शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

धुळे जिल्ह्यातील देवकानगर मुलभूत सुविधांपासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 11:51 IST

जिल्हा परिषद निवडणुकीनंतरही प्रशासनाने गावाची अद्याप दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

आॅनलाइन लोकमतमालपूर, (जि.धुळे): शिंदखेडा तालुक्यातील देवकानगर येथे मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याची दखल घेत निवडणूक आटोपल्यानंतर लागलीच गावात मूलभूत सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक आटोपून आता १५ दिवस झाले तरी देवकानगरची स्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. प्रशासनाने ग्रामस्थांची दिशाभूल केली असा ग्रामस्थांचा आरोप आहे.दोंडाईचा-साक्री रस्त्यावर कर्ले गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर देवकानगर गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास ५०० असून, येथील ग्रामस्थांचा शेती व मेंढपाळ हाच व्यवसाय आहे.अनेक वर्षांपासून हे गाव मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पायवाटेनेच जावे लागते. पावसाळ्यात चिखल तुडवत ग्रामस्थांना गावात जावे लागत असते. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षक भिंतही नाही. संरक्षक भिंत नसल्याने शाळेला काटेरी झुडपांचे कंपाऊंड केलेले आहे. शाळेला संरक्षक भिंत बांधावी अशी ग्रामस्थांची मागणी असतांना त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. येथे अंगणवाडीसाठी इमारत नसल्याने, खाजगी घरातच अंगणवाडी भरत असते.येथील पाचवी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कर्ले, दोंडाईचा येथे शिक्षणासाठी जात असतात. मात्र रस्त्याची सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. गावात पाण्याची पुरेशी सोय नाही, आरोग्याचीही सोय नाही.येथील ग्रामस्थांचे रेशन दुकान कर्ले या गावी आहे. पूर्वी या ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानाचा लाभ मिळत होता. मात्र दोन-तीन वर्षापासून तेथील रेशन दुकानदारानेही रेशन देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानापासून लाभार्थी वंचीत आहेत.दरम्यान गावात मुलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात तसेच रेशनचीही व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे