शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुळे तालुक्यात साडेसोळा कोटींच्या विकास कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:20 IST

पत्रकार परिषद : खासदार डॉ़ सुभाष भामरे यांची माहिती

धुळे : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे़ जिल्ह्यात समप्रमाणात विकासाची कामे सुरु असताना धुळे तालुक्यात १६ कोटी ४४ लाखांची कामे मंजूर करुन प्रत्यक्षात सुरु करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़डॉ़ भामरे यांनी त्यांच्या राम पॅलेस येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, प्रा़ अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे सभापती रामकृष्ण खलाणे, धरती देवरे, पंचायत समिती सभापती विजय पाटील, उपसभापती भैय्या पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़डॉ़ भामरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ३ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले़ लघुसिंचन विभागाकडून पाणी आडवा, पाणी जिरवा योजनेतंर्गत नवीन पध्दतीचे रिचार्ज बंधारे तसेच नादुरुस्त असलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी २० लाख मंजूर झाले़ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्धी करण्यात आली असून त्यात लळींग, अजंग, चिंचवार आणि कुळथे या ४ गावातील आरोग्य उपकेंद्राचा सुसज्ज इमारतीसह आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे़ महिला बालकल्याण विभागासाठी ७७ लाख, समाजकल्याण विभागासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे़ ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाहण्यात येते़ जानेवारी २०२० पासून भारतीय जनता पार्टीकडे जिल्हा परिषदेची सत्ता आल्यानंतर विकास कामाला सुरुवात करण्यात आली़ लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे़ असेही खासदार डॉ़ भामरे यांनी सांगितले़आम्हाला कोरोनाच्या संकटाची चिंता तर त्यांना मंदिर बांधायचे आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रसरकारवर केली होती़ त्याबाबत पत्रकार परिषदेत डॉ़ भामरे यांना छेडले असता ते म्हणाले, पवार हे मोठे नेते आहेत़ त्यांच्या विषयी काय बोलायचे़ राम मंदिराचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केले जात आहे़ यामध्ये जनभावना देखील महत्वाची आहे़ राम मंदिराची उभारणी करताना कोरोना संकटाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामध्ये केलेल्या कामांची केवळ देशात नाही तर विदेशात देखील वाहवा होते आहे़ आपला देश १५० देशांना कोरोना संदर्भातील औषधांचा पुरवठा करीत आहे़ कोरोनावर लस देखील आपणच देवू असा दावा डॉ़ भामरे यांनी यावेळी केला़ कोरोना रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केला़ मात्र लॉकडाऊन देखील किती करणार, हा प्रश्नच आहे़ जनतेच्या जगण्याचा प्रश्न देखील निर्माण होतो़ त्यामुळे कोरोनाबरोबर जगायला आपल्याला शिकावे लागेल, असेही ते म्हणाले़

टॅग्स :Dhuleधुळे