शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: September 8, 2016 04:38 IST

एखाद्या विषयाची फक्त आस लावून ठेवणं, मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी कृती न करता केवळ घोळात घोळ वाढवत राहणं

एखाद्या विषयाची फक्त आस लावून ठेवणं, मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी कृती न करता केवळ घोळात घोळ वाढवत राहणं... पायात पाय अडकवून एखाद्या विषयाचं घोंगडं नुसतंच भिजत ठेवणं ही आपल्या राजकारण्यांची खासियत! त्यांच्या आदेशाबरहुकूम प्रशासकीय यंत्रणाही धावते. याचं उत्तम उदाहरण पाहायचे असेल, तर बहुप्रतिक्षित असलेला, प्रत्येक वेळी नवी आशा पल्लवित करणारा व पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियोजित प्रकल्प!उणीपुरी दहा वर्षे तरी लोटली असतीलच. हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय विमानाइतकाच अधांतरी! पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येण्याचे कारण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलेले टिष्ट्वट! त्यामुळे पुन्हा एकदा विमानतळ नक्की कुठे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेली अनेक वर्षे नुसतीच पाहाणी व न झालेली स्थाननिश्चिती हा या विषयातील सर्वांत कळीचा मुद्दा आहे. त्याचे तळ्यात-मळ्यात अद्यापही संपलेले नाही. एका बाजूला मुख्यमंत्री सूतोवाच करतात खेडचे. लगेच तिथे जोरदार चर्चा सुरू होते. आधीच जागांना सोन्याचे भाव येतात. स्थानिक शेतकरी मात्र जमिनी जाणार म्हणून विरोध करतात. विरोधाचे वारे वाढताहेत पाहून लगेचच दुसरीकडे ‘पाहाणी’ होते. जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला थेट पुरंदरमध्ये. या धक्कातंत्रामुळे पुन्हा एकदा ‘टेकआॅफ’ नक्की कुठून आणि कधी हा संभ्रम कायम राहिला आहे व त्याने अनेक नवे प्रश्न निर्माण केले आहेत. गेली दहा वर्षे खेड तालुक्यात घिरट्या घालणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना १८०० हेक्टर जागा लागणार व खेडमध्ये ती नाही हा शोध आत्ताच, अचानक का लागावा? यामागे काही धूर्त राजकारण किंवा ‘अर्थकारण’ आहे का याचा सुगावा तूर्तास तरी लागलेला नाही. पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात उद्योग व्यापार-व्यवसायाची उलाढाल मोठी आहे. नवनवीन आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रचंड गुंतवणूकही करीत आहेत. पण विस्तार-विकासाच्या या घोडदौडीत त्यांची सर्वात मोठी अडचण आहे ती विमानसेवेची. सद्यस्थितीत असणारे पुणे विमानतळ हे संरक्षण दलाच्या अखत्यारीत असल्याने त्याच्या विस्ताराला व प्रगतीला खूप मर्यादा आहेत. परदेशात जाण्यासाठी उद्योजकांना मुंबई, दिल्ली, चेन्नईतून जावे लागते. त्या दृष्टीने जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायला हवे, परंतु गेल्या दहा वर्षांपासून त्याबाबत जो वेळकाढूपणा आणि दिरंगाई सुरू आहे ती मात्र प्रगतीला खीळ बसवणारी आहे. विमानतळाचे 'टेक आॅफ' अजूनही जमिनीतच रूतून बसले आहे. १९९८ मध्ये पहिल्यांदा सर्र्वेक्षण झाले ते चाकणलगत आंबेठाण परिसरात. नंतर चांदूस, चांडोली येथे सर्वेक्षण झाले. त्या परिसरात समारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ‘सेझ’साठी म्हणून जागा संपादीत करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर शिक्के मारले गेले. मात्र तेथेही विरोध झाल्याने कन्हेसर, पाबळ परिसरात चाचपणी सुरू झाली. पुढे पाईट, कोये, रोंधळेवाडी परिसरात जागा निश्चित झाली. शेतकऱ्यांनी तेथेही विरोध केला. आता खेडचे सूतोवाच असताना विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी पुरंदरला राजेवाडी, वाघापूर परिसरात ‘पाहाणी’ करून ही जागा योग्य असल्याचे सांगत आहेत. सद्य स्थितीत पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रुपाने ‘आकाशभरारी’ घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुनियोजित, कालबद्ध आणि तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नव्याने साकारणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्याचा वेध घेऊन, अद्ययावत, आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज असावे हीच पुणे जिल्हावासियांची मागणी आहे. सरकारने पुणे जिल्ह्याच्या आकाश भरारीला, प्रगतीला, विकासाला बळ द्यावे हीच माफक अपेक्षा आहे.- विजय बाविस्कर