शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

अभिनंदनपात्र पवार

By admin | Updated: July 6, 2015 22:19 IST

दाऊद इब्राहीम कासकर नावाचा प्राणी महाराष्ट्राच्या हाती येता येता राहून गेल्याचे ऐकून आता हळहळण्यापलीकडे कोणीच काही करु शकत नाही.

अनेक वर्षांपासून भारताला ज्याचा शोध आहे, मुंबई शहरातील अतिभयानक बॉम्बस्फोट मालिकेचा जो कथित सूत्रधार आहे, ज्याच्या मुसक्या आवळण्याच्या अनेक घोषणा केल्या जाऊन यथावकाश ज्या अंतराळात विरुनही गेल्या, तो दाऊद इब्राहीम कासकर नावाचा प्राणी महाराष्ट्राच्या हाती येता येता राहून गेल्याचे ऐकून आता हळहळण्यापलीकडे कोणीच काही करु शकत नाही. मायभूमीची ओढ स्वस्थ बसू देईना म्हणूनच की काय त्याने म्हणे भारतात परतण्याची तयारी देशातील एक नाणावलेले विधीज्ञ राम जेठमलानी यांच्यापाशी बोलून दाखविली होती. जेठमलानींनी म्हणे त्याची ही तयारी तत्काळ तेव्हांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कानी घातली. दाऊद आणि पवार यांचे प्रत्यक्ष संभाषण झाले अथवा नाही, हे या तिघांनाच ठाऊक. पण जेठमलानी यांनी दाऊदच्या मनसुब्याचे रहस्योद्घाटन केल्यानंतर पवारांनी त्याचा इन्कार वगैरे न करता, लगेचच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, दाऊदची अट मानणे त्यांना म्हणजे त्यांच्या सरकारला अशक्य होते व त्यामुळेच तेव्हांची दाऊदची घरवापसी चुकली. अट काय, तर तो परतल्यानंतर त्याला अटक करुन तुरुंगात न धाडता, त्याच्या स्वत:च्याच घरी त्याला राहू द्यावे. ही अट मान्य केली गेली तरच म्हणे तो भारतात परतणार होता. आपल्या अटीचे पालन केले जाते अथवा नाही, याची खातरजमा होण्यासाठी त्याने जेठमलानींना ओलीस वा वेठीस धरले होते वा कसे, याचा उलगडा तिघांपैकी कोणीच केलेला नाही. पवारांच्या कारकिर्दीत दाऊद भारताच्या ताब्यात आला असता तर पवारांचा मान नक्कीच वाढला असता. पण त्यासाठी त्यांना गनिमी काव्याचा आधार घ्यावा लागला असता. दाऊदचे पाय मुंबईच्या जमिनीवर लागेपर्यंत त्याला गाफील ठेऊन नंतर त्याला जेरबंद करता आले असते. पण केवळ तितकेच नव्हे तर हे सारे ‘आॅपरेशन’ अत्यंत गुप्त ठेऊन दाऊदप्रेमींसकट कोणालाही आरडाओरड करण्याची संधी नाकारता आली असती. अफझल गुरुच्या फाशीच्या अंमलबजावणीबाबत तसेच तर झाले होते. अटीचा वा कराराचा भंग झाल्याचे उघड झाल्यानंतर कदाचित आंतरराष्ट्रीय समुदायाचा आणि मानवी हक्कवाल्यांचा दबाव वाढला असता. पण त्यांची चिंता करण्याचे काही कारण पडले नसते. दाऊद संपूर्ण देशाचा गुन्हेगार व देशद्रोहीदेखील असल्याने त्याचा कसला मानवी हक्क? पण पवारांनी तसे केले नाही. ‘दिल्या वचनाला जागलेच पाहिजे’ हा सद्विचार कधी नव्हे तो नेमका त्याचवेळी त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. अन्यथा शब्दाला जागणे आणि विश्वासास तडा जाऊ न देणे अशा भ्रामक कल्पनांना पवारांनी आजवर क्वचितच थारा दिल्याचे दिसून येते. याबाबत काँग्रेसची मंडळी अधिक अधिकारवाणीने सांगू शकतात. तसे असतानाही पवारांनी आपण दाऊदची अट पाळू शकत नाही, हे जाणून त्याच्याशी गद्दारी करण्याचे टाळले, याबद्दल ते खचितच अभिनंदनास पात्र ठरतात.

------------

खाणं काढू नका रे !माहितीच्या अधिकाराचा आता बहुतेक साऱ्यांनाच ताप होऊ लागला असावा असे दिसते. याच अधिकारात न्यायाधीशांच्या औषधपाण्यावरील खर्चाची मागणी करणारा एक अर्ज नुकताच थेट सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर आता बहुधा पाळी खासदारांची असावी. संसदेच्या आवारात जी अर्धा डझन उपाहारगृहे आहेत, तिथे खासदारांसाठी जो उपाहार वा भोजन दिले जाते, ते सारे अनुदानपात्र असते. अनुदान तरी किती, तर मागील वर्षी या अनुदानावर सरकारी तिजोरीतून चक्क चौदा कोटी रुपये खर्ची पडले. अर्थात ही माहिती बाहेर आली ती माहितीच्या अधिकारातूनच. खासदारांसाठी दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी जी रक्कम आकारली जाते, त्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम म्हणे ते भाजन तयार करण्यासाठी वापरलेल्या सामुग्रीवर खर्च करावी लागते. यावर काही खासदारांनी सरकारी तिजोरीला अशी गळती लागणे अयोग्य असल्याचे सांगून हा आतबट्ट्याचा व्यवहार थांबविला जावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर काहींनी मात्र ‘खासदारांचं खाणं काढू नका’ अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त करुन ज्याला अजिबातच महत्व नाही, अशा मुद्यांना महत्व दिले जात असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. पण यातील खरा मुद्दा तो नाहीच. केवळ खासदारांनाच अनुदानित खाद्यपदार्थ आणि तत्सम अन्य काही बाबी मिळतात असे नव्हे. आमदारांनाही तशाच काही सवलती मिळत असतात. ही परंपरा वा पायंडाही एवढ्यातच रुजू झालेला नाही. पण याआधीही त्याची कधीही चर्चा झाली नाही, ती प्राय: माहितीच्या अधिकाराचा अभाव असल्याने. पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की आपले प्रतिनिधी कम न करता केवळ फायदेच घेत राहतात, अशी भावना समान्यांमध्ये दृढ होते आहे व ती खरे चिंतेची बाब आहे.