शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
6
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
7
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
8
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
9
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
10
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
11
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
12
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
13
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
14
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
15
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
16
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
17
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
18
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
19
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
20
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

यांचेही पाय मातीचेच!

By admin | Updated: April 6, 2017 00:13 IST

एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपताना ज्या दोन नेत्यांनी तमाम भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या

एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपताना ज्या दोन नेत्यांनी तमाम भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, त्यापैकी एक नरेंद्र मोदी आणि दुसरे अरविंद केजरीवाल ! पुढे मोदी पंतप्रधान पदावर, तर केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. पूर्ण राज्याचा दर्जा नसलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर केजरीवाल कधीच खूश नव्हते. त्यांची नजर पंतप्रधान पदावर होती आणि आताही आहे. त्यांनी ते दडविण्याचा प्रयत्नही केला नाही; मात्र आज कारकिर्दीचा जवळपास अर्धा टप्पा पूर्ण झाला असताना, त्यांचे ते स्वप्न मुठीतील वाळूप्रमाणे निसटू लागल्यासारखे भासू लागले आहे. राष्ट्रबांधणीच्या ध्येयाने भारून, भ्रष्टाचारविरोधी लढ्याला आयुध बनवून राजकीय समरांगणात उडी घेतलेल्या केजरीवालांच्या प्रामाणिकपणावरच आज शंका घेतली जाऊ लागली आहे. त्यांनी क्षणभर उसंत घेऊन मागे वळून बघितल्यास, अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात हिरिरीने सहभागी झालेला स्वप्नवेडा, ध्येयवेडा तरुण कधीच हरपल्याची जाणीव त्यांना स्वत:लाच होऊ शकते. अर्थात ते हे कधीच मान्य करणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केजरीवालांवर गुदरलेल्या मानहानीच्या खटल्यात केजरीवालांची बाजू मांडत असलेले प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या मानधनाच्या मुद्द्यावरून केजरीवालांच्या प्रतिमेला जबर धक्का बसला आहे, हे मात्र त्यांचे समर्थकही मान्य करतील. दिल्लीची सत्ता मिळाल्यावर गाडी, बंगला इत्यादी शासकीय सुविधा घेणार नसल्याचे सांगणारे केजरीवाल आता त्यांच्या वैयक्तिक खटल्याचा खर्चही दिल्ली सरकारला करायला सांगू लागले आहेत, याला नैतिक अध:पतन नव्हे तर काय म्हणावे? यापूर्वी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी, दिल्ली सरकारने देशभरातील प्रसारमाध्यमांना दिलेल्या जाहिरातींची ९७ कोटी रुपयांची रक्कम केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेही केजरीवाल व त्यांच्या पक्षाची भरपूर शोभा झाली होती. त्यामध्ये आता भर पडली आहे. सार्वजनिक जीवनातील सचोटी व प्रामाणिकपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला हे खचितच शोभणारे नाही. प्रारंभी केजरीवाल व त्यांच्या पक्षाभोवती जे नैतिकतेचे प्रभामंडळ शोभत होते, ते आता पार निस्तेज भासू लागले आहे. केजरीवालांकडे पैसा नसल्यास मोफत खटला लढविण्याच्या राम जेठमलानी यांच्या वक्तव्याचा आधार आता आम आदमी पक्ष घेऊ लागला आहे; पण थेंबाने गेलेली इज्जत हौदाने परत येत नसते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. दिल्लीच्या जनतेने फार मोठ्या अपेक्षेने केजरीवालांच्या हाती सत्ता सोपवली होती. उर्वरित देशातील जनताही राजधानीतील जनतेने केलेल्या प्रयोगाकडे मोठ्या अपेक्षेने बघत होती. दुर्दैवाने केजरीवाल यांनी मात्र त्यांचे पायही मातीचेच असल्याचे सिद्ध करण्यातच धन्यता मानली, असेच आता म्हणावे लागेल!