शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आम्ही मटनावर ताव मारलेलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:47 IST

जि.प.सभेनंतरची मटन पार्टी : अनेक सदस्यांची सावरासावर सुरू, विरोधी गटाने साधला निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभे दरम्यान काही सदस्यांनी ऐन श्रावणात व ज्या दिवशी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत होते, त्याचदिवशी मटनावर ताव मारल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच, सदस्यांवर टीका होऊ लागली. त्यामुळे मटन रिचविणाऱ्या सदस्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. आम्ही मटनावर ताव मारलाच नाही असे काही सदस्य सांगत आहे. त्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आलेली आहे. कोरोनाचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रथमच जि.प. आवाराच्या बाहेर झाली. शहरापासून लांब होत असलेल्या सभेमुळे सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना मटनावर ताव मारण्याचा मोह आवरता आला नाही. यासाठी तीन बोकडांची कुर्बानी देण्यात आली. मटनावर ताव मारत असतांना सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना श्रावणाचा व ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, त्या पवित्र दिवसाचाही विसर पडला.सदस्यांनी मटन रिचवल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच, अशा सदस्यांवर टीका सुरू झाली. अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. काहींनी तर त्यांनी पक्षाच्या नितीमुल्याचीही आठवण करून दिली. मटन खाऊन प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन करणे म्हणजे किळसवाणा प्रकार आहे अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. माध्यमांमध्ये होत असलेल्या टीकेनंतर यातील काही सदस्यांना पश्चातापाची उपरती येऊ लागली आहे. तर काहींना याबाबत विचारणा केली असता, पवित्र श्रावण महिन्यात आम्ही मटन खाल्लेच नाही असा पवित्रा काहींनी घेऊन कानावर हात ठेवले आहे. सदस्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.