शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी रणधुमाळी

By admin | Updated: August 13, 2015 05:08 IST

नरेंद्र मोदी ज्या ‘विकासा’च्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधानपदावर जाऊन बसले, ती लाट कायम राहील, असा कारभार जर त्यांच्या हातून झाला असता, तर गेल्या आठवड्यात बिहारमधील गया

नरेंद्र मोदी ज्या ‘विकासा’च्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधानपदावर जाऊन बसले, ती लाट कायम राहील, असा कारभार जर त्यांच्या हातून झाला असता, तर गेल्या आठवड्यात बिहारमधील गया येथे झालेल्या सभेत त्यांना ‘जगल राज’चा जुनाच राग आळवावा लागला नसता. ‘विकासा’चा मुद्दा निष्प्रभ ठरणार, याची जाणीव असल्याने, लालूप्रसाद-नितीशकुमार यांच्या हातमिळवणीवर हल्ला करण्याविना दुसरा मुद्दाच मोदी यांच्यापाशी उरलेला नाही. बिहारमधील राजकीय गुंतागुंत इतकी की, या ‘जंगल राज’च्या विरोधात भाजपा आणि आज मुख्यमंत्री असलेले जनता दल (संयुक्त)चे नेते नीतीशकुमार हे एकत्र आले होते आणि २००५ साली त्यांनी सत्ता काबीज केली होती. याच नितीशकुमार यांनी गेल्या १० वर्षांत हे ‘जंगल राज’ बहुतांशी संपवले आणि ‘बिमारू’ राज्यांच्या यादीतून बिहारला बाहेर काढले. तेव्हा भाजपाने त्यांना साथ दिली. किंबहुना नितीशकुमार यांची साथ नसती, तर बिहारमध्ये भाजपाला सत्तेच्या जवळ जाता येणे शक्य नव्हते. याचे महत्वाचे कारण म्हणजे बिहारमधील जातीच्या राजकारणाचा तिढा. तो सोडविण्यासाठी गरज असते, ती सत्तेच्या राजकारणातील जातींचे महत्व व त्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्याची आणि त्यानुसार ज्या जातींची मोट एकत्र बांधायची आहे, त्यांना भावणारा चेहरा प्रचाराच्या अग्रस्थानी असेल, अशी व्यूहरचना करण्याची. बिहारमधील सत्तेच्या राजकारणाचा अलीकडच्या काळातील इतिहास हा ओबीसींच्या वर्चस्वाचा आणि त्यांनी इतर जातींना सोबत घेत उभ्या केलेल्या सत्तेच्या चौकटीचा आहे. एकेकाळी उच्चवर्णीयांच्या बळावर आणि दलित व मुस्लिम यांना जोडीला घेऊन काँगे्रसने उत्तर भारतात जे जातीचे समीकरण बसवले होते, ते ऐंशीच्या दशकापासून निष्प्रभ होत गेले आणि हे ओबीसी वर्चस्वाचे पर्व सुरू झाले. लालूप्रसाद यादव यांंचा उदय, त्यांनी बसवत नेलेले स्वत:चे बस्तान आणि नंतर त्यांचे निर्माण झालेले वर्चस्व हा याच राजकीय प्रक्रि येचा भाग होता. लालूप्रसाद यांनी यादवांच्या जोडीला कुर्मी, कोयरी इत्यादी दुय्यम स्तरांवरचे ओबीसी गट आणि दलित व मुस्लिमांची मोट यशस्वीपणे बांधली होती. पण सत्तेने उतून मातून जाऊन त्यांनी ही मोट स्वत:च्या हाताने उद्ध्वस्त करून टाकली. त्यामुळे आधी एकत्र असलेले नितीशकुमार, शरद यादव प्रभृती लालूप्रसाद यांच्या विरोधात गेले आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी भाजपाची मदत घेतली. भाजपाला पाठबळ देणारा समाजघटक हा मुख्यत: उच्चवर्णीयांचाच असल्याने अशी साथ त्या पक्षाला हवीच होती. त्यातूनच हे उच्चवर्णीय व ओबीसीतील यादवांपैकी काही गट व इतर दुय्यम ओबीसी गट एकत्र आले आणि नितीशकुमार यांनी दलित, अतिमागास दलित, मुस्लिम यांनाही साद घातली. हे जातीचे समीकरण राजकीयदृष्ट्या वरचढ ठरले आणि मग ‘जंगल राज’ बहुतांशी संपवण्यासाठी सत्ता नितीशकुमार यांच्या हाती आली. आज हेच नितीशकुमार भाजपाच्या विरोधात उभे आहेत आणि त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अशी अदलाबदल घडण्यास कारणीभूत ठरले, ते नरेंद्र मोदी. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने वाजपेयी नावाचा मुखवटा घालून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली आणि जे पक्ष काँगे्रस विरोधात होते, त्यांना साथीला घेतले. त्यात लालूप्रसाद यांच्याशी वितुष्ट आल्याने जनता दलातून फुटून निघालेला जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, न्नितीशकुमार इत्यादींचा गटही होता. मात्र या पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांचा कट्टर हिंदुत्वाला विरोध होता व आहे. पण सत्तेसाठी भाजपाशी सोयरीक करायला त्यांची ना नव्हती. फक्त अट होती, ती कट्टर हिंदुत्व मागे ठेवण्याची. समाजवाद्यांच्या या संधीसाधूपणाचा फायदा घेऊन वाजपेयी यांनी ते केले. नंतर सत्तेसाठी अडवाणीही ते करायला तयार झाले. पण सत्ता हाती येईना. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला नवा ‘विकासा’चा मुखवटा चढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’चा उपयोग करण्याचे ठरले. तेथेच वाद उद्भवला आणि मोदी असतील, तर आम्ही आघाडीत नाही, अशी भूमिका जनता दल (संयुक्त)ने घेतली. त्यामुळे भाजपा व नितीशकुमार याच्यात राजकीय फारकत झाली. पुन्हा एकदा जातींचे समीकरण जमवायचे, तर भाजपामुळे मिळणाऱ्या उच्चवर्णीयांच्या पाठिंब्याला पर्याय म्हणून यादवांचे जे गट लालूप्रसद यांच्या मागे आहेत, त्यांचे पाठबळ मिळवणे नितीशकुमार यांना गरजेचे बनले. त्यातून नितीशकुमार, लालूप्रसाद आणि आता काँगे्रस अशी आघाडी झाली आहे. अशावेळी खरे तर लोकसभा निवडणुकीत अतिशय प्रभावीपणे वापरलेला विकासाचा मुद्दा लावून धरत, हे जातीचे समीकरण निष्प्रभ करणे मोदी यांना अशक्य नव्हते. त्यांनी गया येथे झालेल्या सभेत ‘जंगल राज’चा राग आळवला व त्याला उत्तर म्हणून नीतिशकुमार ‘बिहारी अस्मिते’चा नारा देत आहेत. अशा रीतीने बिहारच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकून रणधुमाळीला सुरूवात झाली आहे.