शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

संचित

By admin | Updated: March 8, 2015 23:48 IST

संचित’, ‘प्रारब्ध’ व ‘क्रियमान’ ही माणसानं केलेल्या कर्मांची तीन तोंडं आहेत. त्यामुळे आयुष्यभर आपल्या वाट्याला येणा-या सुख-दु:खाला आपणच जबाबदार असतो

डॉ. कुमुद गोसावी‘संचित’, ‘प्रारब्ध’ व ‘क्रियमान’ ही माणसानं केलेल्या कर्मांची तीन तोंडं आहेत. त्यामुळे आयुष्यभर आपल्या वाट्याला येणा-या  सुख-दु:खाला आपणच जबाबदार असतो. देव किंवा दैव जबाबदार नसतं, हे ध्यानी घेतलं तरच आपलं ‘संचित’ उत्तम राहील, असं कर्म हातून घडतं! ‘कर्माचं फळ कर्मातच असतं!’ हा निसर्ग नियम आहे. श्री दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांकडं आलेल्या एका याचकाला त्याच्या व्यथेचं कारण सांगून त्याच्या पूर्वसंचिताचा निर्देश करताना त्यांनी म्हटलं, ‘‘अरे विप्रा! पूर्वजन्मी तू अनेकांना आपल्या अत्यंत कठोर वाणीनं दुखावलंस? त्या कर्मसंचिताचं फलित म्हणजे तुझी ही अतिशय वेदना देणारी या जन्मीची पोटदुखीची व्याधी! यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे नामस्मरण होय! भगवंताच्या नामस्मरणानं वायूमंडळ शुद्ध होतं. चारही वाणींना परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांना नामजपानं शुद्ध राखता येतं.जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. अशा प्रसंगी देवदेवस्की, अंगारे, धुपारे यासाठी बुवाबाजीकडे धावण्याऐवजी नामस्मरण करीत स्थिरचित्तानं त्या प्रसंगांना धैर्यानं तोंड देणं आवश्यक. जीवन प्रवास सुखकर होण्यासाठीअवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता ।चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।।मग असं शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांसारखं सांगता येतं. संचित-प्रारब्धानुसार आयुष्यात वाट्याला आलेले भोग भोगण्यासाठीही माणसाला मनोबल, आत्मबल आवश्यक असतं. अलीकडे संशोधनानं असं सिद्ध झालं आहे की, ज्यांना रविवारी हार्टअटॅक आला असेल, त्यांची जगण्याची शक्यता फार कमी असते. रविवार ‘सूर्य’ आणि ‘हार्टअटॅक’चा काय संबंध आहे. याविषयी संशोधन चालू आहे. मात्र या संदर्भात ‘सूर्योपासना’ उपयुक्त असल्याचं स्पष्ट होतं.पाश्चात्त्य संशोधकांनी या विषयावर सखोल संशोधन केलं आहे. डॉक्टर एम. मोनिया त्यांच्या ‘एन्शन्ट हिस्टरी अ‍ॅण्ड मेडिसीन’मध्ये लिहितात की, रोगांना पळवून लावण्याचा साधा व सरळ उपाय आहे यज्ञ! यज्ञानं अनेक प्रकारचे रोगकारक जीवजंतू (किटाणू) आणि बॅक्टेरिया यांचा नाश होतो! फ्रान्सचे एक वैज्ञानिक डॉ. फाक्रिनने यज्ञात तूप आणि साखरेची आहुती देऊन रोगजंतूंचा नाश होतो, हे सिद्ध करून दाखवले आहे. तेव्हा प्रश्न आपल्या ज्ञान-विज्ञानविषयक भूमिकेचा आहे. केवळ संचितांकडे बोट दाखवून ‘माझं नशीबच फुटकं’ असं म्हणण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न स्वामी सवितानंद यांनी आपल्या ‘स्तोत्र-मंत्रांचे विज्ञान’ या पुस्तकातून केला आहे, तोही अतिशय बोलका आहे.