शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे ‘दिव्यांग’प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 04:45 IST

सामाजिक माध्यमांमधून जी चर्चा चालते किंवा ज्या संदेशांचे आदान-प्रदान केले जाते, त्यांच्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नसते अशी एक सर्वसाधारण समजूत आता झाली आहे.

सामाजिक माध्यमांमधून जी चर्चा चालते किंवा ज्या संदेशांचे आदान-प्रदान केले जाते, त्यांच्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नसते अशी एक सर्वसाधारण समजूत आता झाली आहे. पण मधूनच अशा माध्यमांमधून असा एखादा संदेश येतो की वाचणारा पार हलून आणि हादरुन जातो. रिओ येथील धडधाकटांच्या आॅलिम्पिक स्पर्धांनी संपूर्ण जगासमवेतच भारतातही एक प्रकारचा उन्माद निर्माण केला होता. पण त्याच जागी दिव्यांगी लोकांसाठी आयोजित पॅरालिम्पिक म्हणजे समांतर आॅलिम्पिक स्पर्धांकडे मात्र फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. समाज माध्यमात याच वास्तवावर नेमके बोट ठेवले गेले आहे. रीतसर आॅलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय स्पर्धक सहभागी झाले आणि त्यांनी पदके आणली दोन. एक रजत तर दुसरे कांस्य. त्याच वेळी पॅरालिम्पिकमध्ये भारतातर्फे सहभागी झाले १९ खेळाडू पण त्यांनी आजवर (स्पर्धा आणखी दोन दिवस चालेल) जिंकून घेतली चार पदके, ज्यात दोन सुवर्णपदके आहेत. परंतु त्यांच्यापैकी एकालाही कोणी प्रायोजक नव्हता. प्रसिद्धीचा अभाव होता. ज्यांनी पदके जिंकली त्यांना कोटीतली नव्हे तर काही लाखातली आणि तीदेखील एखाद्या राज्येतर्फेच बक्षिसे जाहीर केली गेली. सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत कुठे दिसले आणि जाणवलेही नाहीत. समाज माध्यमातला संदेश पुढे म्हणतो, यात सशक्त आणि कमीशक्त यांच्यातील तुलनेचा हा प्रश्न नाही. जे जिंकले त्यांना ‘बीएमडब्ल्यु’ कोणी देणार नाही. तेव्हां किंमान मारुती उद्योगाने तरी काही विचार करावा, असेही हा संदेश सुचवतो. वस्तुत: जे लोक शारीरिक वा मानसिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांच्यासाठी केन्द्रातील नव्या सरकारने अपंगसाठी दिव्यांग हा शब्द घडवला आहे. शब्दांच्या अशा खेळी करण्यात तसेही भाजपाच्या लोकांचा हात कोणी धरणार नाही. पण त्यांचे कौशल्य इतक्यापुरतेच मर्यादित आहे. रिओत सिंधू आणि साक्षी यांनी पदकांची कमाई केली आणि ज्यांना पदक मिळवता आले नाही पण तिथपर्यंत धडक मारता आली त्यांचे झालेले व होत असलेले कौतुक योग्यच आहे. पण केवळ तितकेच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघ जेव्हां एखादा आणि विशेषत: पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकतो तेव्हां राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेपासून सारेच आपला आनंद व्यक्त करुन मोकळे होतात. पण मरियप्पन थंगवेलू आणि देवेन्द्र झाजरिया या पुरुष खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली (यातील देवेन्द्रने तर जागतिक विक्रम मोडला) वरुणसिंग भाटीने कांस्य तर दीपा मलिकने रौप्य पदक जिंकले पण त्यापैकी कोणीही सिंधू वा साक्षीइतके नशिबवान ठरले नाही. मग प्रश्न निर्माण होतो, दिव्यांगी नेमके कोण आहे?