शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल वारीसाठी

By admin | Updated: May 2, 2016 02:13 IST

अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि लक्षावधींचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाचा आषाढी वारी सोहळा अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या पंधरवड्यात भूवैकुंठ

अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि लक्षावधींचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाचा आषाढी वारी सोहळा अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या पंधरवड्यात भूवैकुंठ पंढरीत वारीच्या आयोजनाची सरकारी कामे सुरू होतील. ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या काळापासून सुरू असलेली ही वारी आता इव्हेंट झाली असली तरी कोणताही इव्हेंट उत्तम, नीटनेटकेपणाने पार पडावा, अशी साऱ्यांचीच अपेक्षा असते. आषाढी वारीच्यानिमित्ताने उत्पादन, मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या, स्थानिक व्यापारी, मोबाइल कंपन्या आपले टार्गेट्स सेट करून कामाला लागतात. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानेही यंदा वारी अधिक निर्मल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एप्रिलच्या तिसऱ्या सप्ताहात यासंदर्भात एक बैठक घेऊन नमामि चंद्रभागा अभियानाचा तपशील सांगितला. ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर आखलेल्या या प्रकल्पात फडणवीस सरकारला सन २०२२ पर्यंत चंद्रभागा प्रदूषणमुक्त करायची आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये जी विविध कामे करायची आहेत, त्यामध्ये नदीच्या प्रवाहात येणाऱ्या प्रदूषण वाढविणाऱ्या प्रवाहांना रोखायचे आहे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये मूळ आणि अवघड समस्या हीच आहे. त्याचे कारण लोकांच्या भावनेशी निगडित आहे. पंढरपूर हे देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्री जाऊन विविध प्रकारचे विधी करण्याला आपल्या धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या अस्थींचे विसर्जन पवित्र चंद्रभागेत करण्याचा रिवाज आहे. शिवाय पंढरपुरातील कुणी स्वर्गवासी झाले तर मयताच्या अग्निसंस्कारापूर्वी त्याला नदीपात्रात स्नान घातले जाते, असे तेथील लोक सांगतात. चंद्रभागा निर्मल करण्यासाठी मात्र या प्रथा थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून जनजागरण केले गेले पाहिजे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये अस्थिविसर्जन आणि अन्य काही अंतिम कार्यासाठी वेगळे कुंड बांधणे आवश्यक वाटते. याशिवाय चंद्रभागेत ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असल्याचे गतवर्षी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर दाखविण्यात आले. अर्थात मुद्रित माध्यमांनी यासंदर्भात पूर्वीच लक्ष वेधले होते. हे रोखण्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे... वारी निर्मल करण्यासाठी किमान इतकं तरी सर्वप्रथम होणं, गरजेचे आहे.