शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

याचकांची झोळी

By admin | Updated: June 14, 2016 04:12 IST

विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही गाव-खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी साहित्य महामंडळाने कधी झोळी हातात घेतली आहे काय?

- गजानन जानभोरविदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही गाव-खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी साहित्य महामंडळाने कधी झोळी हातात घेतली आहे काय?अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत दान घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी सध्या झोळी घेऊन सर्वत्र फिरत आहेत. ‘फुलाची केवळ पाकळी नव्हे तर फूलच द्यावे’ असा त्यांचा हट्ट आणि ‘याचकाला विन्मुख करू नका व रिकाम्या हाताने परत पाठवू नका’, अशी कळकळीची त्यांची याचना आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यात लोकसहभाग वाढावा हा उदात्त हेतू त्यामागे असावा, त्यामुळे या स्तुत्य पावलाचे आपण स्वागतच करायला हवे. पण झोळी घेऊन दात्याच्या दारात पाय ठेवण्यापूर्वी याचक, भिक्षुक किंवा फकीर स्वत:च्या मनाला एक प्रश्न विचारत असतो. ज्याच्या घरी आपण जात आहोत, त्याच्याशी आपले नाते काय? पोटातील भूक त्याला तसे विचारायला भाग पाडते. त्याच्या मनाने कौल दिला तरच ‘आत्मसन्मान’ त्याला त्या दारात घेऊन जातो, नाही तर रस्त्याने झोळी उघडी ठेवून वाटसरुंना साद घालत तो फिरत राहतो. याचकाच्या नव्या भूमिकेत असलेल्या श्रीपाद जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झोळी घेऊन निघण्यापूर्वी स्वत:च्या मनाला हाच प्रश्न विचारायला हवा होता. मागील दहा वर्षांत विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही रोज कुठल्यातरी गाव खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कधी झोळी हातात घेतली का? काही वर्षांपूर्वी खैरलांजीच्या भय्यालाल भोतमांगे या दलित बांधवाच्या कुटुंबियांची नराधमांनी निर्घृण हत्त्या केली. भोतमांगेला न्याय मिळावा म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो का? भय्यालालच्या दुसऱ्या लग्नाची ‘ब्रेकिंग न्यूज’ चघळणाऱ्या काही दलितद्वेष्ट्या माध्यमांचा आपण साहित्यिक म्हणून साधा निषेध तरी केला का? मागच्या वर्षी तिरोड्याची उज्ज्वला रंगारी ही महिला अन्नाच्या एकेका कणासाठी तडफडत मरून गेली. तिच्या निष्प्राण देहाजवळ रात्रभर बसून असलेला तिचा गतिमंद मुलगाही त्यावेळी असाच झोळी घेऊन रस्त्याने भीक मागत होता. जोशी महाशय, त्यावेळी तुमचे साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ कुठे होते? उज्ज्वलाच्या उद्ध्वस्त संसाराची फाटकी झोळी तुम्हाला का नाही दिसली? वैदर्भीय जनतेने मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत दान का टाकावे? वर्षभरापूर्वी चंद्रपूरला झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव विदर्भद्रोही साहित्यिकांनी येऊ दिला नाही. वैदर्भीय जनतेच्या अस्मितेशी दगाफटका करायचा आणि त्यांच्याच दारात झोळी घेऊन उभे राहायचे, याला याचना नाही, निलाजरेपणा म्हणतात. हे अ. भा. म. सा. महामंडळ म्हणजे काय? ते नेमके काय करीत असते याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. या महामंडळात कुठलीही लोकशाही व्यवस्था नाही. गावखेड्यातील एखादी सहकारी पतसंस्था किंवा सुतगिरणी जशी असते तसे ‘आपण सारे भाऊ-भाऊ’ हा मतलबाचा व्यवहार या महामंडळात चालत असतो. महामंडळाला राज्य सरकार दरवर्षी पाच लाख रुपयांचे अनुदानही देते. या सरकारी अनुदानाचा महाराष्ट्राला कधी हिशेब दिला आहे का? जर तो दिला नसेल तर लोकाना पैसे मागण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. साहित्य संमेलनासाठी एक रुपयाही महामंडळाला खर्च करावा लागत नाही. ज्यांना पुढारीपण मिरवायचे आणि खैरात वाटायची असते ते पी. डी. पाटलांसारखे नवे सरंजाम अशी संमेलने भरवतात. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनात तर पी. डी. पाटलांनी सरस्वतीला मंडपाबाहेर बसवून लक्ष्मीचीच आरास मांडली होती आणि खेदाची बाब अशी की साहित्यातून कष्टकरी, शेतकऱ्यांचे दु:ख मांडणारे साहित्यिक या अरबी थाटाच्या पाहुणचारात गुंग झाले होते. अखिल भारतीय तसेच प्रादेशिक साहित्य संमेलनात सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांची कधी चर्चा होत नाही, त्यांच्या वेदना मांडल्या जात नाहीत. संमेलनांवरील पंचतारांकित उधळपट्टी बंद करा, समाजाच्या दु:खाशी एकरुप व्हा. मग बघा लोकच स्वत:हून तुमच्या झोळीत भरभरुन दान टाकतील. तोपर्यंत दानासाठी या नव्या याचकांना तिष्ठतच राहावे लागणार आहे.