शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - साथी हाथ बढाना...!

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून ‘साथी हाथ बढाना’ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला तर काय घडू शकते हे धुळे जिल्ह्यातील घटबारी धरणात अलीकडेच झालेल्या जलसाठ्यातून दिसून येते. मुळातच कमी पावसाच्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील रोहिणी नदीवरचे हे छोटे धरण. १६० ते १७० टीएमसी एवढाच त्याचा पाणीसाठा आणि १२०० एकराचे सिंचन क्षेत्र. खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे गावच्या शेतकऱ्यांसाठी आशास्थान. गेल्या वर्षी ३ आॅक्टोबरला अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला, त्यात घटबारी धरणाचा बांध वाहून गेला. प्रचंड नुकसान झाले. परंतु आता धरणाला बांधच नसल्याने पाणी साठणार कुठे व कसे, हा खरा प्रश्न होता. शासनदरबारी पाठपुरावा सुरू झाला. अधिकारी येऊनसुद्धा गेले, पाहणी झाली, पंचनामे झाले, काही शेतकऱ्यांना अल्पशी मदतसुद्धा मिळाली; परंतु धरणाच्या पुनर्निर्माणाचा जो मुख्य प्रश्न होता त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ५६ लाख रुपये खर्च येणार होता. पण उन्हाळा आला तरी शासन दरबारी कुणीच पुकार घेईना. अशा वेळी खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे परिसरातील ग्रामस्थच एकत्र आले. त्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च लोकसहभाग व श्रमदानातून धरणाच्या पुनर्निर्माणाचा विडा उचलला आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात २१ मे रोजी आबालवृद्ध असे सुमारे साडेतीनशे ग्रामस्थ हातात टिकम, कुदळ, फावडे असे साहित्य घेऊन धरणाच्या पात्रात उतरले आणि घटबारी धरणाच्या लोकसहभागातून पुनर्निर्माणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तहसीलदार, ग्रामसेवक असे शासकीय प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त पुढाकार बघून खुडाणे येथील ट्रॅक्टरमालक व चालकांनीसुद्धा मोफत सेवा दिली, अनुलोम लोकराज्य संघटनेने तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन दिले आणि पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह अनेकांनी मदतीचे हात दिले. त्यामुळे बघता बघता ठरल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आतच घटबारी धरणाचा बांध पुन्हा उभा राहिला. योगायोगाने माळमाथ्यावर दमदार पाऊसही झाला, रोहिणी नदीला पूरही आला आणि घटबारी धरणात समाधानकारक जलसाठा झाला. ते पाहून भविष्याची चिंता मिटल्याच्या आनंदात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि शासनावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पुढाकारानेसुद्धा किती मोठे काम विनासायास होऊ शकते याची प्रचिती आली.