शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बालगुन्हेगारीचा विळखा

By admin | Updated: April 3, 2017 00:14 IST

३५ हजार प्रकरणे उघडकीस येतात आणि त्यातील एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आहेत.

देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येतात आणि त्यातील एक तृतीयांशपेक्षा अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आहेत. बालगुन्हेगारीत राज्याचे आघाडीवर असणे अत्यंत चिंताजनक तर आहेच; पण या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या दोन वर्षांत अल्पवयीनांकडून गुन्ह्यांचे प्रमाण धोकादायक स्तरावर पोहोचले आहे. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे. विशेषत: अल्पवयीनांकडून होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले आहे. अल्पवयीन मुलाने पोर्नसाइट बघून तीन वर्षांच्या बालिकेवर केला अत्याचार, नातवंडांनी केला आपल्याच आजीचा खून, प्रेमास नकार देणाऱ्या मुलीवर अल्पवयीनाने उगवला सूड, अशा मन हादरवून टाकणाऱ्या घटना दररोजच कानावर पडू लागल्या आहेत. निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत हीसुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे. शाळांमधून आता मुलांना नैतिकतेचे धडे आणि लैंगिक शिक्षणासोबतच कायद्याचीही ओळख करून द्यावी लागणार आहे. याशिवाय बालगुन्हेगारांचे शिक्षण, पुनर्वसन आणि समुपदेशनही अत्यंत महत्त्वाचे असते. शासन आणि समाजाने एकजुटीने या दिशेने योग्य पावले उचलली तरच बालगुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल.