शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

भाष्य - साथी हाथ बढाना...!

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून ‘साथी हाथ बढाना’ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला तर काय घडू शकते हे धुळे जिल्ह्यातील घटबारी धरणात अलीकडेच झालेल्या जलसाठ्यातून दिसून येते. मुळातच कमी पावसाच्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील रोहिणी नदीवरचे हे छोटे धरण. १६० ते १७० टीएमसी एवढाच त्याचा पाणीसाठा आणि १२०० एकराचे सिंचन क्षेत्र. खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे गावच्या शेतकऱ्यांसाठी आशास्थान. गेल्या वर्षी ३ आॅक्टोबरला अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला, त्यात घटबारी धरणाचा बांध वाहून गेला. प्रचंड नुकसान झाले. परंतु आता धरणाला बांधच नसल्याने पाणी साठणार कुठे व कसे, हा खरा प्रश्न होता. शासनदरबारी पाठपुरावा सुरू झाला. अधिकारी येऊनसुद्धा गेले, पाहणी झाली, पंचनामे झाले, काही शेतकऱ्यांना अल्पशी मदतसुद्धा मिळाली; परंतु धरणाच्या पुनर्निर्माणाचा जो मुख्य प्रश्न होता त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ५६ लाख रुपये खर्च येणार होता. पण उन्हाळा आला तरी शासन दरबारी कुणीच पुकार घेईना. अशा वेळी खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे परिसरातील ग्रामस्थच एकत्र आले. त्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च लोकसहभाग व श्रमदानातून धरणाच्या पुनर्निर्माणाचा विडा उचलला आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात २१ मे रोजी आबालवृद्ध असे सुमारे साडेतीनशे ग्रामस्थ हातात टिकम, कुदळ, फावडे असे साहित्य घेऊन धरणाच्या पात्रात उतरले आणि घटबारी धरणाच्या लोकसहभागातून पुनर्निर्माणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तहसीलदार, ग्रामसेवक असे शासकीय प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त पुढाकार बघून खुडाणे येथील ट्रॅक्टरमालक व चालकांनीसुद्धा मोफत सेवा दिली, अनुलोम लोकराज्य संघटनेने तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन दिले आणि पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह अनेकांनी मदतीचे हात दिले. त्यामुळे बघता बघता ठरल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आतच घटबारी धरणाचा बांध पुन्हा उभा राहिला. योगायोगाने माळमाथ्यावर दमदार पाऊसही झाला, रोहिणी नदीला पूरही आला आणि घटबारी धरणात समाधानकारक जलसाठा झाला. ते पाहून भविष्याची चिंता मिटल्याच्या आनंदात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि शासनावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पुढाकारानेसुद्धा किती मोठे काम विनासायास होऊ शकते याची प्रचिती आली.