शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भूकबळी

By admin | Updated: July 6, 2015 22:14 IST

छायाचित्रात एक गतिमंद मुलगा आपल्या आईच्या प्रेताजवळ बसलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाची आई भुकेने तडफडून मरण पावली.

गजानन जानभोर

या लेखातील छायाचित्रात एक गतिमंद मुलगा आपल्या आईच्या प्रेताजवळ बसलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाची आई भुकेने तडफडून मरण पावली. दोन-चार दिवस माध्यमांनी उसासे टाकले, समाजाने हळहळ व्यक्त केली. नंतर ही बातमी मंत्री, प्रशासनाच्या आश्वासनात विरुन गेली. हृदय पिळवटून टाकणारे असेच एक छायाचित्र काही वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले होते. भुकेने व्याकुळ, मरणासन्न असलेल्या एका चिमुकलीच्या मृत्यूची गिधाड वाट पाहत असल्याचे ते छायाचित्र होते. त्या छायाचित्राने दक्षिण सुदानमधील दारिद्र्याच्या प्रश्नाची तीव्रता साऱ्या जगाच्या लक्षात आणून दिली. त्या छायाचित्राला जगप्रसिद्ध ‘पुलित्झर’ पुरस्कारही मिळाला. परंतु त्या भुकेल्या मुलीला आपण मदत करू शकलो नाही ही बोच घेऊन छायाचित्रकार केव्हीन कार्टर यांनी एके दिवशी आत्महत्त्या केली. या लेखातील हे छायाचित्र आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आपणही काही क्षणासाठी अस्वस्थ झालो आणि नंतर ही घटना विसरूनही गेलो. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जगजीवनराम वॉर्डात राहणारी ललिता रंगारी ही दलित महिला भुकेशी झगडत व अन्नासाठी तडफडत मरण पावली. दोन वर्षांपूर्वी तिचा पती गेला. घरकाम करून ती आपल्या गतिमंद मुलाला सांभाळायची. एके दिवशी ती आजारी पडली, आजार वाढत गेला, काम सुटले. उपचारासाठी पैसे नाहीत, घरात अन्नाचा कण नाही. दिवसेंदिवस ती खंगत गेली. शेजाऱ्यांना दया यायची. तिला खायला आणून द्यायचे. आपली भूकसुद्धा धड सांगू न शकणाऱ्या मुलाला ती खाऊ घालायची. सरकारच्या योजना गरीबांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत, हे दाहक वास्तव तिच्याही वाट्याला आले. निराधार योजनेचे पैसे तिला सात महिन्यांपासून मिळाले नव्हते. या पैशांमुळे तिच्या दारिद्र्याचे दशावतार संपले नसते पण किमान आपले मरण दोन दिवस पुढे ढकलता आले असते. ती गेल्यानंतर ‘खळबळजनक’ बातमी म्हणून माध्यमांनी तिची नोंद घेतली. चार दिवस हा विषय लावून धरला. ती निपचित असेपर्यंत ढिम्म असलेले प्रशासन ती गेल्यानंतर जागे झाले. सामाजिक न्यायाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांनी घरी भेट दिली. तिच्या दोन्ही मुलांच्या ‘सरकारी’ पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. प्रशासनाने उर्वरित सोपस्कार पार पाडले, मंत्र्यांनी फोटो काढून घेतले. नव्या सनसनाटी बातम्यांच्या शोधात असलेल्या माध्यमांना नंतर या विषयात रस उरला नाही. आता सर्वत्र शांतता आहे. राहिला प्रश्न वाचकांचा! तो कधीचाच ‘ग्राहक’ झाला आहे. त्याच्या चोखंदळ वृत्तीला अशा बातम्या नकारात्मक वाटण्याचीच शक्यता अधिक आहे. थोडक्यात काय तर ही घटना हळूहळू साऱ्यांच्याच विस्मरणात जाणार आहे. घरातील बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. दारात भीक मागायला आलेल्या गरीबाला ताटातली चतकोर देणारेही आपणच. पण ही दलित महिला अन्नाच्या एकेक कणासाठी तडफडत होती तेव्हा कुठल्याही सरकारी योजनेला तिच्या मदतीसाठी धावून जावेसे वाटले नाही. तिच्या गतिमंद मुलाची अवस्था बघून सरकारचा ‘सामाजिक न्याय’ जागा झाला नाही! एरवी जातीपातीच्या नावावर कंठशोष करणारे समाजभूषण त्यावेळी कुठे गेले होते? ती गेल्यानंतरही सामाजिक संघटनांना तिच्यासाठी का लढावेसे वाटले नाही? पेटून उठण्यासाठी त्यांना नेमकी कोणती कारणे हवी असतात? भूकबळी हे कारण आता क्षुल्लक ठरले आहे का? शोषणाची नवी वर्गवारी या संघटनांनी ठरविलेली आहे का? मेंदूला झिणझिण्या आणणारे असे असंख्य प्रश्न ललिता रंगारी मागे सोडून गेली आहे. दलितांच्या दारिद्र्याचा, शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा की आमदारकी, खासदारकी? या संभ्रमात सापडलेल्या दलित नेतृत्वाला तिच्या मृत्यूचा आक्रोश म्हणूनच करावासा वाटत नसेल. तिच्या निष्प्राण देहाजवळ बराच वेळ बसून असलेल्या गतिमंद मुलाला अजूनही काहीच कळलेले नाही. जन्म आणि मरण यांच्यातील एका श्वासाचे अंतर ओळखण्याइतपत दुर्दैवाने निसर्गाने त्याला क्षमता दिलेली नाही. समाज म्हणून आपलीही अवस्था तशीच झालेली आहे.