शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानात घेरलेले राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:07 IST

नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांना मिळालेले मोठे यश पाहता, काँग्रेस या देशातील दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष व सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी वाढली आहे.

नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांना मिळालेले मोठे यश पाहता, काँग्रेस या देशातील दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष व सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी वाढली आहे. आपला पक्ष संघटित ठेवण्यासोबतच, देशातील अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणे आणि त्यांच्यात किमान राष्ट्रीय प्रश्नांबाबत एकमत घडवून आणणे हे आता त्यांचे काम आहे.

हे काम मुलायमसिंग यादव किंवा मायावती, ममता बॅनर्जी किंवा अखिलेश, तसेच चंद्राबाबू नायडू वा शरद पवार करू शकणार नाहीत. त्यांच्यात ती क्षमताही शिल्लक राहिली नाही. प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यासारखे तरुणच यापुढे राहुल गांधींचे खरे व महत्त्वाचे सहकारी ठरू शकतील. कमलनाथ आहेत, गहलोत आहेत, कॅ. अमरिंदरसिंगही आहेत. त्यांच्यासोबत लोक आहेत आणि त्यांनी आपला पक्ष आपल्या राज्यात मजबूत ठेवला आहे. विशेषत: अमरिंदरसिंग यांनी ज्या सामर्थ्याने पंजाबात मोदींच्या पक्षाला रोखले, तो प्रकार महत्त्वाचा व गांभीर्याने घ्यावा असा आहे. फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल काँग्रेस पक्ष पुन्हा एकवार काश्मिरात विजयी झाला आहे आणि तो काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. द्रमुकची काँग्रेसला साथ आहे, ही साथ सांभाळून व नवे सहकारी आणि संघटना जोडून घेऊन राहुल गांधींना त्यांचा पक्ष यापुढच्या काळात जपायचा आणि वाढवायचा आहे. त्याच वेळी जुने व वठलेले पुढारी बाजूला सारण्याचे कठोर कामही त्यांना करायचे आहे.

जुन्यांची प्रतिष्ठा व मान कायम राखून त्यांना हे करणे भाग आहे. राहुल गांधी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत आणि ज्येष्ठांना त्यांचे कौतुक आहे. त्यामुळे त्यांनी वा त्यांच्या पक्षाने परवाच्या पराभवामुळे खचण्याचे कारण नाही. इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात दर पाच ते आठ वर्षांनी सत्ताबदल होतो, पण तेथील पक्ष तुटत नाहीत. माणसे दूर जात नाहीत. विचार, कार्यक्रम व नेतृत्वावरील विश्वास हेच पक्षाचे बळ असते. ते संघटित करणे ही आता काँग्रेसची गरज आहे. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारा विखे पाटलांसारखा पुढारी पक्ष सोडतो आणि भाजपचा प्रचार करतो, तेव्हा ती बेशरमपणाची कमाल असते. अशी माणसे विजयी झाली, तरी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. विखेंसारखे अनेक जण या वेळी देशाला पाहाता आले. मात्र, जोपर्यंत सोनिया व राहुल आहेत, तोवर काँग्रेसचे अखिल भारतीय स्वरूप कायम राहणार आहे.

सोनिया किंवा राहुल या आता केवळ व्यक्ती राहिल्या नाहीत, त्या प्रतिमा बनल्या आहेत. काँग्रेस पक्ष ज्या मूल्यांसाठी निर्माण झाला, जी मूल्ये त्याने गेली शंभर वर्षे जपली आणि ज्यासाठी त्याचा लढा अजूनही चालू आहे, त्या मूल्यांची ती प्रतीके आहेत. तसे स्थान आज देशातील दुसºया कोणत्याही नेत्याला नाही. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, हा आरोप त्याचमुळे चुकीचा व खोटाही ठरणारा आहे. एका मूल्यप्रवाहावर निष्ठा ठेवणारे नेतृत्व व त्याच मूल्यांना वाहून घेतलेली प्रामाणिक माणसे यांची ती संघटना आहे. अशी संघटना एक वा दोन पराभवांनी खचत नाही व संपतही नाही. ती पुन्हा नव्याने उभी राहते. व्यक्ती बदलतात, समाजमनही बदलते, पण मूल्ये कायम राहतात. गांधीजींचा खून करता येतो, पण त्यांच्या प्रतिमेचा विनाश करता येत नाही. काँग्रेस हा विचारप्रवाह आहे, तो थांबणारा नाही, त्याला नवे प्रवाह मिळत राहणार व तो पुढे जातच राहणार.

राहुल गांधींची प्रतिमा अल्पावधीतच राष्ट्रीय बनली. प्रियंकांनाही तो मान मिळाला. लोक व्यक्तींसोबतच राहात नाही, ते विचारांसोबतही राहतात. काँग्रेस हा असा विचार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांवर श्रद्धा ठेवणारा व देश म्हणजे सर्वसमावेशकता असे समजणारा हा विचार आहे. त्याला शेवट नाही आणि त्याला संपविताही येत नाही. इतिहासाच्या पुढे जाणारे, वर्तमानात कायम राहणारे आणि भविष्यालाही मार्गदर्शन करणारे काही विषय असतात. काँग्रेस व त्याचा मूल्यविचार हा असा विषय आहे.