शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

भ्रष्टाचाऱ्यांना चाप

By admin | Updated: September 8, 2016 04:42 IST

संसदेच्या एका समितीद्वारे प्रस्तावित नव्या कायद्यानुसार आता एखाद्या कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणे हा भ्रष्टाचार ठरणार आहे

संसदेच्या एका समितीद्वारे प्रस्तावित नव्या कायद्यानुसार आता एखाद्या कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणे हा भ्रष्टाचार ठरणार आहे. राज्यसभेच्या प्रवर समितीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या नव्या विधेयकावरील अहवालात विधी आयोगाच्या अहवालाचे समर्थन करताना ‘अनुचित लाभाचा’ समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुखासह इतर कोणत्याची लाभाची मागणी करणे कायद्याच्या कक्षेत येणार आहे. देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यात प्रामुख्याने महिलांची होणारी अवहेलना बघता कायद्यात अशा प्रकारची तरतूद अत्यावश्यकच झाली होती. जगभरात भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत ७६ व्या स्थानावर आहे. येथे जवळपास ७५ ते ८० टक्के लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये आपली कामे करवून घेण्यासाठी एक तर लाच द्यावी लागते अन्यथा प्रभावाचा वापर करावा लागतो. गावखेड्यांमध्ये सुद्धा अगदी रेशन कार्ड काढण्यापासून तर सातबाराचा उतारा मिळविण्यापर्यंत प्रत्येक काम चिरिमिरी दिल्याशिवाय होत नाही, अशी स्थिती आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर घट्ट रुजली असून जनजीवनावर त्याचा व्यापक परिणाम झाला आहे. लाचखोरी, काळाबाजार, जाणूनबुजून किमती वाढविणे, स्वस्त सामान महागात विकणे आदींसोबतच लैंगिक सुखाची मागणी हा सुद्धा त्यातील एक अभद्र प्रकार. आज मोठ्या प्रमाणात महिला शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. आर्थिक व्यवहार सांभाळत आहेत. आणि या कमालीच्या भ्रष्ट व्यवस्थेत वावरत असताना तिच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत गेल्या आठवड्यात उघडकीस आलेले सेक्स स्कँडल म्हणजे भ्रष्टाचाराने पूर्णत: माखलेल्या व्यवस्थेचाच परिपाक आहे. सदर मंत्र्याकडे रेशनकार्डच्या कामासाठी गेली असताना त्याने आपला शीलभंग केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पर्यावरणतज्ज्ञ आर.के. पचौरी यांना गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात टेरीच्या महासंचालक पदावरुन हटविण्यात आले होते. त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असून तीन कनिष्ठ महिला सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारतीय समाजात एकीकडे आधुनिकता आणि स्वातंत्र्याचे विस्तारीकरण होत असतानाच महिलांप्रति पुरुषांचा दृष्टिकोन मात्र अधिक संकुचित झाला ही एक विटंबनाच म्हणावी लागेल. आजही तिच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे लैंगिक अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यावर नियंत्रणासाठी शासनातर्फे महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे वेळोवेळी अस्तित्वात आणले गेले. परंतु बहुतांश महिलांना हे कायदे आणि अधिकारांची जाणीवच नाही. लैंगिक सुखाची मागणी अनुचित ठरविण्याची तरतूद हे सुद्धा त्याच दिशेने उचलण्यात आलेले आणखी एक ठोस पाऊल आहे. गरज आहे ती केवळ महिलांनी याबाबत सजग राहण्याची.