शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

डाळ की साखर?

By admin | Updated: May 2, 2016 02:14 IST

भारत हा शेतीप्रधान देश असला तरी अन्नधान्याच्या बाबतीत अजूनही स्वयंपूर्ण नाही. त्याला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. गहू कमी पडला करा आयात, डाळी कमी पडल्या करा आयात.

भारत हा शेतीप्रधान देश असला तरी अन्नधान्याच्या बाबतीत अजूनही स्वयंपूर्ण नाही. त्याला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. गहू कमी पडला करा आयात, डाळी कमी पडल्या करा आयात. इतकेच काय कांदा आणि साखर निर्यात करणाऱ्या आपल्या देशात या वस्तूंचे भाव कधी कधी इतके गगनाला भिडलेले असतात की त्या वस्तू आयात कराव्या लागतात. निर्यातीला प्रोत्साहन धोरण अवलंबले की साखर आणि फळे यामध्ये जास्त वाव आहे म्हटले की शेतकरीही त्याचीच लागवड करतात. जगात दुसऱ्या क्रमांकावर आपण साखर उत्पादन करतो. दरवर्षी ३२ लाख टन साखर निर्यात करणारे आपण साखरेच्या वाढत्या दराने आत्ताच हैराण झालो आहोत. निर्यातीला वाव आहे म्हणून केवळ साखर उत्पादनाकडे लक्ष दिल्याने आपण डाळी उत्पादनाकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी ३५ ते ४० लाख टन डाळी आयात करत आहोत. मग साखरेच्या निर्यातीला काय अर्थ आहे. ऊस उत्पादकांसाठी दर निश्चित केला असला तरी अनेक कारखाने तो दर शेतकऱ्यांना देत नाहीत. याउलट गव्हू, डाळी, कांदा या पिकाला सरकारने ज्या आधारभूत किमती दिल्या आहे त्याच्या दुपटीने भाव शेतकऱ्यांना मिळू लागले आहेत. आजच्या घडीला डाळीकडे लक्ष द्यायचे की साखरेकडे असा प्रश्न सरकारपुढे आहे. सरकारने ३२ लाख टन साखर निर्यातीचा करार केला असून, आत्तापर्यंत १३ लाख टन साखर निर्यात केली आहे. तोपर्यंत स्थानिक बाजारात साखर ४० रुपयावर गेली आहे. म्हणजे निर्यातीचे ५० टक्केही उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. सरकारने निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे ठरवले तर काय होईल हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्याला निर्यातक्षम उद्योग उभारायचे आहेत की शेतकरी जगवायचा आहे की निर्यात वाढवायची आहे हे सरकारने एकदा ठरवले पाहिजे. मुबलक पाण्याची नासाडी करून साखर ३२ लाख टन साखर निर्यात करायची की कमी पाण्यावर येणाऱ्या कडधान्याला प्रोत्साहन देऊन डाळीचे उत्पादन वाढवून वर्षाला होणारी ४० लाख टन डाळीची आयात थांबवायची हे ठरवण्याची आता वेळ आली आहे.