शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनाचा मनोनिग्रह जपताना...

By admin | Updated: June 12, 2016 05:20 IST

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. कारण मन असीमित विचारांच्या प्रवाहात सापडले की, त्याला स्वत:चा कंट्रोल नसेल तर कुठे भरकटत जाईल, याचा विचारही आपण करू शकत नाही,

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. कारण मन असीमित विचारांच्या प्रवाहात सापडले की, त्याला स्वत:चा कंट्रोल नसेल तर कुठे भरकटत जाईल, याचा विचारही आपण करू शकत नाही, पण योग्य वेळी मनोनिग्रहाच्या बळावर माणूस जरी खळखळणाऱ्या प्रवाहात सापडला तरी भरकटत जाणार नाही हे खरे!भावनिक फिटनेसमधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला जे साधायचे आहे, तिथेच लक्ष केंद्रित करायाचे. विचलित मन हा मनुष्याचा स्थायी भावच आहे, पण मनाला ताब्यात ठेवायाचे म्हटले, तर निग्रहपूर्वक प्रयत्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक साधुसंतांनी मनोनिग्रह हा किती महत्त्वाचा विषय आहे हे शतकानुशतके समजावून सांगितले आहे. मनोनिग्रह हा भावनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे अनेक प्रकारच्या चुका, ज्या नंतर उभे आयुष्य उद्ध्वस्त करतात, त्या टाळता योतात.आपल्याशी कोणी वाईट वर्तन केले वा दुखावले की, आपल्या तोंडून एक सर्वसामान्य वाक्य बाहेर पडते. ते म्हणजे, मी त्यांच्याशी असा वाईट वागलो नसतो. ते माझ्याशी इतके वाईट कसे वागू शकतात? हे वाक्य आपला अवमान करणाऱ्यांसाठी आपल्या मनात उद्भवत असले, तरी दुसऱ्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात होणाऱ्या गैरसमजाचे ते प्रतीक आहे. आपण त्यांच्यासारखे वाईट वागू शकत नाही. कारण आपण ‘ते’ नाही आहोत आणि ते आपल्यासारखे नाहीत, जे काही कारण असेल ते असो, पण त्यांची विचार करायची पद्धत वेगळी आहे. त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे. म्हणजेच आपली त्यांच्याबद्दलची मूलभूत अपेक्षा आपण आपल्या विचारपद्धतीप्रमाणे करतो व त्यांना गृहीत धरतो. प्राणिमात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात, तेव्हा आपण त्यांचे गुणधर्म गृहीत धरतो. मांजराचे रडणे काय किंवा कुत्र्याचे अवेळी भुंकणे काय, आपण नाराजीने का होईना, पण ती प्राण्यांची नैसर्गिक वागणूक आहे, म्हणून स्वीकारतो, पण आपल्या अवतीभोवतीची माणसे केवळ आपल्यासारखेच मनुष्यप्राणी आहेत, म्हणून मानसिक वा तात्त्विक दृष्ट्या त्यांनी आपल्या अपेक्षेनुसारच वागावे, अशी अपेक्षा तरी का करावी? खरे पाहता, सांस्कृतिक व पारंपरिक अनुभवातून आपण काही दैनंदिन गोष्टी, रूढी वा प्रथा म्हणून करतो, त्यात एकमेकांना गृहीत धरणे आले. म्हणूनच भावनिक आरोग्याचा मूलभूत पाया आपण व इतर दुसरे भावनिक पातळीवर वेगळे असू शकतो, आपली वैचारिक पातळी व वैयक्तिक फिलॉसॉफी वेगळी असू शकते, हे मानणे प्रगल्भतेचे द्योतक आहे. त्यामुळे जेव्हा दुसऱ्याच्या वेगळ्या अस्तित्वाची दखल घेणे व्यक्तीला जमले नाही की, भावनिक उद्रेकाची सुरुवात होते. त्यातूनच भावनिक असमाधान, नात्यांमध्ये, मैत्रीत दुरावा निर्माण होतो. या सगळ्या अशांती व असमाधानामागे नकारात्मक भावनांचा भाग आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नकारात्मक भावना रोखण्यात अयशस्वी होतो किंवा त्यांचे सकारात्मक भावनेत रूपांतर करू शकत नाही, तेव्हा त्या नकारात्मक भावनांचा आपण निचरा करू शकलो, तर मन:शांती थोड्या प्रमाणात का होईना, मिळवू शकतो. तात्पुरत्या स्वरूपात या उद्रेकी भावना आपण दुसऱ्यावर ओरडून, मुठी आपटून किंवा दुसऱ्याचा अपमान करून, रडून, कधी व्यायाम करून व्यक्त करतो. स्वत:ला त्या उद्रेकी भावनांतून सोडवण्याचा हा प्रयत्न तसा प्रॅक्टिकल जरी असला, तरी तो प्रगल्भ नाही किंवा कायमस्वरूपी नाही. एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालीत असेल आणि एखादी बाह्य समस्याही नसेल, तेव्हा आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी, आपल्या भावनिक बचावासाठी वरील प्रकारच्या कृती त्या वेळी ठीक असतात. अशा प्रकारच्या भावनिक उद्रेकाला व्यक्ती जेव्हा बळी पडते, तेव्हा त्या नकारात्मक भावनांचा वेळीच निचरा करावा. नाहीतर त्या भावना आपल्या मनात बस्तान मांडून राहतात, पण नंतर संयमी प्रवृत्तीने या विघातक भावनांचा उगम का झाला, हे समजून घेणे भावनिक नियोजनात अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी व्यक्तीने भावनिक विकलतेचा गुलाम बनणे घातक आहे. या भावनिक विकलतेवर मात करणे भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक आहे. भावनिक उद्रेक वारंवार होत असेल, तर माणसाचे मन तडा गेलेल्या ग्लासासारखेच असते. म्हणजे ते मन प्रसंगी साथ तर देत नाहीच, पण एक तणावपूर्ण परिस्थिती मात्र, आपल्याबरोबर कायमच डोकेदुखी बनून राहते. म्हणून जास्त भारावून न जाता, कितीही आवडता असला, तरी तडा गेलेला ग्लास बदलायला हवाच. उद्रेक होणाऱ्या अनेक घटना होतच राहणार आणि ते आपल्या अस्तित्वाला आव्हान देत राहणार, विचलित करत राहणार. या प्रकारच्या संकटांचे ध्येय हे माणसाला रक्तबंबाळ करणेच असते. रक्तबंबाळ झाल्यानंतर स्वत:ची बौद्धिक शुद्ध हरपून वा बरेवाईट समजून सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसल्यास समस्येचे उत्तर कसे शोधता येईल? अनेक वाईट प्रसंगांनी भरलेल्या काटेरी जीवनपथावर चालायचे, तर वैचारिक व भावनिक सुसूत्रता जोपासायाला हवीच. दोरीवर चालताना आपण पडू शकतो, याची पूर्ण जाणीव ठेवून हातातल्या काठीने बॅलन्स सांभाळण्यासाठी शारीरिक चापल्य जितके आवश्यक आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मानसिक लवचिकता आवश्यक आहे. हा बाहेरून आणि आतून बॅलन्स ज्याला जमतो, त्याला भावनिक फिटनेसही जमतो.