शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:01 IST

श्रमिक शेतकरी संघ : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

धुळे : बोगस बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघाने केली आहे़बोगस बियाण्यांच्या यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठापुढे चाललेल्या याचीके संबंधातली आणि ईतर घडामोडींच्या बाबतीत श्रमिक शेतकरी संघाचे सरचिटणीस कॉ़ सुभाष काकुस्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रसिद्धी माध्यमातील सोयाबीन पिकाचे बी अंकुरले नाही या बातम्यांची दखल घेऊन सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ही याचिका न्यायमूर्ती टी .व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या समोर सुरू आहे .पहिल्या तारखेला खंडपीठाने तक्रारींचा पाऊस असताना निव्वळ पाच-सहा गुन्हे कसे नोंदवले? याबाबत सरकारला धारेवर धरले. सरकारने याबाबत तात्काळ खुलासा करावा व कृषी संचालक आणि गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाºयांना पुढील तारखेस हजर राहण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे दिनांक १३ जुलै रोजी पुन्हा सुनावणी सुरू झाली. तेव्हा औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यकक्षेतील महाबीज सह आणखी एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे वकील डी़ आऱ काळे यांनी दिली. तसेच ४६ फौजदारी गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. हे बघून विक्रेत्यांच्या राज्य संघटनेच्या आदेशाप्रमाणे तीन दिवस या विक्रेत्यांनी राज्यभर बंद पाळला. आमचा यात दोष नाही, आम्हाला आरोपी करण्याऐवजी साक्षीदार करा, अशी त्यांनी मागणी केली आहे.दरम्यान, कृषी खात्याचे सहसंचालक डॉ. डी़ एल़ जाधव यांच्या माहितीनुसार ५३ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. तक्रार निवारण यंत्रणेकडे आजवर ४९ हजार ३३७ तक्रारी दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली़ खंडपीठाने सू-मोटो दाखल केलेल्या याचिकेच्या कामासाठी न्यायालयाचे मित्र (अमायकस क्युरी) अ‍ॅड़ पी. पी. मोरे यांना नेमले होते. त्यांनी आजवर दाखल तक्रारींपैकी केवळ ९२९ तक्रारदारांना भरपाई मिळाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी केंद्र सरकारचे सहाय्यक आयुक्त आणि गुण नियंत्रण विभागांनाही प्रतिवादी करण्याची त्यांनी मागणी केली. ती खंडपीठाने मान्य केली.एवढ्या घडामोडी घडत असताना शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे़ वाहतूक बंद आहे. त्यामुळे तक्रार दाखल करायला उशीर झाला तर कृषी खात्याने कृषी विद्यापीठाच्या जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत पेरणी करायची शिफारस आहे. त्यामुळे आता मुदत संपली आहे. यापुढे तक्रारी दाखल करून घेऊ नका, असे निर्देश तालुका पातळीपर्यंत दिले आहेत. पेरणी केव्हा झाली याची शहानिशा करून त्याबाबत तक्रारी दाखल करून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी श्रमिक शेतकरी संघटनेने केली आहे .केंद्र सरकारचा बियाणे अधिनियम १९६६ त्यावरचे नियम, १९६८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ या अंतर्गत काढलेले बी-बियाणे आदेश १९८३ यामध्ये बियाणे अंकुरित झाले नाही तर भरपाई देण्याची तरतूदच नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ त्याचा गैरफायदा कंपन्या घेतात व कृषी खात्यानेही त्या त्रुटीकडे बोट दाखवले आहे.मुळात हा फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो, असे श्रमिक शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे़ या संबंधात सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक पीठापुढे ललित कुमारी यांच्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत. बियाणे अंकुरित झाले नाही या संबंधातलाच हा दावा होता. त्याप्रमाणेच सीआरपीसी कलम १५४ अन्वये एफआयआर दाखल करून घेणे बंधनकारक आहे. याबाबत कर्तव्यात कसुर केल्यास संबंधित अधिकाºयांवरही कारवाई होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघाचे सरचिटणीस कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांनी दिली़सोयाबीनच नव्हे, शिमला मिरची बियाणेही बोगसबोगस बियाण्यांच्या बाबतीत सोयाबीनच्या बियाण्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत़ साक्री तालुक्यात शिमला मिरचीचे बियाणे देखील बोगस निघाल्याची तक्रार तीन शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे गेल्या आठवड्यातच केली आहे़ कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे