. नीलगायींच्या निमित्ताने मात्र त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींची साथ कायम राहील, असे त्यांना वाटू शकते. म्हणजे ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’. शेतकऱ्यांसाठी जावडेकरांनी मारल्यासारखे करायचे आणि पर्यावरणप्रेमींसाठी मेनकांनी रडल्यासारखे करायचे. कुठलाच मतदार आपल्यापासून दूर जाता कामा नये यासाठीचा हा खेळ आहे.