शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

कोर्टाच्या सुट्या नकोतच

By admin | Updated: April 7, 2017 00:05 IST

सरन्यायाधीश जगदीशसिंग केहर यांनी न्यायालयीन सुट्यांचा विषय काढला

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात बोलताना सरन्यायाधीश जगदीशसिंग केहर यांनी न्यायालयीन सुट्यांचा विषय काढला आणि प्रलंबित खटल्यांचा प्रचंड डोंगर पाहता न्यायाधीशांनी उन्हाळी सुटीतही काम करावे, अशी सूचना केली. हाच विचार मनात ठेवून महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी स्थापन केलेली पाच घटनापीठे येत्या उन्हाळी सुटीत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयही सुटीत काम करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या. देशातील सर्वोच्च न्यायालय आणि २३ उच्च न्यायालये उन्हाळी, दिवाळी-नाताळ आणि काही ठिकाणी नवरात्रीच्या सुट्या मिळून वर्षभरात दोन-अडीच महिने बंद राहतात. न्यायाधीश जेव्हा या सुट्या न घेण्याचे बोलतात तेव्हा त्यांची भाषा मेहेरबानी केल्यासारखी असते. न्यायालयांमध्ये प्रकरणे प्रलंबित राहण्याची कारणे वेगळी आहेत व त्यात सुट्यांचा भाग खूपच कमी आहे. त्यामुळे न्यायालये या सुट्या वगळून उरलेल्या दिवसांत ज्या पद्धतीने काम करतात तसेच काम त्यांनी सुट्या न घेता वर्षभर केले तरी त्याने प्रलंबित खटल्यांचा डोंगर उपसायला फारशी मदत होईल, असे नाही. न्यायालयांच्या सुट्या बंद व्हायलाच हव्यात, पण त्याचे कारण खटले पडून राहतात म्हणून नाही. तीन-चार दशकांपूर्वी प्रलंबित खटल्यांचा प्रश्न एवढा गंभीर नव्हता तेव्हाही या सुट्या होत्याच. मुख्य प्रश्न न्यायालयांना या सुट्या हव्यात कशाला व त्यांना या सुट्या दिल्या कोणी हा आहे. बाकी कोणत्याही सरकारी कार्यालयांना अशा सुट्या नसतात. मग न्यायालयांनाच कशासाठी? ब्रिटिशांच्या काळापासून या सुट्या आहेत हे याचे समर्थन होऊ शकत नाही. न्यायदान हे शासनाचे सार्वभौम कर्तव्य आहे. त्याला सुटी असू शकत नाही. उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय वर्षभरात अमुकच दिवस काम करेल, असे कोणत्याही कायद्यात किंवा राज्यघटनेत म्हटलेले नाही. संसदेने न्यायाधीशांच्या सेवानियमांचा जो कायदा केला आहे त्यात या वरिष्ठ न्यायाधीशांचे वर्षाचे कामाचे दिवस २११ ठरविले आहेत. इतर सरकारी कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रजा असतात व कार्यालय बंद राहणार नाही, अशा प्रकारे त्या दिल्याही जातात. त्यामुळे प्रत्येक न्यायाधीशास त्याच्या हक्काच्या रजा व सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्या मिळतील, पण न्यायालय मात्र सुरू राहील, अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालय स्वत:चे आणि उच्च न्यायालये त्या त्या राज्यातील न्यायालयांच्या कार्यालयीन दिवसांचे व सुट्यांचे कॅलेंडर तयार करतात. यात या दीर्घकालीन सुट्या अंतर्भूत केल्या जातात. त्यामुळे या सुट्या हक्काच्या आहेत, असा गैरसमज न्यायाधीश मंडळींनी करून घेतला आहे. या सुट्यांना ‘व्हेकेशन’ असे म्हटले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याने सु्टी घेऊन ‘व्हेकेशन’वर जाणे समजण्यासारखे आहे, परंतु एखादी संस्था ‘व्हेकेशन’वर कशी काय जाऊ शकते, हे प्रश्न न्यायाधीश स्वत:लाच विचारतील आणि त्याची जी प्रामाणिक उत्तरे येतील त्यानुसार वागतील तेव्हाच या सुट्या बंद होऊ शकतील. न्यायाधीशांनी सुट्यांमध्ये चार दिवस काम करण्याची मेहेरबानी करणे हे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे.