शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तारुण्य ओसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 23:41 IST

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश मानला जातो. या देशातील तरुणांच्या लोकसंख्येच्या आधारे संयुक्त राष्ट्राने दोन वर्षांपूर्वी आपल्या अहवालात हा दर्जा बहाल केला होता.

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश मानला जातो. या देशातील तरुणांच्या लोकसंख्येच्या आधारे संयुक्त राष्ट्राने दोन वर्षांपूर्वी आपल्या अहवालात हा दर्जा बहाल केला होता. परंतु या देशातील तारुण्य आता ओसरायला लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकताच ‘युथ इन इंडिया’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर विश्वास ठेवल्यास पुढील काही वर्षात देशाच्या एकूण लोकसंख्येतील तरुणांची संख्या कमी होणार आहे. या श्रेणीत १५ ते ३४ वयोगटातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. २०११च्या जनगणनेत देशात या वयोगटाची लोकसंख्या ३४.८ टक्के होती. २०२१ मध्ये ती खाली घसरून ३३.५ टक्क्यांवर पोहोचणार आहे आणि २०३१मध्ये ३१.८ टक्के असेल असा अंदाज आहे. अर्थात आकडेवारीचा हा खेळही कधीकधी फार गमतीशीर आणि संभ्रमात टाकणारा असतो. एरवी पंतप्रधानांसह सर्व राजकीय नेते आपल्या जाहीर भाषणांमध्ये तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के असल्याचे नेहमीच सांगत असतात. एवढा आकडा फुगतो कसा? तर या तफावतीमागेही एक गणित आहे. नेमका कोणता वयोगट तरुण मानायचा यावर हे समीकरण अवलंबून असते. अन् आपल्या येथे अधिकृतपणे तरुणांचा वयोगटच निश्चित नाही. ६५ टक्क्यांचा हिशेब हा शून्य ते ३५ वर्षे वयोगटातील लोकसंख्येच्या आधारे लावण्यात आला असल्याचे माहितीच्या अधिकारात निदर्शनास आले आहे. ते काहीही असो. पण तरुणपिढी ही प्रत्येक देशाची शान असते. देशाला नव्या उंचीवर नेण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळेच तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि रोजगाराच्या संधी याची काळजी घेणे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु वर्तमानाचा विचार केल्यास ही तरुणशक्ती आणि त्यांच्या क्षमतांचा देशाला किती लाभ मिळतोय हे विचार करण्याजोगे आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन कोटी रोजगार निर्मितीची ग्वाही दिली होती. पण या सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारीचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. त्यामुळे सर्वात तरुण देश म्हणून जगभरात मिरवायचे असेल तर या देशातील तरुणांना दिलासा देण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलण्याची गरज आहे.