शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शहरी नेतृत्वाची लढाई

By admin | Updated: October 22, 2016 04:14 IST

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षाचा प्रयोग होत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या रुपाने नवीन सत्ताकेंद्र उभे राहात आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपा-सेना

- मिलिंद कुलकर्णी महाराष्ट्रात तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षाचा प्रयोग होत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या रुपाने नवीन सत्ताकेंद्र उभे राहात आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपा-सेना युतीचे वर्चस्व असले तरी त्यांच्यात हाडवैर आहे. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपात गटबाजी वाढली असल्याने ही निवडणूक भाजपासाठी कसोटी पाहणारी ठरेल. १९७२ आणि २००१ नंतर तिसऱ्यांदा महाराष्ट्रात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा प्रयोग होत आहे. यापूर्वीच्या प्रयोगाविषयी उलटसुलट चर्चा झाली. २००१ मध्ये लातूर आणि जळगावमधील निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, परंतु नगराध्यक्ष प्रतिस्पर्धी गटाचा निवडून आला. स्वाभाविकपणे सभागृह चालविताना नगराध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागली. राजकीय सुंदोपसुंदीमुळे विकास कामे ठप्प झाली. त्यानंतर राज्य सरकारने पुढील निवडणुकांमध्ये हा निर्णय बदलला. पुन्हा १५ वर्षांनंतर हा प्रयोग राबविला जात आहे. गतकाळातील अनुभव लक्षात घेता या पंचवार्षिकमध्ये काय वाढून ठेवले आहे, हे नजीकचा काळ सांगेल. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर एका तालुक्यात दोन सत्ताकेंद्रे तयार होतील, हा राजकीयदृष्टया महत्त्वाचा बदल घडून येणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे दोन तालुक्यांचा एक मतदारसंघ, तालुक्याचे दोन तुकडे करुन दोन मतदारसंघाशी जोडणे असे प्रकार राज्यभर घडले आहेत.लोकनियुक्त नगराध्यक्षामुळे आमदारांपुढे त्यांच्याच मतदारसंघात पर्यायी नेतृत्व उभे ठाकणार आहे. नगराध्यक्ष शहरी भागाचा तर आमदार ग्रामीण भागाचा अशी मतदारांची विभागणीदेखील होणार आहे. शहरी भागातून निवडून आलेला नगराध्यक्ष पुढे आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही एका पक्षाचे असो की भिन्न असा संघर्ष भविष्यकाळात संभवू शकतो. याविषयीदेखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा देणाऱ्या राजकीय पक्षांनी पालिका निवडणुका जाहीर होताच आघाडीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे. बळाविषयीच्या दाव्यात कितपत तथ्य होते, हे यावरुन स्पष्ट होते. खान्देशात १६ पालिकांच्या निवडणुका २७ नोव्हेंबरला होत आहेत. सर्वाधिक १३ पालिका जळगाव जिल्ह्यातील असून नंदुरबारातील शहादा आणि धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा येथे निवडणुका होत आहेत. शहाद्यात पी.के.अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील, शिरपुरात आमदार अमरीशभाई पटेल तर दोंडाईचात माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्याकडे सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. परंतु केंद्र व राज्य सरकारमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर गावपातळीवर समीकरणे बदलू लागली आहेत. शहाद्यात भाजपाचे आमदार निवडून आले, तर दोंडाईचाचे जयकुमार रावल हे कॅबिनेट मंत्री झाले. दोघांनाही पालिकांवर वर्चस्व राखणे प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपा-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. दोन खासदार, ११ पैकी ९ आमदार निवडून आले असले तरी दोन्ही पक्षांमध्ये हाडवैर आहे. एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपामध्ये गटबाजी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भाजपा बैठकीत खडसे समर्थकांनी घातलेला गोंधळ आणि मुख्यमंत्र्यांच्या जामनेर दौऱ्याकडे खडसे यांनी फिरविलेली पाठ पाहाता ही निवडणूक भाजपासाठी कसोटी पाहणारी ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय पातळीवर निवडणूक लढविणे किती अवघड असते हे आघाडीच्या यशस्वी राजकारणावरुन दिसून येते. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा चोपड्यात पराभव करण्यास कारणीभूत ठरणारी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेची आघाडी यंदा फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमळनेरात अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांचा वारु रोखण्यासाठी भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लीकन पार्टी हे राष्ट्रीय पक्ष एकत्र आले आहेत. एकंदरीत ही निवडणूक दिवसागणिक नवनवीन समीकरण जुळवत असल्याने भाकित करणे भल्याभल्यांना अवघड ठरणार आहे.