शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

रब्बीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. ...

बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. दिमतीला लाखोंची जमीन असली तरी ती सिंचित करून पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्रभर राबवावे लागते. शिवारात अनोळखी इसमांकडून दगा फटका , प्राण्यांचा हल्ला तसेच विषारी प्राण्यांच्या दंशाची भीती देखील शेतकऱ्यांना सतावते.

काही वर्षापूर्वी बळसाणेसह माळमाथ्था परिसरात शेतात राबतांना सर्पदशांने शेतकऱ्यास जीव ही गमवावा लागला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत माळमाथा भागात अशा घटना घडल्या नसल्या, तरी केव्हा कुठली अनाहुत घटना पुढे येईल याची शाश्वती सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना २४ तास व दिवसा वीजपुरवठा करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा व घोषणाच राहिल्या आहेत.

रात्रपाळीला शेतकऱ्यांना वावरात सरपटणारे प्राणी व हिंस्र प्राण्यांचा लागलेला डर यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी बळसाणे , दुसाणे , इंदवे , हाट्टी खुर्द , ऐचाळे , लोणखेडी , कढरे , सतमाने , अमोदा छावडी , अगरपाडा , घानेगाव , नागपूर वर्धाने आदी माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या बळसाणे शेतशिवारात महावितरणकडून शेतीला सकाळची साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत वीजपुरवठा होतो. आणि रात्री सव्वादहा ते सकाळी सव्वाआठ वाजेपर्यंत असे चार - चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शेतीला वीज मिळत नसल्याची खंत नवल इंदा पाटील यांनी केली.

आठवड्याचे काही दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे शेतीला कायम दिवसागणिक वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

गेल्यावर्षी माळमाथा भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे छोटे मोठे प्रकल्प व बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे. शिवाय विहीर , बोअर हे देखील भरले आहेत. त्यात रब्बी हंगाम ही बहरला असून काही शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे फटाका ही बसला आहे. शेतातील पीक जगविण्यासाठी शेतकरी रात्री बेरात्री शेतात पाणी देण्यासाठी जात आहे.

रात्री उशिरा वीज येत असेल त्यावेळी सोबत बँटरी , काठी घेऊन जावे लागते. त्यात खराब शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वाट ही बिकट झाली आहे. त्यात तांत्रिक अडचण आली आणि वीज गुल झाल्यावर शेतकऱ्यास रात्रीचा मुक्काम शेतातच ठोकावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

रात्री बेरात्री पिकांना पाणी देतांना हिंस्त्र प्राणी , सापांसह सरपटणारे प्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रकार ही यापूर्वी घडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या कारणाने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांचा जीवावर उठत आहे. अशा कुठल्याही प्रकारचा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून दिवसा वीजपुरवठा करावा अशी चर्चा आपसात शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रतिक्रिया

रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार झाला आहे. जंगल म्हटल्यावर हिंस्र प्राण्यांच्या व सापासह सरपटणारे प्राण्यांची भीती लागते. त्यात रात्रीची वीज बंद झाल्यावर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

किशोर शंकर हालोरे ( शेतकरी , बळसाणे )

प्रतिक्रिया नंबर , २

महाराष्ट्र वीज नियामक आयोगानुसार व वरिष्ठ स्तरावरुन शेतीसाठी वीजपुरवठाबाबत आलेल्या शेड्यूलनुसार सध्या शेतीला वीजपुरवठा केला जातो. शेतीला दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळांमध्ये वीजपुरवठा होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये याकडेही लक्ष दिले जाते आहे.

आर. बी. जोशी

कार्यकारी अभियंता , दोंडाईचा