शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

अन् भाषा रुळू लागली!

By admin | Updated: April 23, 2017 01:57 IST

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

- अ. पां. देशपांडे महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ , महाराष्ट्र राज्य परिभाषा संचालनालय स्थापन करून साहित्याबरोबरच विज्ञानालाही प्रोत्साहन दिले. (यातच विश्वकोश मंडळ अंतर्भूत होते, ते आजच्यासारखे तेव्हा स्वतंत्र नव्हते.) साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे छापल्या गेलेल्या पुस्तकात श्री.वि. सोहोनी यांची रेडिओ रचना व दुरुस्ती, रेडिओ कार्य, रेकॉर्ड प्लेअर, टेलिव्हिजन अशी पुस्तके होती; तर प्रा. प.म. बर्वे यांची साखर, खनिज तेल व रसायने, वि.त्र्यं.आठवले व इतर अणुशास्त्रज्ञाचे अणुयुग अशी पुस्तके छापली. मराठी विश्वकोशात तर शेकडोंनी विज्ञानावरच्या नोंदी आहेत. परिभाषा संचालनालयाने अनेक विज्ञान विषयांवर कोश छापले. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा महाराष्ट्रात हळूहळू रुळू लागली. ती पाठ्यपुस्तकात येऊ लागली. वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध होऊ लागले. पुस्तकात येऊ लागली, आकाशवाणी-दूरदर्शनवर वापरली जाऊ लागली आणि जाहीर भाषणातून व लोकांच्या संभाषणातून वापरली जाऊ लागली.१९७८ साली पुण्याला पु.भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात कोशकारांचा सत्कार केला गेला होता. त्यात कोशकार म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशी, चित्रावशास्त्री, ग.रं. भिडे, महादेवशास्त्री जोशी अशा लोकांचा सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणाले, आम्हा सर्वांचा सत्कार झाला हे ठीक झाले, पण आम्हा सगळ्यांमधील ज्येष्ठ प्राचार्य गो.रा. परांजपे यांचा सत्कार झाला नाही याची मला खंत वाटते. एक तर ते आम्हा सर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. दुसरे म्हणजे त्यांचे काम सर्वांत अवघड आहे. आम्ही धर्म, तत्त्वज्ञान यावरचे कोश करतो, पण गो.रा. परांजपे यांचे कोश विज्ञानावरचे आहेत. आमचे कोश करणे सोपे आहे, कारण ही भूमीच मुळी तत्त्वज्ञानाची आहे, त्यामुळे ती भाषा, संस्कृती आम्हाला अवगत आहे. पण, विज्ञानाचे तसे नाही. ते आमच्या भूमीत रुळलेले नाही. ते परके आहे. ती भाषा आपल्याला घडवावी लागते, अवगत करून घ्यावी लागते, प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावी लागते.विज्ञानाच्या भाषेबद्दल एक हकिकत सांगण्यासारखी आहे. १९८०च्या दरम्यान मराठी विज्ञान परिषद - ईशान्य मुंबई विभागातर्फे ट्यूब लाइट या विषयावर एक पुस्तिका काढावी असा विचार होता. त्यासाठी तंत्रज्ञानातील उपकरणांवर पुस्तके लिहिणारे श्री. वि. सोहोनी यांना विनंती करण्यात आली. त्यांनी त्या पुस्तिकेचे लिखाण केल्यावर ते त्या वेळी सोमय्या प्रकाशनाचे प्रमुख अधिकारी असलेल्या डॉ. गंगाधर कृ. कोशे यांना दाखवले. त्यांनी याचा वाचक कोण, म्हणून प्रश्न विचारला. त्या वेळी याचा वाचक सामान्य माणूस, असे सांगितल्यावर ते म्हणाले, मग ही भाषा बोजड झाली आहे, ती सोपी करायला हवी. श्री.वि. सोहोनी यांना तसे सांगितल्यावर ते म्हणाले, विज्ञानाची भाषा अशी पातळ (सोपी) करणार नाही. मग भले तुम्ही ही पुस्तिका छापली नाही तरी चालेल; आणि शेवटी ती पुस्तिका छापली गेली नाही. साहित्यात जसे एकाच अर्थाचे बरेच पर्यायी शब्द वापरले गेले नाहीत तर ते लेखकाचे भाषा-दारिद्र्य मानले जाते, तसे विज्ञानात होत नाही. बळ या शब्दाला कधी जोर, कधी शक्ती, कधी ताकद असे लिहून चालत नाही. अर्थ बदलतो. त्यामुळे विशिष्ट अर्थ व्यक्त करायला विशिष्ट शब्दच वापरायला लागतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भाषेचा वापर करताना हे पथ्य पाळावेच लागते.मला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा विषय शिकवायला प्रा. लिमये नावाचे एक प्राध्यापक होते. ते म्हणायचे, मी एखादा नवीन शब्द वाचला, की तो लक्षात राहावा म्हणून दिवसभरात तो अनेकवेळा वापरतो. तसे सध्याच्या जमान्यात आपण एवढी नवनवीन माध्यमे वापरत असताना जर एखादा मराठी शब्द आपल्याला आवडला तर तो इ-मेल, व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक अशा नाना माध्यमांवर टाकला तर तो लोकांपर्यंत पोहोचायला (सध्याचा प्रचलित इंग्रजी शब्द - तो व्हायरल व्हायला) वेळ लागणार नाही. उदा. कॉरोनॉर हा पदाधिकारी अपघाताने अथवा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची मरणोत्तर तपासणी करून तो मृत्यूचे कारण सांगतो. त्या कॉरोनॉरला मराठीत एक चांगला शब्द आहे - अपमृत्यू निर्णेता. चला, आजपासून हा शब्द आपण सगळे जण वापरायला सुरुवात करू या.