शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाष्य - साथी हाथ बढाना...!

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून ‘साथी हाथ बढाना’ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला तर काय घडू शकते हे धुळे जिल्ह्यातील घटबारी धरणात अलीकडेच झालेल्या जलसाठ्यातून दिसून येते. मुळातच कमी पावसाच्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील रोहिणी नदीवरचे हे छोटे धरण. १६० ते १७० टीएमसी एवढाच त्याचा पाणीसाठा आणि १२०० एकराचे सिंचन क्षेत्र. खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे गावच्या शेतकऱ्यांसाठी आशास्थान. गेल्या वर्षी ३ आॅक्टोबरला अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला, त्यात घटबारी धरणाचा बांध वाहून गेला. प्रचंड नुकसान झाले. परंतु आता धरणाला बांधच नसल्याने पाणी साठणार कुठे व कसे, हा खरा प्रश्न होता. शासनदरबारी पाठपुरावा सुरू झाला. अधिकारी येऊनसुद्धा गेले, पाहणी झाली, पंचनामे झाले, काही शेतकऱ्यांना अल्पशी मदतसुद्धा मिळाली; परंतु धरणाच्या पुनर्निर्माणाचा जो मुख्य प्रश्न होता त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ५६ लाख रुपये खर्च येणार होता. पण उन्हाळा आला तरी शासन दरबारी कुणीच पुकार घेईना. अशा वेळी खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे परिसरातील ग्रामस्थच एकत्र आले. त्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च लोकसहभाग व श्रमदानातून धरणाच्या पुनर्निर्माणाचा विडा उचलला आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात २१ मे रोजी आबालवृद्ध असे सुमारे साडेतीनशे ग्रामस्थ हातात टिकम, कुदळ, फावडे असे साहित्य घेऊन धरणाच्या पात्रात उतरले आणि घटबारी धरणाच्या लोकसहभागातून पुनर्निर्माणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तहसीलदार, ग्रामसेवक असे शासकीय प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त पुढाकार बघून खुडाणे येथील ट्रॅक्टरमालक व चालकांनीसुद्धा मोफत सेवा दिली, अनुलोम लोकराज्य संघटनेने तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन दिले आणि पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह अनेकांनी मदतीचे हात दिले. त्यामुळे बघता बघता ठरल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आतच घटबारी धरणाचा बांध पुन्हा उभा राहिला. योगायोगाने माळमाथ्यावर दमदार पाऊसही झाला, रोहिणी नदीला पूरही आला आणि घटबारी धरणात समाधानकारक जलसाठा झाला. ते पाहून भविष्याची चिंता मिटल्याच्या आनंदात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि शासनावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पुढाकारानेसुद्धा किती मोठे काम विनासायास होऊ शकते याची प्रचिती आली.