शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विमा कंपनीकडे दहा हजार वैयक्तिक क्लेम दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी ...

कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी आपली पिके विमा संरक्षित करून घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी दहा हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीचा ऑनलाइन ‘क्लेम’ दाखल केला आहे.

तालुक्यात खरीप हंगामात एकट्या सोयाबीनचा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रात याचा ऐंशी टक्के वाटा आहे. अशा प्रमुख पिकाचा सध्या काढणी हंगाम भरात आलेला आहे. मध्यंतरी २५ दिवसांचा पावसात खंड निर्माण झाला होता. यामुळे आधीच मोठे नुकसान झाले होते. या संकटातून वाचलेले पीक थोडेबहुत हाती पडेल अन् बाजारात वाढलेले दर घामाचे मोल करतील, अशी आशा लागली होती; परंतु फडातील सोयाबीनच्या शेंगा पक्वता अवस्थेत असताना काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करतानाच अचानक निसर्गाने घाला घातला. यामुळे गावोगावी सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान झाले. नदीकाठची पिके तर चक्क पाण्यात तरंगत असून, इतर ठिकाणी अति पाण्याने चिबड लागले आहे. यामुळे आता चिखलमय, दलदलयुक्त वावरात पाय ठेवायचा कसा अन् त्यामधून पीक काढायचे कसे? यापेक्षा कुजलेले, अंकुर फुटत असलेले निकृष्ट प्रतवारीचे पीक काढले तरी घेणार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांची झोप उडवत आहे.

दरम्यान, तालुक्यात पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, अशाच नुकसानीचे आजवर तब्बल दहा हजारांच्या आसपास ऑनलाइन क्लेम शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. यातील ३ हजार ९०० शेतकऱ्यांच्या शेतात विमा कंपनीच्या १७ प्रतिनिधींनी ‘स्पॉट व्हिजिट’ दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट...

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र विमा संरक्षित...

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध पिकांचे तब्बल ९५ हजार १६८ प्रस्ताव दाखल करून पिके विमा संरक्षित करून घेतली आहेत. यात सर्वाधिक ७४ हजार ७३३ प्रस्ताव सोयाबीन पिकाचे आहेत.

७२ तासांत नुकसानीचे इन्टिमेशन हवी...

राष्ट्रीय पीक विमा योजनेत पेरणी ते काढणीपश्चात पिकांना विमा संरक्षण आहे. अवेळी पावसाने काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास याची वैयक्तिक माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन नोंदवणे गरजेचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी बी.बी. जाधव यांनी सांगितले.