शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

बेगडी प्राणिप्रेम!

By admin | Updated: June 14, 2016 04:13 IST

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, राज्यातला शिवसेना-भाजपचा हा खेळ काही अंशी केंद्रातही सुरू आहे. मुंबईत सुरू असलेले पोस्टरवॉर आणि दिल्लीत सुरू असलेले प्राणिप्रेमाचे ‘वॉर’ असेच

‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, राज्यातला शिवसेना-भाजपचा हा खेळ काही अंशी केंद्रातही सुरू आहे. मुंबईत सुरू असलेले पोस्टरवॉर आणि दिल्लीत सुरू असलेले प्राणिप्रेमाचे ‘वॉर’ असेच काहीसे आहे. बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालून मारण्यात आले. आतापर्यंत उद्योजकांच्या भल्यासाठी जंगले साफ होत असताना शांत असलेल्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी अचानक पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर संतापल्या. हे सर्वात मोठे हत्त्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला. पिकांचे रक्षण करण्यासाठी राज्यांच्या विनंतीवरून प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती देण्यात आली असून, ती विशिष्ट परिसरापुरती आणि कालावधीपुरती मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्रात डुकरांचा, तळ कोकणात हत्तींचा, सोलापुरात काळविटांचा, चंद्रपुरात डुकरांचा आणि अमरावतीत काळवीट-नीलगायींचा किती त्रास होतो, हे तेथील शेतकरीच जाणोत. या प्राण्यांचे कळप एकदा का शेतात घुसले की, रातोरात शिवार साफ. आधीच दुष्काळ, त्यात प्राण्यांचा हा त्रास. २०१४ साली राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान चारपट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकरांनी पिकांचे नुकसान करणाऱ्या त्या त्या राज्यांतील प्राण्यांना गोळ्या घालण्याची परवानगी वन विभागाला दिली आहे. त्याची अंमलबजावणी करताना गेल्याच महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात १०० डुकरांचा खातमा करण्यात आला. अलीकडेच बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालण्यात आल्या. प्रश्न प्राणी हवे की माणूस असा नाहीच कारण प्राथमिकता माणसालाच द्यावी लागेल. पण मग अख्खे आयुष्य प्राणिप्रेमावर राजकारण करणाऱ्यांचे काय? त्यांनी खरे तर या प्रश्नावरून मंत्रिपदाचा राजीनामाच द्यायला हवा. मेनका गांधी यांनी ते धैर्य दाखविले नाही. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारपेक्षा हे सरकार पर्यावरणासाठी अधिक घातक असूनही मेनका गांधी शांत का, हे न उलगडणारे कोडे आहे. नीलगायींच्या निमित्ताने मात्र त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींची साथ कायम राहील, असे त्यांना वाटू शकते. म्हणजे ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’. शेतकऱ्यांसाठी जावडेकरांनी मारल्यासारखे करायचे आणि पर्यावरणप्रेमींसाठी मेनकांनी रडल्यासारखे करायचे. कुठलाच मतदार आपल्यापासून दूर जाता कामा नये यासाठीचा हा खेळ आहे.