शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

भूकबळी

By admin | Updated: July 6, 2015 22:14 IST

छायाचित्रात एक गतिमंद मुलगा आपल्या आईच्या प्रेताजवळ बसलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाची आई भुकेने तडफडून मरण पावली.

गजानन जानभोर

या लेखातील छायाचित्रात एक गतिमंद मुलगा आपल्या आईच्या प्रेताजवळ बसलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाची आई भुकेने तडफडून मरण पावली. दोन-चार दिवस माध्यमांनी उसासे टाकले, समाजाने हळहळ व्यक्त केली. नंतर ही बातमी मंत्री, प्रशासनाच्या आश्वासनात विरुन गेली. हृदय पिळवटून टाकणारे असेच एक छायाचित्र काही वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले होते. भुकेने व्याकुळ, मरणासन्न असलेल्या एका चिमुकलीच्या मृत्यूची गिधाड वाट पाहत असल्याचे ते छायाचित्र होते. त्या छायाचित्राने दक्षिण सुदानमधील दारिद्र्याच्या प्रश्नाची तीव्रता साऱ्या जगाच्या लक्षात आणून दिली. त्या छायाचित्राला जगप्रसिद्ध ‘पुलित्झर’ पुरस्कारही मिळाला. परंतु त्या भुकेल्या मुलीला आपण मदत करू शकलो नाही ही बोच घेऊन छायाचित्रकार केव्हीन कार्टर यांनी एके दिवशी आत्महत्त्या केली. या लेखातील हे छायाचित्र आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आपणही काही क्षणासाठी अस्वस्थ झालो आणि नंतर ही घटना विसरूनही गेलो. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जगजीवनराम वॉर्डात राहणारी ललिता रंगारी ही दलित महिला भुकेशी झगडत व अन्नासाठी तडफडत मरण पावली. दोन वर्षांपूर्वी तिचा पती गेला. घरकाम करून ती आपल्या गतिमंद मुलाला सांभाळायची. एके दिवशी ती आजारी पडली, आजार वाढत गेला, काम सुटले. उपचारासाठी पैसे नाहीत, घरात अन्नाचा कण नाही. दिवसेंदिवस ती खंगत गेली. शेजाऱ्यांना दया यायची. तिला खायला आणून द्यायचे. आपली भूकसुद्धा धड सांगू न शकणाऱ्या मुलाला ती खाऊ घालायची. सरकारच्या योजना गरीबांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत, हे दाहक वास्तव तिच्याही वाट्याला आले. निराधार योजनेचे पैसे तिला सात महिन्यांपासून मिळाले नव्हते. या पैशांमुळे तिच्या दारिद्र्याचे दशावतार संपले नसते पण किमान आपले मरण दोन दिवस पुढे ढकलता आले असते. ती गेल्यानंतर ‘खळबळजनक’ बातमी म्हणून माध्यमांनी तिची नोंद घेतली. चार दिवस हा विषय लावून धरला. ती निपचित असेपर्यंत ढिम्म असलेले प्रशासन ती गेल्यानंतर जागे झाले. सामाजिक न्यायाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांनी घरी भेट दिली. तिच्या दोन्ही मुलांच्या ‘सरकारी’ पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. प्रशासनाने उर्वरित सोपस्कार पार पाडले, मंत्र्यांनी फोटो काढून घेतले. नव्या सनसनाटी बातम्यांच्या शोधात असलेल्या माध्यमांना नंतर या विषयात रस उरला नाही. आता सर्वत्र शांतता आहे. राहिला प्रश्न वाचकांचा! तो कधीचाच ‘ग्राहक’ झाला आहे. त्याच्या चोखंदळ वृत्तीला अशा बातम्या नकारात्मक वाटण्याचीच शक्यता अधिक आहे. थोडक्यात काय तर ही घटना हळूहळू साऱ्यांच्याच विस्मरणात जाणार आहे. घरातील बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. दारात भीक मागायला आलेल्या गरीबाला ताटातली चतकोर देणारेही आपणच. पण ही दलित महिला अन्नाच्या एकेक कणासाठी तडफडत होती तेव्हा कुठल्याही सरकारी योजनेला तिच्या मदतीसाठी धावून जावेसे वाटले नाही. तिच्या गतिमंद मुलाची अवस्था बघून सरकारचा ‘सामाजिक न्याय’ जागा झाला नाही! एरवी जातीपातीच्या नावावर कंठशोष करणारे समाजभूषण त्यावेळी कुठे गेले होते? ती गेल्यानंतरही सामाजिक संघटनांना तिच्यासाठी का लढावेसे वाटले नाही? पेटून उठण्यासाठी त्यांना नेमकी कोणती कारणे हवी असतात? भूकबळी हे कारण आता क्षुल्लक ठरले आहे का? शोषणाची नवी वर्गवारी या संघटनांनी ठरविलेली आहे का? मेंदूला झिणझिण्या आणणारे असे असंख्य प्रश्न ललिता रंगारी मागे सोडून गेली आहे. दलितांच्या दारिद्र्याचा, शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा की आमदारकी, खासदारकी? या संभ्रमात सापडलेल्या दलित नेतृत्वाला तिच्या मृत्यूचा आक्रोश म्हणूनच करावासा वाटत नसेल. तिच्या निष्प्राण देहाजवळ बराच वेळ बसून असलेल्या गतिमंद मुलाला अजूनही काहीच कळलेले नाही. जन्म आणि मरण यांच्यातील एका श्वासाचे अंतर ओळखण्याइतपत दुर्दैवाने निसर्गाने त्याला क्षमता दिलेली नाही. समाज म्हणून आपलीही अवस्था तशीच झालेली आहे.