शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडे दहा हजार वैयक्तिक क्लेम दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी ...

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी आपली पिके विमा संरक्षित करून घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी दहा हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीचा ऑनलाइन ‘क्लेम’ दाखल केला आहे.

तालुक्यात खरीप हंगामात एकट्या सोयाबीनचा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रात याचा ऐंशी टक्के वाटा आहे. अशा प्रमुख पिकाचा सध्या काढणी हंगाम भरात आलेला आहे. मध्यंतरी २५ दिवसांचा पावसात खंड निर्माण झाला होता. यामुळे आधीच मोठे नुकसान झाले होते. या संकटातून वाचलेले पीक थोडेबहुत हाती पडेल अन् बाजारात वाढलेले दर घामाचे मोल करतील, अशी आशा लागली होती; परंतु फडातील सोयाबीनच्या शेंगा पक्वता अवस्थेत असताना काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करतानाच अचानक निसर्गाने घाला घातला. यामुळे गावोगावी सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान झाले. नदीकाठची पिके तर चक्क पाण्यात तरंगत असून, इतर ठिकाणी अति पाण्याने चिबड लागले आहे. यामुळे आता चिखलमय, दलदलयुक्त वावरात पाय ठेवायचा कसा अन् त्यामधून पीक काढायचे कसे? यापेक्षा कुजलेले, अंकुर फुटत असलेले निकृष्ट प्रतवारीचे पीक काढले तरी घेणार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांची झोप उडवत आहे.

दरम्यान, तालुक्यात पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, अशाच नुकसानीचे आजवर तब्बल दहा हजारांच्या आसपास ऑनलाइन क्लेम शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. यातील ३ हजार ९०० शेतकऱ्यांच्या शेतात विमा कंपनीच्या १७ प्रतिनिधींनी ‘स्पॉट व्हिजिट’ दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट...

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र विमा संरक्षित...

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध पिकांचे तब्बल ९५ हजार १६८ प्रस्ताव दाखल करून पिके विमा संरक्षित करून घेतली आहेत. यात सर्वाधिक ७४ हजार ७३३ प्रस्ताव सोयाबीन पिकाचे आहेत.

७२ तासांत नुकसानीचे इन्टिमेशन हवी...

राष्ट्रीय पीक विमा योजनेत पेरणी ते काढणीपश्चात पिकांना विमा संरक्षण आहे. अवेळी पावसाने काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास याची वैयक्तिक माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन नोंदवणे गरजेचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी बी.बी. जाधव यांनी सांगितले.