शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

शेती पिकांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

गहू, ज्वारीची पिके आडवी : आंबे, द्राक्ष बागांनाही बसला फटका, शेतकरी पुन्हा संकटात उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन दिवस ...

गहू, ज्वारीची पिके आडवी : आंबे, द्राक्ष बागांनाही बसला फटका, शेतकरी पुन्हा संकटात

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाला पुन्हा मोठा फटका सहन करावा लागला. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणची ज्वारी, गहू ही पिके आडवी झाली. तसेच आंबा, द्राक्ष यासारख्या फळबागांना देखील मोठा फटका बसला. हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले. हे ढगाळ वातावरण असेच आणखी काही दिवस राहिल्यास द्राक्ष बागांवर रोगराईची भिती देखील बागायतदार शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

द्राक्ष गळू लागले

तुळजापूर : तुळजापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमधील द्राक्षाची अद्याप निर्यात झाली नसतानाच अवकाळीच्या धुमाकुळानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिवाय वाऱ्याने व पावसाने ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. ढगाळ वातावरण असेच राहिले तर द्राक्ष बागांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा पाण्याची उपलब्धता सल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरासह आदी पिकांच्या पेरण्या केल्या. पेरणी नंतर पिके जोमाने उगविली आणि आता ती पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तडाखा दिल्याने ज्वारी, गहू आडवा झाला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले द्राक्ष फळ गळून पडू लागले आहेत. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष फळाच्या वजनात घट येण्याची भिती आहे. ढगाळ वातावरण असेच पुढे राहिले तर बागांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गत वर्षी जोमाने आलेली द्राक्ष बाग लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने विकावी लागली. यंदा अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी आडवी पडून त्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे कामठा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बळीराम साळुंके यांनी सांगितले.

हरभरा भिजला

येडशी : येडशीसह परिसरात गरुवारी रात्रीपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, ज्वारी आडवी झाली. शिवाय, हरभरा पिक भिजून मोठे नुकसान झाले. यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी बहुतेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा भरून आपली पिके संरक्षित केली होती. परंतु, ७२ तासात नुकसानीची माहिती दिली नसल्याने विमा कंपनी ने पीक विमा दिला नाही. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा भरण्याकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. मात्र, या वादळी वाऱ्याने बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आर्थिक गणित कोलमडले

उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी पहाटे वादळी वारे व विजांच्या कडकडाटा पाऊस झाला. यात काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. शिवाय, उभी ज्वारी आडवी झाली असून, इतर पिकांनाही याचा फटका बसला. तोंडाशी आलेल्या पिकांना या पावसामुळे फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

खळ्यात पाणी शिरले

कारी : आस्मानी संकटने बळीराजाची पुन्हा झोप उडाली. वर्षभर कष्ट करून वर्षाचे आर्थिक व आहाराचे नियोजन ज्या रबी हंगामावर अवलंबून असते त्याच हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांवर आस्मानी संकटाने अचानक घाला घातला. कारी, कौडगाव, आबेजवळगे, भानसगावल गुंजेवाडी, घाटंग्री, सोनेगाव या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेकांच्या मळणी केलेल्या खळ्यात पाणी शिरले. यात गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या द्राक्ष बागांना देखील फटका बसला. जसेजसे ऊन वाढत जाईल तसे मण्याला चिरा जाऊन प्रचंड नुकसान होते, असे द्राक्ष बागायतदार महेश डोके यांनी सांगितले. मोठ्या सुसाट असणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक बागेत घड पडले आहेत.