शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बळसाणेसह माळमाथामध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:32 IST

ढगाळ वातावरणाचा परिणाम : उत्पादन घटण्याची शक्यता

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावासह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे़ मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततच ढगाळ आणि शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे़ यंदाच्या वर्षी हाता तोंडाशी आलेली पीके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहे़पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे़ त्याचबरोबर गहू , हरभरा , भुईमूग , टरबूज , पपई व भाजीपाला अशा पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़ मात्र माळमाथा परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे़ अशा ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे़ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पादनात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे़ सतत ढगाळ वातावरण आणि सध्या थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे असे परिसरातील शेतकºयांनी सांगितल़े़पावसाने बळसाणे, दुसाने, हाट्टी, ऐचाळे, इंदवे, सतमाने, कढरे, आगरपाडा अमोदा, छावडी, लोणखेडी आदी माळमाथा भागात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक?्यांची तारांबळ उडाली शेतात काढून ठेवलेले पिके बैलांसाठी लागणारा चारा, भुईमूग, टरबूज, पपई पाण्याच्या बचावापासून काही तरी झाकावे या उद्देशाने शेतकºयांची धावपळ उडाली़ या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे