शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

सोनगीर येथे पाणी निचऱ्यासाठी सर्विस रस्त्यावर खोदली चारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:28 IST

चालक उड्डाणपुलावरूनच बस नेत असल्याने प्रवाशांचे हाल

आॅनलाइन लोकमतसोनगीर (जि.धुळे) :मुंबई आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण झाले त्यावेळी नागरिकांना रस्ता ओलांडू नये म्हणून शिरपूर व धुळे कडे जाणाºया बस थांबाच्या परिसरात व बालाजी नगरच्या जवळ भुयारी मार्ग ( बोगदा ) तयार करण्यात आला. मात्र या बोगद्या मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यात बस थांबा जवळी भुयारी मागार्तून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्नात सर्व्हिस रस्ता खोदून त्यातून पाणी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चारीचा वाहन चालकांना वाहनांच्या नुकसानी सोबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील महामार्गाचे चौपदरीकरण करून विस्तार करण्यात आला त्यावेळी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व गावाच्या पूर्व भागात असलेल्या वस्त्या मधील नागरिकांच्या सुविधेसाठी बालाजी नगर व शिरपूर - धुळे बस थांबा जवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आले होते. मात्र महामार्ग निर्माण झाल्यापासूनच पावसाळ्यात या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते महिन्यापूर्वी नागरिकांच्या मागणी नंतर बस थांबा जवळ असलेल्या भुयारी मागार्तील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून शिरपूर बस थांबा वरील सर्व्हिस रस्त्यावर साधारण एक फुटा पर्यंत खोल व बारा फूट रूंद अशी चारी खोदून पावसाळी पाणी पुढे नाल्याद्वारे बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न येथील टोलप्लाझावरील प्रशासनाने केला. मात्र यावेळी सर्व्हिस रस्त्याची वाट तर लागली व शिरपूरकडून येत असलेल्या बस अथवा इतर वाहनांना या चारीतुन आपले वाहन काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या मोठ्या अवधी नंतर बस सुरू झाल्या आहेत. धुळ्याकडे जाणाºया बस अथवा इतर खाजगी वाहने याच सर्व्हिस रस्त्यावरून जात असतात. मात्र पाण्याच्या निचºयासाठी केलेल्या या चारी मधून मार्ग काढतांना वाहनचालकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. बस अथवा इतर अवजड वाहन , दुचाकीचा खालील भाग हा चारीत रस्त्याला टेकत असल्याने वाहनाचे व टायरचे नुकसान होत असल्याचे चालक सांगतात. परिणामी यावेळी काही वेळा बस अथवा इतर वाहनचालक थेट उड्डाणपुलावरून वाहन घेऊन जातात. त्यामुळे बस अथवा इतर वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर बालाजी नगर जवळील भुयारी मार्गत पाणी साचत असल्याने व ते पाणी कुजून त्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने काही नागरिक थेट महामार्ग ओलांडण्याचा धोकेदायक प्रयत्न करतात. दरम्यान संबंधित प्रशासनाने या भुयारी मागार्मुळे नागरिकांना होणाºया असुविधेची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे