शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

तापीत उडी घेऊन संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:02 IST

बाळदे येथील शेतकरी । शेतीत उत्पन्न न येणे व कर्जबाजारीपणाला कंटाळला होता

शिरपूर : तालुक्यातील बाळदे येथील ५० वर्षीय एका शेतकऱ्याने बँकेतून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडता आल्यामुळे तसेच शेतीत उत्पन्न न आल्यामुळे या त्रासाला कंटाळून गिधाडे तापी पूलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली़२८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ बाळदे येथील दिलीप हिलाल पाटील यांनी शेतीकामासाठी बँकेतून कर्ज घेतले होते़ तसेच गतवर्षी अति पावसामुळे कपाशीचे पिक वाया गेले, झालेला खर्च सुध्दा निघाला नाही़ या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वत:ची दुचाकी गाडी घेवून ते गिधाडे तापी पूलावर गेलेत़ बाजूला गाडी उभी करून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली़पूलावरून ये-जा करणाऱ्यांनी सदरची घटना गिधाडे गावात सांगितली़ त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पूलावर जावून गाडी कुणाची आहे याची खात्री केली असता ती गाडी बाळदे येथील असल्याचे निष्पन्न झाले़त्यानंतर सावळदे येथील पट्टीचे पोहणाºयांना बोलावून नदी पात्रात शोध घेतल्यानंतर दिलीप पाटील यांचे शव मिळून आले़ शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़मयत शेतकरी दिलीप पाटील यांना एकलुता मुलगा आहे़ २२ वर्षीय असलेला हा तरुण एका ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी काम करतो़ सततची नापिकी आणि अवकाळी पावसामुळे हातचे पीक गेल्याने वैफल्यग्रस्त असलेल्या या शेतकºयाने तापी नदीत स्वत:ला अर्पण करुन टाकल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु होती़ तसेच या शेतकºयाला दोन मुली असून त्यांचे विवाह झाले आहेत़अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळदे गावावर एकप्रकारे शोककळा पसरली आहे़ मयत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे़वाघाडी येथे एकाचा मृत्युवाघाडी येथील २१ वर्षीय अर्जून ज्योतीलाल कोळी याने २७ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली़ मयत अवस्थेत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे