शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

तारुण्य ओसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 23:41 IST

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश मानला जातो. या देशातील तरुणांच्या लोकसंख्येच्या आधारे संयुक्त राष्ट्राने दोन वर्षांपूर्वी आपल्या अहवालात हा दर्जा बहाल केला होता.

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश मानला जातो. या देशातील तरुणांच्या लोकसंख्येच्या आधारे संयुक्त राष्ट्राने दोन वर्षांपूर्वी आपल्या अहवालात हा दर्जा बहाल केला होता. परंतु या देशातील तारुण्य आता ओसरायला लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकताच ‘युथ इन इंडिया’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर विश्वास ठेवल्यास पुढील काही वर्षात देशाच्या एकूण लोकसंख्येतील तरुणांची संख्या कमी होणार आहे. या श्रेणीत १५ ते ३४ वयोगटातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. २०११च्या जनगणनेत देशात या वयोगटाची लोकसंख्या ३४.८ टक्के होती. २०२१ मध्ये ती खाली घसरून ३३.५ टक्क्यांवर पोहोचणार आहे आणि २०३१मध्ये ३१.८ टक्के असेल असा अंदाज आहे. अर्थात आकडेवारीचा हा खेळही कधीकधी फार गमतीशीर आणि संभ्रमात टाकणारा असतो. एरवी पंतप्रधानांसह सर्व राजकीय नेते आपल्या जाहीर भाषणांमध्ये तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के असल्याचे नेहमीच सांगत असतात. एवढा आकडा फुगतो कसा? तर या तफावतीमागेही एक गणित आहे. नेमका कोणता वयोगट तरुण मानायचा यावर हे समीकरण अवलंबून असते. अन् आपल्या येथे अधिकृतपणे तरुणांचा वयोगटच निश्चित नाही. ६५ टक्क्यांचा हिशेब हा शून्य ते ३५ वर्षे वयोगटातील लोकसंख्येच्या आधारे लावण्यात आला असल्याचे माहितीच्या अधिकारात निदर्शनास आले आहे. ते काहीही असो. पण तरुणपिढी ही प्रत्येक देशाची शान असते. देशाला नव्या उंचीवर नेण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळेच तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि रोजगाराच्या संधी याची काळजी घेणे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु वर्तमानाचा विचार केल्यास ही तरुणशक्ती आणि त्यांच्या क्षमतांचा देशाला किती लाभ मिळतोय हे विचार करण्याजोगे आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन कोटी रोजगार निर्मितीची ग्वाही दिली होती. पण या सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारीचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. त्यामुळे सर्वात तरुण देश म्हणून जगभरात मिरवायचे असेल तर या देशातील तरुणांना दिलासा देण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलण्याची गरज आहे.