शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

पुन्हा थरारली नवनिर्माणाची वीट !

By admin | Updated: August 6, 2016 04:39 IST

गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला ‘गोदा पार्क’ राज ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून पुन्हा उभारता येईलही

गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला ‘गोदा पार्क’ राज ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून पुन्हा उभारता येईलही; पण निसर्गाची परीक्षा कितीदा पाहायची, याचाही कधी, कुणी विचार करणार आहे की नाही?निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही, कारण त्याची मर्जी फिरते तेव्हा तो शहर कोणते, तेथील संस्था कोणती, त्यातील सत्ता कुणाची वा कोणत्या पक्षाची, असे काही पहात नाही. त्यामुळे नाशकातील धुवाधार पावसात आपल्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ म्हणवल्या जाणाऱ्या ‘गोदा पार्क’ची झालेली वाताहत पाहून नवनिर्माणकार राज ठाकरेच काय, अवघे नाशिककर खिन्न होणे स्वाभाविक आहे; पण वारंवार निसर्गाची परीक्षा घेत निसर्गालाच आव्हान देण्याचे प्रकार घडून येत असल्यानेच सदर नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची वास्तविकता या निमित्ताने तरी स्वीकारली जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. या आठवड्याच्या प्रारंभी नाशकात झालेल्या पावसाने आजवरचे सारे उच्चांक मोडले. चोवीस तासात म्हणजे एका दिवसात कधी नव्हे तो तब्बल २०४ मिलिमीटर पाऊस नाशकात कोसळला. संततधार, कोसळधार, मुसळधार आदि. विशेषणे थिटी पडावीत असा हा पाऊस होता. त्यामुळे साहजिकच जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांना व विशेषत: गोदाकाठच्या रहिवासी व शेतकऱ्यांना त्याचा मोठाच फटका बसला. अजूनही ही परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकलेली नाही, घराघरांतील व गल्लीबोळातील गाळ काढणी अद्याप सुरूच आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी लिहून ठेवलेल्या ‘गोदामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून; माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली’, या ओळींचा प्रत्यय आणून देणाऱ्या निसर्गाच्या तांडवाने जिथे अनेकांना उद्ध्वस्त केले तिथे ‘गोदा पार्क’कडे वेगळ्या नजरेतून बघता येऊ नये हे खरेच; पण राज ठाकरेंच्या स्वप्नातील या प्रकल्पावर कोट्यवधीचा खर्च होत असून, तो दरवर्षीच पाण्यात जात असल्याने आता तरी यातून काही बोध घेतला जाणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित होऊन गेला आहे. २००२मध्ये महापालिकेतील तत्कालीन शिवसेनेच्या सत्ताकाळात हाती घेतलेल्या या प्रकल्पाला आजवर गोदावरीच्या पुरामुळे वारंवार नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या नुकसानीची पाहणी करताना स्वत: राज ठाकरे जेव्हा ‘गोदा पार्क’वर गेले तेव्हा तेथील वाताहत पाहून तेही खिन्न मनाने परतले. कारण, राज्यभर ज्या प्रकल्पाची त्यांनी वाजंत्री वाजविली त्याचे लोकार्पण होऊ घातले असताना त्यापूर्वीच त्याचे पुरात मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज ठाकरे यांची खिन्नता हा माध्यमांच्याच काय, कुणाच्याही आनंदाचा विषय जरी होऊ शकत नसला तरी, तो पुनर्विचाराचा नक्कीच होऊ शकणारा आहे.मुळात, पूररेषेत कामे करून निसर्गाला आव्हान देण्याची कृती ही या साऱ्या विध्वंसामागे आहे, हे या संदर्भाने लक्षात घ्यायला हवे. यापूर्वी २००८मध्ये जेव्हा अशाच महापुराने नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ आली होती तेव्हा गोदेच्या काठावरील पूररेषेच्या निश्चितीला चालना मिळून गेली होती. त्यावेळीही या ‘गोदा पार्क’चे नुकसान घडून आले होते. परंतु राजहट्टामुळे त्याबाबत पुनर्विचार करण्याचे सोडून उलट महापालिकेत ‘मनसे’ची सत्ता आल्यावर नव्याने काम हाती घेतले गेले. तेव्हा या पार्कचेच नव्हे, तर पूररेषेत प्रतिबंध असतानाही बांधल्या जाणाऱ्या सर्वच कामांबाबत यासंबंधीच्या निर्बंधांचे काटेकोर पालन होण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे. मात्र तेच होताना दिसत नाही. पाण्याचा निचरा होणारे शहरातील नैसर्गिक स्त्रोत बुजले गेले आहेत. तसेच गोदाकाठावर झालेल्या बांधकामांमुळे नदीपात्र आकुंचले असून, पुराचे पाणी पात्राबाहेर रहिवासी वसाहतींमध्ये शिरणे अगदी स्वाभाविक ठरून गेले आहे. ‘निरी’सह पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनी याबाबत वेळोवेळी घसा ओरडून सांगून झाले आहे. पण, लक्षात घेतो कोण? राज ठाकरे यांच्या स्वप्नातील नवनिर्माणाची वीट पुन्हा थरारली आहे, तीही या दुर्लक्षामुळेच.- किरण अग्रवाल